ETV Bharat / state

धुळे: पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत

author img

By

Published : Aug 10, 2019, 6:44 PM IST

Updated : Aug 10, 2019, 9:24 PM IST

साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून 58000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. शहरातील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना तसेच शहरातील वसाहतींना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धुळे : पुराचे पाणी ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर

धुळे - साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून 58000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. शहरातील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना तसेच शहरातील वसाहतींना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धुळे: पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत

पूर परिस्थिती पाहता शहरातील ब्रिटिशकालीन मुख्य मोठा पूल देखील बंद करण्याचा निरणय घेण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता तसेच अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे असे आवाहन शहर प्रशासन करत आहे. जिल्ह्यात साक्री तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरण 100% भरले आहे.

दरम्यान, शुक्रवारीदेखील 58000 क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला होता. यामुळे पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने धुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शनिवारी हा पूर ओसरून जनजीवन पूर्वपदावर आले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, पुन्हा एकदा अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे पुरस्थिती गंभीर होण्याचे संकेत आहेत.

धुळे - साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून 58000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. शहरातील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना तसेच शहरातील वसाहतींना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धुळे: पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत

पूर परिस्थिती पाहता शहरातील ब्रिटिशकालीन मुख्य मोठा पूल देखील बंद करण्याचा निरणय घेण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता तसेच अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे असे आवाहन शहर प्रशासन करत आहे. जिल्ह्यात साक्री तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरण 100% भरले आहे.

दरम्यान, शुक्रवारीदेखील 58000 क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला होता. यामुळे पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने धुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शनिवारी हा पूर ओसरून जनजीवन पूर्वपदावर आले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, पुन्हा एकदा अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे पुरस्थिती गंभीर होण्याचे संकेत आहेत.

Intro:साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून पाच दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरु असून शहरातील नदीवरील पूर देखील ओसरल्याने शहरातील जनजीवन पूर्वपदावर आल आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून मात्र या पुरामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल आहे.


Body:धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरण साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भरल्याने या धरणातून शुक्रवारी 58 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला होता. यामुळे पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने धुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल होत. या पुरामुळे शहरातील चारही पूल पाण्याखाली गेले होते. अखेर शनिवारी हा पूर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. या पुरामुळे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. सध्या अक्कलपाडा धरणातील 5 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे.


Conclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 9:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.