ETV Bharat / state

वारंवार निवेदने देऊनही रस्त्याचे काम नाही; चिखलपारच्या महिलांचा आमदार भांगडियांवर रोष

सध्या सर्व पूरग्रस्त येथेच असून त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दहीहंडीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री भांगडिया शेतकरी भवन येथे आले होते. यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या संतापाला समोर जावे लागले.

author img

By

Published : Aug 27, 2019, 6:56 PM IST

चिखलपारच्या महिलांचा आमदार भांगडीयांवर रोष

चंद्रपूर - "आमच्या गावाला जोडणारा रस्ता नाही. पुराचा आम्हाला वारंवार फटका बसतो. त्यामुळे पक्क्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही आमदार बंटी भांगडिया यांना वारंवार निवेदने दिली. मात्र, त्यांनी आमच्या या तक्रारींना केराची टोपली दाखवली." असा संताप पुराने त्रस्त असलेल्या चिखलपार या गावातील महिलांनी व्यक्त केला.

निवेदने देऊनही केले नाही रस्त्याचे काम ; चिखलपारच्या महिलांचा आमदार भांगडीयांवर रोष

चिखलपार या गावाला सोमवारी पुराने वेढले होते. उपविभागीय अधिकारी बेहरे यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे येथे दुपारपासूनच बचावकार्य सुरू झाले. सोमवारी रात्री अकरा वाजेपर्यंत हे काम सुरू होते. मात्र, याच वेळी आमदार भांगडिया हे स्वतःच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. ते गावात फिरकले सुद्धा नाही. या सर्व पूरग्रस्तांना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्यात आले. सध्या सर्व पूरग्रस्त येथेच असून त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दहीहंडीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री भांगडिया शेतकरी भवन येथे आले होते. यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या संतापाला समोर जावे लागले. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही भांगडीया यांना रस्त्याची वारंवार मागणी करीत आहोत. यासाठी त्यांना अनेक निवेदने दिली. हळदी-कुंकू कार्यक्रमात त्यांना आवर्जून आठवण करून दिली. तरीही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. आमच्या गावाचे पाच वर्षे अस्तित्व नसते. मग अचानक निवडणूका आल्या की निव्वळ आश्वासन दिले जाते. असे सांगत या महिलांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

चंद्रपूर - "आमच्या गावाला जोडणारा रस्ता नाही. पुराचा आम्हाला वारंवार फटका बसतो. त्यामुळे पक्क्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही आमदार बंटी भांगडिया यांना वारंवार निवेदने दिली. मात्र, त्यांनी आमच्या या तक्रारींना केराची टोपली दाखवली." असा संताप पुराने त्रस्त असलेल्या चिखलपार या गावातील महिलांनी व्यक्त केला.

निवेदने देऊनही केले नाही रस्त्याचे काम ; चिखलपारच्या महिलांचा आमदार भांगडीयांवर रोष

चिखलपार या गावाला सोमवारी पुराने वेढले होते. उपविभागीय अधिकारी बेहरे यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे येथे दुपारपासूनच बचावकार्य सुरू झाले. सोमवारी रात्री अकरा वाजेपर्यंत हे काम सुरू होते. मात्र, याच वेळी आमदार भांगडिया हे स्वतःच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. ते गावात फिरकले सुद्धा नाही. या सर्व पूरग्रस्तांना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्यात आले. सध्या सर्व पूरग्रस्त येथेच असून त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दहीहंडीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री भांगडिया शेतकरी भवन येथे आले होते. यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या संतापाला समोर जावे लागले. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही भांगडीया यांना रस्त्याची वारंवार मागणी करीत आहोत. यासाठी त्यांना अनेक निवेदने दिली. हळदी-कुंकू कार्यक्रमात त्यांना आवर्जून आठवण करून दिली. तरीही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. आमच्या गावाचे पाच वर्षे अस्तित्व नसते. मग अचानक निवडणूका आल्या की निव्वळ आश्वासन दिले जाते. असे सांगत या महिलांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Intro:चंद्रपुर : "आमच्या गावाला जोडणारा रस्ता नाही. पुराचा आम्हाला वारंवार फटका बसतो. त्यामुळे एका पक्क्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही स्थानिक आमदार बंटी भांगडिया यांना वारंवार निवेदने दिली. मात्र, त्यांनी आमच्या या तक्रारींना केराची टोपली दाखवली." असा संताप पुराने त्रस्त असलेल्या चिखलपार या गावातील महिलांनी व्यक्त केला.

चिखलपार या गावाला कालपासूनच पुराने वेढलेले होते. उपविभागीय अधिकारी बेहरे यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे येथे दुपारपासूनच बचावकार्य सुरू झाले. काल रात्री अकरा वाजेपर्यंत हे काम सुरू होते. मात्र याच वेळी आमदार भांगडिया हे स्वतःच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. ते गावात फिरकले सुद्धा नाही. या सर्व पूरग्रस्तांना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्यात आले. सध्या सर्व पूरग्रस्त येथेच असून त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आले दहीहंडीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काल रात्री भांगडिया शेतकरी भवन येथे आले होते मात्र यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या संतापाला समोर जावे लागले. आजही हा संताप अनेक महिलांनी बोलून दाखविला. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही भांगडीया यांना रस्त्याची वारंवार मागणी करीत आहोत. यासाठी त्यांना अनेक निवेदने दिलीत. हळदी-कुंकू कार्यक्रमात त्यांना आवर्जून आठवण करून दिली मात्र, त्यांनी लक्ष दिले नाही. आमच्या गावाचे पाच वर्षे अस्तित्व नसते. मग अचानक निवडणूका आल्या की निव्वळ आश्वासन दिले जाते. एका व्हिडीओत या महिला आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. बघा हा व्हिडीओ.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.