ETV Bharat / state

धुळ्यातील बळीराजाला वरुणराजाची प्रतीक्षा, पावसाने फिरवली पाठ

राज्यातील मुंबई, उपनगर, कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. परंतु, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे बळीराजा ढगाकडे डोळे लावून आहे.

author img

By

Published : Jul 3, 2019, 8:22 AM IST

Updated : Jul 3, 2019, 12:17 PM IST

पावसाच्या प्रतिक्षेत मशागत करताना शेतकरी

धुळे - शहरासह तालुक्यात अजूनही पुरेशा पावसाला सुरवात झाली नसून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली असून वरुणराजा लवकरात लवकर बरसावा, अशी प्रार्थना शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

धुळ्यातील बळीराजाला वरुणराजाची प्रतीक्षा


संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली असून पावसाने हाहाकार माजवला आहे. मात्र, धुळे शहरासह तालुक्यात अजूनही पुरेशा पावसाला सुरुवात झालेली नाही. पाऊस लवकर सुरू होईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणीची तयारी केली आहे. मात्र, पावसाला अजूनही सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. यंदाही पुरेसा पाऊस न झाल्यास जीवन जगणे अधिक कठीण होईल यामुळे पावसाचे लवकरात लवकर आगमन व्हावे, अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.

धुळे - शहरासह तालुक्यात अजूनही पुरेशा पावसाला सुरवात झाली नसून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली असून वरुणराजा लवकरात लवकर बरसावा, अशी प्रार्थना शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

धुळ्यातील बळीराजाला वरुणराजाची प्रतीक्षा


संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली असून पावसाने हाहाकार माजवला आहे. मात्र, धुळे शहरासह तालुक्यात अजूनही पुरेशा पावसाला सुरुवात झालेली नाही. पाऊस लवकर सुरू होईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणीची तयारी केली आहे. मात्र, पावसाला अजूनही सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. यंदाही पुरेसा पाऊस न झाल्यास जीवन जगणे अधिक कठीण होईल यामुळे पावसाचे लवकरात लवकर आगमन व्हावे, अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.

Intro:धुळे शहरासह तालुक्यात अजूनही पुरेश्या पावसाला सुरवात झाली नसून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली असून वरुणराजा लवकरात लवकर बरसावा अशी प्रार्थना शेतकऱ्यांकडून केली जात आहे. Body:संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली असून पावसाने हाहाकार माजवला आहे, मात्र धुळे शहरासह तालुक्यात अजूनही पुरेश्या पावसाला सुरुवात झालेली नाही. पाऊस लवकर सुरू होईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणीची तयारी केली आहे.मात्र पावसाला अजूनही सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. यंदाही पुरेसा पाऊस न आल्यास जीवन जगणे अधिक कठीण होईल यामुळे पावसाचं लवकरात लवकर आगमन व्हावं अशी प्रार्थना बळीराजा करतोय.Conclusion:
Last Updated : Jul 3, 2019, 12:17 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.