ETV Bharat / state

हृदयद्रावक! प्रेमसंबंधातून मुलीचा पळून जाऊन विवाह, आई-वडिलांसह भावाने केली आत्महत्या

author img

By

Published : Feb 10, 2020, 5:22 PM IST

Updated : Feb 10, 2020, 6:09 PM IST

24 वर्षाच्या मुलीने पळून जाऊन अन्य जातीच्या मुलाशी विवाह केल्याने दुःखी झालेल्या आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे.

FAMILY ATTEMPTED SUICIDE IN GADCHIROLI
प्रेमसंबंधातून मुलीने पळून लग्न केल्याने आई-वडिलांसह भावाची आत्महत्या

गडचिरोली - 24 वर्षाच्या मुलीने पळून जाऊन अन्य जातीच्या मुलाशी विवाह केल्याने दुःखी झालेल्या आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. रवींद्र नागोराव वरगंटीवार (वय-50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (वय-43), साईराम रवींद्र वरगंटीवार (वय-19) अशी मृतांची नावे आहेत.

प्रेमसंबंधातून मुलीने पळून लग्न केल्याने आई-वडिलांसह भावाची आत्महत्या

रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीचे अन्य जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीने प्रेम विवाह करण्यासाठी वडिलांची परवानगी मागितली. मात्र, घरच्यांना ही बाब मान्य नसल्याने त्यांनी नकार दिला. परंतू, प्रेम विवाह करणार असल्याचे ठामपणे सांगून संबंधित मुलगी शनिवारी पळून गेली. यानंतर तिने मार्कंडादेव मंदिरात विवाह केला. संबंधित घटनेनंतर कुटुंबीय अस्वस्थ होते. अनेकांनी समजूत काढल्यानंतरही ते विरोधावर ठाम होते. याच तणावातून तिघांनीही सामूहिक आत्महत्या केली.

FAMILY ATTEMPTED SUICIDE IN GADCHIROLI
प्रेमसंबंधातून मुलीने पळून लग्न केल्याने आई-वडिलांसह भावाची आत्महत्या

सोमवारी (10 फेब्रुवारी) दुपारी बारा ते एकच्या दरम्यान विवेकानंद नगर परिसरातील मोकळ्या जागेतील विहिरीत जीव दिला. सोबत आणलेले सामान काठावर ठेऊन त्यांनी उड्या मारल्याचे समोर येत आहे. यासंबंधी माहिती पसरताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गडचिरोली - 24 वर्षाच्या मुलीने पळून जाऊन अन्य जातीच्या मुलाशी विवाह केल्याने दुःखी झालेल्या आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. रवींद्र नागोराव वरगंटीवार (वय-50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (वय-43), साईराम रवींद्र वरगंटीवार (वय-19) अशी मृतांची नावे आहेत.

प्रेमसंबंधातून मुलीने पळून लग्न केल्याने आई-वडिलांसह भावाची आत्महत्या

रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीचे अन्य जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीने प्रेम विवाह करण्यासाठी वडिलांची परवानगी मागितली. मात्र, घरच्यांना ही बाब मान्य नसल्याने त्यांनी नकार दिला. परंतू, प्रेम विवाह करणार असल्याचे ठामपणे सांगून संबंधित मुलगी शनिवारी पळून गेली. यानंतर तिने मार्कंडादेव मंदिरात विवाह केला. संबंधित घटनेनंतर कुटुंबीय अस्वस्थ होते. अनेकांनी समजूत काढल्यानंतरही ते विरोधावर ठाम होते. याच तणावातून तिघांनीही सामूहिक आत्महत्या केली.

FAMILY ATTEMPTED SUICIDE IN GADCHIROLI
प्रेमसंबंधातून मुलीने पळून लग्न केल्याने आई-वडिलांसह भावाची आत्महत्या

सोमवारी (10 फेब्रुवारी) दुपारी बारा ते एकच्या दरम्यान विवेकानंद नगर परिसरातील मोकळ्या जागेतील विहिरीत जीव दिला. सोबत आणलेले सामान काठावर ठेऊन त्यांनी उड्या मारल्याचे समोर येत आहे. यासंबंधी माहिती पसरताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:हृदयद्रावक... मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई-वडिलांसह भावाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

गडचिरोली : 24 वर्षीय मुलीने पळून जात दुसऱ्या जातीच्या मुलाशी विवाह केल्याने दुःखी झालेल्या आई-वडिलासह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली येथे सोमवारी दुपारी घडली. रवींद्र नागोराव वरगंटीवार (50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (43), साईराम रवींद्र वरगंटीवार (19) अशी मृतकांची नावे आहेत.Body:रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीचे दुसऱ्या जातीच्या मुलाशी प्रेम होते. मुलीने आपले प्रेम विवाह करून देण्यासाठी वडिलांकडे मागणी केली. मात्र घरच्यांना त्यांचा प्रेमविवाह मान्य नसल्याने त्यांनी नकार दिला. तेव्हा मुलीने आपण प्रेम विवाहच करणार असल्याचे ठामपणे सांगत शनिवारी घरून निघून गेली. रविवारी तीर्थक्षेत्र मार्कंडादेव मंदिरात तिने विवाह केला. त्यामुळे कुटुंबीय प्रचंड अस्वस्थ झाले. अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते प्रचंड अस्वस्थ होते. याच अस्वस्थतेतून तिघांनीही सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ते सोमवारी दुपारी बारा ते एक वाजताच्या सुमारास विवेकानंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीवर पोहोचले. तेथे आपल्याजवळील सामान विहिरीच्या काठावर काढून ठेवत तिघांनीही एकत्र उडी घेतली. घटनेची माहिती शहरात पसरतात अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. या ह्रदयद्रावक घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
Last Updated : Feb 10, 2020, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.