ETV Bharat / state

आदर्श आचारसंहितेचे प्रत्येक विभागाने काटेकोरपणे पालन करावे - धुळे जिल्हाधिकारी

author img

By

Published : Sep 21, 2019, 10:30 PM IST

यंदा धुळे जिल्ह्यात 16 लाख 79 हजार 942 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडूक अधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली.

बैठक सुरू असतानाचे छायाचित्र

धुळे - विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून 16 लाख 79 हजार 942 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. सर्वच राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी देवराजन गंगाथरन यांनी पत्रकार परिषदेत केले.


निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान, तर 24 ऑक्टोबर 2019 ला मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाच्या प्रमुखाने सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

हेही वाचा -लाचखोर पोलीस हवालदाराचे निलंबन तर निरीक्षकाची तडकाफडकी बदली

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, फलक, पोस्टर तत्काळ काढून विहित वेळेत अहवाल सादर करावेत. माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत. सोशल मीडियाच्या नियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर स्वतंत्र पथक गठीत करण्यात येईल.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही C-Vigil या मोबाईल अॅपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. त्याच्यावर शंभर मिनिटांत कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्त कर्मचाऱ्यांना संबंधित विभागप्रमुखांनी तत्काळ कार्यमुक्त करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले.

धुळे - विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून 16 लाख 79 हजार 942 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. सर्वच राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी देवराजन गंगाथरन यांनी पत्रकार परिषदेत केले.


निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान, तर 24 ऑक्टोबर 2019 ला मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाच्या प्रमुखाने सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

हेही वाचा -लाचखोर पोलीस हवालदाराचे निलंबन तर निरीक्षकाची तडकाफडकी बदली

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, फलक, पोस्टर तत्काळ काढून विहित वेळेत अहवाल सादर करावेत. माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत. सोशल मीडियाच्या नियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर स्वतंत्र पथक गठीत करण्यात येईल.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही C-Vigil या मोबाईल अॅपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. त्याच्यावर शंभर मिनिटांत कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्त कर्मचाऱ्यांना संबंधित विभागप्रमुखांनी तत्काळ कार्यमुक्त करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले.

Intro:विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातून 16 लाख 79 हजार 942 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून सर्वच राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावं असं आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी देवराजन गंगाथरन यांनी पत्रकार परिषदेत केलं.


Body:भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान, तर 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभाग प्रमुखाने सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.


जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून विहित वेळेत अहवाल सादर करावेत. माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत. सोशल मीडियाच्या नियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर स्वतंत्र पथक गठित करण्यात येईल.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही C- Vigil या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. त्याच्यावर 100 मिनिटांत कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्त कर्मचाऱ्यांना संबंधित विभागप्रमुखांनी तत्काळ कार्यमुक्त करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.