ETV Bharat / state

'अधिकाऱ्यांच्या संगनमताने भाजपने जागा मिळवल्या'

author img

By

Published : Jan 7, 2020, 2:49 PM IST

संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बिनविरोध जागा मिळवल्या, असा आरोप माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. मात्र, भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गोटे यांचे सर्व आरोप फेटाळले.

अनिल गोटे यांचा भाजपवर आरोप
अनिल गोटे यांचा भाजपवर आरोप

धुळे - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने भाजपने बिनविरोध जागा मिळवल्या, असा आरोप माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अनिल गोटे यांचा भाजपवर आरोप

धुळे जिल्हापरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया होत आहे. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या संगनमताने शिरपूर येथे भाजपने बिनविरोध जागा मिळवल्या. भाजप सरकार हे आत्तापर्यंतचे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे, मी हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो, असेही गोटे म्हणाले.

माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गोटे यांचे सर्व आरोप फेटाळले

हेही वाचा - अवकाळी मदतीबाबत केंद्राकडून राज्याची बोळवण; मागणीपेक्षा 12 हजार 939 कोटी कमी

दरम्यान, भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गोटे यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. धुळे जिल्हा परिषदेवर भाजप वर्चस्व प्रस्थापित करेन. 15 पैकी 11 जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास भामरे यांनी व्यक्त केला आहे.

धुळे - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने भाजपने बिनविरोध जागा मिळवल्या, असा आरोप माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अनिल गोटे यांचा भाजपवर आरोप

धुळे जिल्हापरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया होत आहे. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या संगनमताने शिरपूर येथे भाजपने बिनविरोध जागा मिळवल्या. भाजप सरकार हे आत्तापर्यंतचे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे, मी हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो, असेही गोटे म्हणाले.

माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गोटे यांचे सर्व आरोप फेटाळले

हेही वाचा - अवकाळी मदतीबाबत केंद्राकडून राज्याची बोळवण; मागणीपेक्षा 12 हजार 939 कोटी कमी

दरम्यान, भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गोटे यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. धुळे जिल्हा परिषदेवर भाजप वर्चस्व प्रस्थापित करेन. 15 पैकी 11 जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास भामरे यांनी व्यक्त केला आहे.

Intro:धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने शिरपूर येथे बिनविरोध जागा मिळवल्या आहेत असा आरोप माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.Body:
धुळे जिल्हापरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले आहेत, या निवडणुकीत संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने शिरपूर येथे बिनविरोध जागा मिळवल्या आहेत ,यावर भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गोटे यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत व धुळे जिल्हापरिषदेवर भाजप वर्चस्व प्रस्थापित करणार व 15 पैकी 11 जागांवर विजय मिळवेल असा विश्वास भामरे यांनी व्यक्त केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.