ETV Bharat / state

शेतकऱ्यांना चिंता; खरीपासाठी लागणार 26 हजार क्विंटल बियाणे, तर 52 हजार मेट्रीक टन खत

गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी 26 हजार क्विंटल बियाणे तर 52 हजार मेट्रीक टन खत लागणार आहे. मात्र यापैकी 15 हजार क्विंटलच बियाणे महाबीजकडून प्राप्त होणार आहे.

author img

By

Published : May 31, 2019, 10:29 PM IST

संग्रहित छायाचित्र

गडचिरोली - खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यांसह प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी 26 हजार क्विंटल बियाणे तर 52 हजार मेट्रीक टन खत लागणार आहे. मात्र यापैकी 15 हजार क्विंटलच बियाणे महाबीजकडून प्राप्त होणार असल्याने 11 हजार क्विंटल खासगी बियाणे वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.


यावर्षीच्या खरीप हंगामात 2 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात गेल्या हंगामात 2 लाख 2 हजार 157 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यात सर्वाधिक 1 लाख 82 हजार 522 हेक्टर क्षेत्रावर धानाची पेरणी होती. तर कापूस 14 हजार, तूर 5 हजार 535, मका 983 हेक्टर, तीळ 328 हेक्टर आणि सोयाबीन 92 हेक्टर व कापूस 13 हजार 975 हेक्टर अशी पेरणी झाली होती.


यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सोयाबीन 300 क्टिंवल, तूर 350 क्विंटल, बी. टी. कापूस 197 क्विंटल, मका 144 क्विंटल, उडीद 3 क्विंटल, तीळ एक क्विंटल या प्रमाणे एकूण 27,732 क्विंटल बियाणे या हंगामात लागणार आहेत. तर 52 मेट्रीक टन खतापैकी सर्वाधिक 28025 मे. टन आवश्यकता युरिया खताची राहणार आहे. जिल्ह्यात खतांची 562 दुकाने असून किटकनाशकांची 249 तर बियाण्यांची 336 दुकाने आहेत.


खते व बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी पास मशीन आणि आधार क्रमांकांची मदत घेतली जाणार आहे. याखेरीज 13 भरारी पथकेही निर्माण करण्यात आली आहेत. मात्र यानंतरही काळाबाजार होत असल्याने कृषी विभागाला अधिक दक्ष राहावे लागणार आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1502.38 मिमी इतके आहे. गेल्या खरीप हंगामात केवळ 1355.31 म्हणजे 95.93 टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वाधिक 135.10 टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी 74.78 टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला होता.


कापसाचे क्षेत्र वाढणार


जिल्ह्यात चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांमध्ये साधारणपणे सोयाबीनची लागवड होते. याचे एकूण क्षेत्र 5646 हेक्टर असले, तरी गेल्या खरीप हंगामात केवळ 7 टक्के अर्थात 393 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र घटत असून कापसाच्या लागवडीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील कपाशीचे एकूण क्षेत्र 4459 हेक्टर असले, तरी गेल्या खरीप हंगामात 14000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. हे क्षेत्र 9541 हजार हेक्टरने वाढलेले आहे. यामुळे 2019-20 च्या खरीप हंगामात 14 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर कपाशीच्या लागवडीचे नियोजन कृषी खात्याने केले आहे.


अपघात विमा योजनेचे 33 प्रस्ताव नामंजूर


शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपयाचे विमा संरक्षण प्राप्त आहे. 2015-16 च्या खरीप हंगामापासून ही योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेंतर्गत 58 मंजूर प्रस्तावापोटी शेतकऱ्यांच्या वारसांना विमा रक्कम देण्यात आली आहे. तर विमा कंपनीने 33 प्रस्ताव नामंजूर केले आहेत. 27 प्रस्ताव प्रलंबित आहेत. वारसांकडे प्रलंबित प्रस्तावांची संख्या 33 आहे.

गडचिरोली - खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यांसह प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी 26 हजार क्विंटल बियाणे तर 52 हजार मेट्रीक टन खत लागणार आहे. मात्र यापैकी 15 हजार क्विंटलच बियाणे महाबीजकडून प्राप्त होणार असल्याने 11 हजार क्विंटल खासगी बियाणे वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.


यावर्षीच्या खरीप हंगामात 2 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात गेल्या हंगामात 2 लाख 2 हजार 157 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यात सर्वाधिक 1 लाख 82 हजार 522 हेक्टर क्षेत्रावर धानाची पेरणी होती. तर कापूस 14 हजार, तूर 5 हजार 535, मका 983 हेक्टर, तीळ 328 हेक्टर आणि सोयाबीन 92 हेक्टर व कापूस 13 हजार 975 हेक्टर अशी पेरणी झाली होती.


यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सोयाबीन 300 क्टिंवल, तूर 350 क्विंटल, बी. टी. कापूस 197 क्विंटल, मका 144 क्विंटल, उडीद 3 क्विंटल, तीळ एक क्विंटल या प्रमाणे एकूण 27,732 क्विंटल बियाणे या हंगामात लागणार आहेत. तर 52 मेट्रीक टन खतापैकी सर्वाधिक 28025 मे. टन आवश्यकता युरिया खताची राहणार आहे. जिल्ह्यात खतांची 562 दुकाने असून किटकनाशकांची 249 तर बियाण्यांची 336 दुकाने आहेत.


खते व बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी पास मशीन आणि आधार क्रमांकांची मदत घेतली जाणार आहे. याखेरीज 13 भरारी पथकेही निर्माण करण्यात आली आहेत. मात्र यानंतरही काळाबाजार होत असल्याने कृषी विभागाला अधिक दक्ष राहावे लागणार आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1502.38 मिमी इतके आहे. गेल्या खरीप हंगामात केवळ 1355.31 म्हणजे 95.93 टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वाधिक 135.10 टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी 74.78 टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला होता.


कापसाचे क्षेत्र वाढणार


जिल्ह्यात चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांमध्ये साधारणपणे सोयाबीनची लागवड होते. याचे एकूण क्षेत्र 5646 हेक्टर असले, तरी गेल्या खरीप हंगामात केवळ 7 टक्के अर्थात 393 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र घटत असून कापसाच्या लागवडीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील कपाशीचे एकूण क्षेत्र 4459 हेक्टर असले, तरी गेल्या खरीप हंगामात 14000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. हे क्षेत्र 9541 हजार हेक्टरने वाढलेले आहे. यामुळे 2019-20 च्या खरीप हंगामात 14 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर कपाशीच्या लागवडीचे नियोजन कृषी खात्याने केले आहे.


अपघात विमा योजनेचे 33 प्रस्ताव नामंजूर


शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपयाचे विमा संरक्षण प्राप्त आहे. 2015-16 च्या खरीप हंगामापासून ही योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेंतर्गत 58 मंजूर प्रस्तावापोटी शेतकऱ्यांच्या वारसांना विमा रक्कम देण्यात आली आहे. तर विमा कंपनीने 33 प्रस्ताव नामंजूर केले आहेत. 27 प्रस्ताव प्रलंबित आहेत. वारसांकडे प्रलंबित प्रस्तावांची संख्या 33 आहे.

Intro:गडचिरोलीच्या खरीपासाठी लागणार 26 हजार क्विंटल बियाणे तर 52 हजार मेट्रीक टन खत

गडचिरोली : खरीप हंगाम तोंडावर असून शेतकरी तसेच प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी 26 हजार क्विंटल बियाणे तर 52 हजार मेट्रीक टन खत लागणार आहे. मात्र यापैकी 15 हजार क्विंटलच बियाणे महाबीजकडून प्राप्त होणार असल्याने 11 हजार क्विंटल खाजगी बियाणे वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.Body:यावर्षीच्या खरिप हंगामात 2 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्हयात गेल्या हंगामात 2 लाख 2 हजार 157 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.  यात सर्वाधिक 1 लाख 82 हजार 522 हेक्टर क्षेत्रावर धानाची पेरणी होती. तर कापूस 14 हजार , तूर 5 हजार 535, मका 983 हेक्टर, तीळ 328 हेक्टर आणि सोयाबीन 92 हेक्टर व कापूस 13 हजार 975 हेक्टर  अशी एकूण 115 टक्के पेरणी झाली होती.

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सोयाबीन 300 क्टिंवल, तूर 350 क्विंटल, बी. टी. कापूस 197 क्विंटल, मका 144 क्विंटल, उडीद 3 क्विंटल, तीळ एक क्विंटल या प्रमाणे एकूण 27,732 क्विंटल बियाणे या हंगामात लागणार आहे. तर 52 मेट्रीक टन खतापैकी सर्वाधिक 28025 मे. टन आवश्यकता युरिया खताची राहणार आहे. जिल्हयात खतांची 562 दुकाने असून किटकनाशकांची 249 तर बियाणांची 336 दुकाने आहेत.

खते व बियानांचा काळाबाजार  होवू नये यासाठी पास मशीन आणि आधार क्रमांक याची मदत घेतली जाणार आहे.  याखेरीज 13 भरारी पथकेही निर्माण करण्यात आली आहेत. मात्र यानंतरही काळाबाजार होत असल्याने कृषी विभागाला अधिक दक्ष राहावे लागणार आहे. जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान 1502.38 मिमी इतके आहे.  गेल्या खरीप हंगामात केवळ 1355.31 म्हणजे 95.93 टक्के इतका पाऊस झाला होता.  सर्वाधिक 135.10 टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी 74.78 टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला होता.
           
कापसाचे क्षेत्र वाढतेय
जिल्हयात चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांमध्ये साधारणपणे सोयाबीनची लागवड होते. याचे एकूण क्षेत्र 5646 हेक्टर असले तरी गेल्या खरिप हंगामात केवळ 7 टक्के अर्थात 393 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. जिल्हयात सोयाबीनचे क्षेत्र घटत असून कापसाच्या लागवडीचे प्रमाण वेगाने वाढत आहे.  जिल्हयातील कपाशीचे एकूण क्षेत्र 4459 हेक्टर असले तरी गेल्या खरिप हंगामात 14000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली.  हे क्षेत्र 9541 हजार हेक्टरने वाढलेले आहे. यामुळे 2019-20 च्या खरिप हंगामात 14 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर कपाशीच्या लागवडीचे नियोजन कृषी खात्याने केले आहे.
                                                
अपघात विमा योजनेचे 33 प्रस्ताव नामंजूर
शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत 2 लाख रुपयाचे विमा संरक्षण प्राप्त आहे.  2015-16 च्या खरिप हंगामापासून ही योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत 58 मंजूर प्रस्तावापोटी शेतकऱ्यांच्या वारसांना विमा रक्कम देण्यात आली आहे. तर विमा कंपनीने 33 प्रस्ताव नामंजूर केले व 27 प्रस्ताव प्रलंबित आहे.  वारसांकडे प्रलंबित प्रस्तावांची संख्या 33 आहे.Conclusion:Input desk : pls एखादा शेतात नांगरणी करत असलेलं व्हिडिओ वापरावे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.