ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना धान्य वाटपाचे आदेश; शिक्षकांसमोर संभ्रम

author img

By

Published : Apr 5, 2020, 8:15 PM IST

शिक्षण विभागातून निघालेल्या परिपत्रकानुसार शालेय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शिल्लक असलेले अन्नधान्य वाटप करण्याबाबत सक्तीचे आदेश सर्व शाळांना धडकले आहेत. त्यामुळे संचारबंदीत बाहेर निघायचे कसे असा प्रश्न शिक्षकांसमोर पडला आहे.

चंद्रपूर चंद्रपूर
चंद्रपूर

चंद्रपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात संचारबंदीही सुरू आहे. घराबाहेर निघू नका, घरातच सुरक्षित रहा, असे सक्तीचे आदेशही सर्वांना देण्यात आले आहेत. मात्र, शिक्षण विभागातून निघालेल्या परिपत्रकानुसार शालेय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शिल्लक असलेले अन्नधान्य वाटप करण्याबाबत सक्तीचे आदेश सर्व शाळांना धडकले आहेत. त्यामुळे संचारबंदीत बाहेर निघायचे कसे? असा प्रश्न शिक्षकांसमोर पडला आहे.

राज्यात विषाणू संसर्ग टाळण्यासाठी 31 मार्चपर्यंत शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर देश लॉकडाऊन झाल्यामुळे 14 एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या सुट्ट्यांच्या कालावधीत शिक्षण विभागाने मध्यान्न भोजन योजनेंतर्गत शिल्लक असलेले अन्नधान्य, कडधान्य, डाळी याचे वाटप करण्याचे आदेश शाळांना प्राप्त झाले आहेत. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर द्विधा मनस्थिती आहे. संचारबंदी सुरू असल्यामुळे बाहेर निघू नये, असे सक्तीचे आदेश आहेत. अशातच एक ते आठ वर्गापर्यंत असणाऱ्या शाळांमध्ये शालेय मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शिल्लक असलेले अन्नधान्य, कडधान्य व डाळी यांचे वितरण करण्याचे सक्तीचे आदेश आले आहेत.

धान्य वितरीत करताना शक्यतो विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवण्याच्या सूचना आहेत. शिवाय पालकांना धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्स राखण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. नियमाचे पालन न करणाऱ्या मुख्याध्यापकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे पालकांशी संपर्क साधून त्यांना शाळेत बोलावून अन्नधान्याचे वितरण करणे शाळांना बंधनकारक झालेले आहे. एकीकडे संचारबंदी आणि दुसरीकडे अन्नधान्य वाटप करण्याचे शिक्षण विभागाचे पत्र यामुळे मुख्याध्यापक संभ्रमात आहेत.

शालेय मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शिल्लक असलेला अन्न-धान्यसाठा गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाचे पत्र आहे. सर्व शाळांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. अन्नधान्याचे वाटप करत असताना कोरोना संसर्ग पसरू नये, याची दक्षता घेण्याबाबतच्या स्पष्ट सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत, असे राजुराचे गट शिक्षणाधिकारी विजय परचाके यांनी सांगितले.

एकीकडे संचार बंदी आहे. बाहेर निघण्यास कुठलीही अधिकृत परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गावबंदी करण्यात आलेली अनेक गावे आहेत. अशा स्थितीत मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी अनधान्य वाटप कसे करावे, याबाबत संभ्रम आहे. बाहेर पोलीस कारवाई झाल्यास शिक्षकांनी काय जबाब द्यावा. शिवाय अन्यधान्य वाटप करताना सूचनेनुसार विद्यार्थ्यी किंवा पालकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ अधिकारी याबाबत स्पष्ट सांगायला तयार नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने लॉकडाऊन नंतर धान्य वितरित करायला पाहिजे होते, असे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती राजुराचे तालुकाध्यक्ष संजय चिडे म्हणाले.

चंद्रपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात संचारबंदीही सुरू आहे. घराबाहेर निघू नका, घरातच सुरक्षित रहा, असे सक्तीचे आदेशही सर्वांना देण्यात आले आहेत. मात्र, शिक्षण विभागातून निघालेल्या परिपत्रकानुसार शालेय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शिल्लक असलेले अन्नधान्य वाटप करण्याबाबत सक्तीचे आदेश सर्व शाळांना धडकले आहेत. त्यामुळे संचारबंदीत बाहेर निघायचे कसे? असा प्रश्न शिक्षकांसमोर पडला आहे.

राज्यात विषाणू संसर्ग टाळण्यासाठी 31 मार्चपर्यंत शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर देश लॉकडाऊन झाल्यामुळे 14 एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या सुट्ट्यांच्या कालावधीत शिक्षण विभागाने मध्यान्न भोजन योजनेंतर्गत शिल्लक असलेले अन्नधान्य, कडधान्य, डाळी याचे वाटप करण्याचे आदेश शाळांना प्राप्त झाले आहेत. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर द्विधा मनस्थिती आहे. संचारबंदी सुरू असल्यामुळे बाहेर निघू नये, असे सक्तीचे आदेश आहेत. अशातच एक ते आठ वर्गापर्यंत असणाऱ्या शाळांमध्ये शालेय मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शिल्लक असलेले अन्नधान्य, कडधान्य व डाळी यांचे वितरण करण्याचे सक्तीचे आदेश आले आहेत.

धान्य वितरीत करताना शक्यतो विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवण्याच्या सूचना आहेत. शिवाय पालकांना धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्स राखण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. नियमाचे पालन न करणाऱ्या मुख्याध्यापकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे पालकांशी संपर्क साधून त्यांना शाळेत बोलावून अन्नधान्याचे वितरण करणे शाळांना बंधनकारक झालेले आहे. एकीकडे संचारबंदी आणि दुसरीकडे अन्नधान्य वाटप करण्याचे शिक्षण विभागाचे पत्र यामुळे मुख्याध्यापक संभ्रमात आहेत.

शालेय मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शिल्लक असलेला अन्न-धान्यसाठा गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाचे पत्र आहे. सर्व शाळांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. अन्नधान्याचे वाटप करत असताना कोरोना संसर्ग पसरू नये, याची दक्षता घेण्याबाबतच्या स्पष्ट सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत, असे राजुराचे गट शिक्षणाधिकारी विजय परचाके यांनी सांगितले.

एकीकडे संचार बंदी आहे. बाहेर निघण्यास कुठलीही अधिकृत परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गावबंदी करण्यात आलेली अनेक गावे आहेत. अशा स्थितीत मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी अनधान्य वाटप कसे करावे, याबाबत संभ्रम आहे. बाहेर पोलीस कारवाई झाल्यास शिक्षकांनी काय जबाब द्यावा. शिवाय अन्यधान्य वाटप करताना सूचनेनुसार विद्यार्थ्यी किंवा पालकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ अधिकारी याबाबत स्पष्ट सांगायला तयार नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने लॉकडाऊन नंतर धान्य वितरित करायला पाहिजे होते, असे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती राजुराचे तालुकाध्यक्ष संजय चिडे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.