ETV Bharat / state

गोंडपिपरी, पोंभुर्णा तालुक्यात पावसाचा कहर; नाल्याला पूर, वीज कोसळून शेतकरी ठार

author img

By

Published : Jan 3, 2020, 10:22 AM IST

Updated : Jan 3, 2020, 10:44 AM IST

गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. गोंडपिपरी तालुक्यात शेतात पाणी साचून रब्बी पिकांचे नुकसान झाले तर, पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाब्यात सकाळी वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

chandrapur
अवकाळी पावसाचे थैमान

चंद्रपूर - जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असतानाच अचानक पावसाने जोर धरला आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने गोंडपिपरी तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. नाल्याला पूर आला तर हरबरा, गहू, मूग पिकात पाणी साचले. वादळी पावसाने कापूस गळला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथे वीज कोसळल्याने एक शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे.

अवकाळी पावसाचे थैमान

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण, आणि गारवाही होता. यातच गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. ऐन थंडीच्या दिवसात जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस बरसल्याने कोरडे नाले वाहू लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावात सकाळी वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राम्मन्नी देवलोहट (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातून परत येत असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा - अहिरांच्या 'खदखदी'तून मुनगंटीवारांवर कटाक्ष; आत्मचिंतन करण्याचे केले आवाहन

पावसामुळे जिल्ह्यात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. हरभरा, गहू, मूग, तूर, लाखेच्या शेतात पावसाचे पाणी साचले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अजूनही पावसाची रिपरिप सुरूच असून आज दुपारपर्यंत वातावरण असेच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा - ऐन थंडीत पाऊस, रेनकोट घालावा की स्वेटर? चंद्रपूरकरांना प्रश्न

चंद्रपूर - जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असतानाच अचानक पावसाने जोर धरला आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने गोंडपिपरी तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. नाल्याला पूर आला तर हरबरा, गहू, मूग पिकात पाणी साचले. वादळी पावसाने कापूस गळला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथे वीज कोसळल्याने एक शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे.

अवकाळी पावसाचे थैमान

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण, आणि गारवाही होता. यातच गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. ऐन थंडीच्या दिवसात जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस बरसल्याने कोरडे नाले वाहू लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावात सकाळी वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राम्मन्नी देवलोहट (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातून परत येत असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा - अहिरांच्या 'खदखदी'तून मुनगंटीवारांवर कटाक्ष; आत्मचिंतन करण्याचे केले आवाहन

पावसामुळे जिल्ह्यात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. हरभरा, गहू, मूग, तूर, लाखेच्या शेतात पावसाचे पाणी साचले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अजूनही पावसाची रिपरिप सुरूच असून आज दुपारपर्यंत वातावरण असेच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा - ऐन थंडीत पाऊस, रेनकोट घालावा की स्वेटर? चंद्रपूरकरांना प्रश्न

Intro:गोंडपिपरी तालूक्याला पावसाने झोडपले;नाल्याला पुर;रब्बी पिकांचे नुकसान;विज कोसळल्याने इसम ठार

चंद्रपुर

चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्याला पावसाने झोडपुन काढले. नाल्याला पुर आला तर हरबरा,गहू,मुंग पिकात पाणी साचले आहे. वादळी पावसाने कापुस गळला आहे. बळिराजाचाचे मोठे नुकसान झाले आहे.लगतचा पोंभुर्णा तालूक्यातील चिंतल धाबा येथे विज कोसळल्याने शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे.

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळं रब्बी पिकांचं नुकसान होण्याची मोठी शक्यता निर्माण झालीय. गेले दोन दिवस ढगाळी वातावरण होतं. गारवाही होता. आणि आज मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. ऐन थंडीच्या दिवसात पाऊस आल्यानं पिकांवर मोठं संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस बरसल्यानं कोरडे नाले वाहू लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील रब्बी पीक हरभरा, गहू, मूग, तूर, लाख यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. अजूनही पावसाची रिपरिप सुरू असून, आज दुपारपर्यंत वातावरण असंच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पोम्भूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावात सकाळी वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, शेतातून परत येत असताना वीज पडून मृतकाचा नाव राम्मन्नी देवलोहट वय (55) यांचा मृत्यू झाला. तर गोंडपिपरी तालूक्यात जोरदार पाऊस बरसला. नाल्याला पुर आला.हरबरा,गहू,मुंग पिके पाण्याखाली आली आहेत.त्यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.Body:विडीओConclusion:
Last Updated : Jan 3, 2020, 10:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.