ETV Bharat / state

धुळ्यातील पूरस्थिती नियंत्रणात; मात्र, चारही पूल वाहतुकीसाठी बंद

author img

By

Published : Aug 6, 2019, 3:23 PM IST

गेल्या काही दिवसामध्ये धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पांझरा नदीला पूर आला होता. मात्र, आता धुळ्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. यामध्ये पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शहरातील चारही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

धुळ्यातील पांझरा नदीवरील तुटलेला पूल

धुळे - शहरातील पांझरा नदीवरील पुराचे पाणी ओसरले आहे. धुळ्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, शहरातील चारही पुलांवरील वाहतूक अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. या पुरात पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

धुळ्यातील पूरस्थिती नियंत्रणात; मात्र, चारही पूल वाहतुकीसाठी बंद

गेल्या काही दिवसामध्ये धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणातील पाण्याचा पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी पांझरा नदीला पूर आला होता. या पुरामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी पाणी ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पुरामुळे पुलाचे कठडे पूर्णपणे तुटले आहेत. रस्तादेखील खचला आहे. रस्ता आणि पुलाचे काम त्वरीत करावे. तसेच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

धुळे - शहरातील पांझरा नदीवरील पुराचे पाणी ओसरले आहे. धुळ्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, शहरातील चारही पुलांवरील वाहतूक अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. या पुरात पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

धुळ्यातील पूरस्थिती नियंत्रणात; मात्र, चारही पूल वाहतुकीसाठी बंद

गेल्या काही दिवसामध्ये धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणातील पाण्याचा पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी पांझरा नदीला पूर आला होता. या पुरामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी पाणी ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पुरामुळे पुलाचे कठडे पूर्णपणे तुटले आहेत. रस्तादेखील खचला आहे. रस्ता आणि पुलाचे काम त्वरीत करावे. तसेच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Intro:धुळे शहरातील पांझरा नदी वरील पुराचं पाणी ओसरले असून शहरातील चारही पुलांवरील वाहतूक मात्र अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. या पुरात पुलांची मात्र मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे, ही दुरुस्ती करून लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


Body:धुळे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जल प्रकल्पांमधील पाणीसाठा पांझरा नदीपात्रात विसर्ग करण्यात आल्याने नदीला पूर आला होता. या पुरामुळे शहरातील जनजीवन गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत झालं होतं. पुराचं पाणी नदीवरील पुलांवरून वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र मंगळवारी हे पाणी ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र अद्यापही या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून पुलाच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुलावरील कठडे पूर्णपणे तुटले असून रस्तादेखील खचला आहे. रस्त्याचे काम त्वरित करून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.