ETV Bharat / politics

मुख्यमंत्री आवरा त्यांना…”, मनोज जरांगे पाटील यांचा 'कुणासाठी' इशारा? - JARANGE PATIL ON DHANANJAY MUNDE

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी आज पुण्यात मोर्चा काढण्यात आलाय.

Somnath Suryavanshi, Manoj Jarange, Dhananjay Munde
सोमनाथ सूर्यवंशी, मनोज जरांगे, धनंजय मुंडे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2025, 4:06 PM IST

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्य नव्हे तर देशभर बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण गाजत आहे. देशमुख यांच्यासह परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी (somnath suryavanshi) यांच्या न्यायासाठी राज्यभर आंदोलने उभारली जात आहेत. अशातच रविवारी (५ जानेवारी) देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी पुण्यात मोर्चा निघाला आहे. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी, संताप व्यक्त केला.


सकल मराठा समाजाकडून मोर्चा : सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच या घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. तसंच विविध पक्षाचे राजकीय नेते, मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.

मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)


काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? : “धनंजय मुंडे शहाणा हो. मुख्यमंत्री आवरा यांना नाहीतर आम्ही थांबणार नाही. धनंजय मुंडे आमचे लोक तुला अडकवतील. ज्या मराठ्यांनी तुला वाचवलं, त्यावर तू पलटला. प्रति मोर्चे काढले तर आम्ही देखील तसंच उत्तर देऊ. आम्ही देखील मोर्चाने उत्तर देवू. क्रूर हत्या केली. यांना नक्की राज्य कुठं न्यायचं आहे. राज्यभरात मराठा मोर्चे काढू, हा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, अजून बोललो नाही. तुमच्या सरकारमध्ये राहून याला जातीय तेढ निर्माण करायची आहे”, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

नाही तर असा संदेश जाईल : वाल्मीक कराडला खूनात आरोपी करावंच लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना हे करावं लागणार आहे. त्यांना दाखवावं लागेल की मी मंत्र्याच्या पाठीशी नाही. तसंच यातील एकही आरोपी सुटला तसंच त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. तसंच सध्या तरी सरकारवर कोणाचाही दबाव आहे असं वाटत नाही. पण ज्या दिवशी आरोपी सुटला असं आढळलं तर, तेव्हा मराठ्यांची फसवणूक झाली आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना उघळ्यावर सोडून देण्यात आलं असं म्हणावं लागेल, असं यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा -

  1. "हा मजा घेण्याचा प्रश्न नाही"; जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
  2. जरांगे पाटलांचं नव्या सरकारला आवाहन; 'सामूहिक आमरण उपोषणा'च्या तारखेची उद्या करणार घोषणा
  3. एक महिना थांबा, मराठा काय आहेत ते कळेल! पत्रकारांवर टोलेबाजी करत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्य नव्हे तर देशभर बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण गाजत आहे. देशमुख यांच्यासह परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी (somnath suryavanshi) यांच्या न्यायासाठी राज्यभर आंदोलने उभारली जात आहेत. अशातच रविवारी (५ जानेवारी) देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी पुण्यात मोर्चा निघाला आहे. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी, संताप व्यक्त केला.


सकल मराठा समाजाकडून मोर्चा : सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच या घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. तसंच विविध पक्षाचे राजकीय नेते, मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.

मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)


काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? : “धनंजय मुंडे शहाणा हो. मुख्यमंत्री आवरा यांना नाहीतर आम्ही थांबणार नाही. धनंजय मुंडे आमचे लोक तुला अडकवतील. ज्या मराठ्यांनी तुला वाचवलं, त्यावर तू पलटला. प्रति मोर्चे काढले तर आम्ही देखील तसंच उत्तर देऊ. आम्ही देखील मोर्चाने उत्तर देवू. क्रूर हत्या केली. यांना नक्की राज्य कुठं न्यायचं आहे. राज्यभरात मराठा मोर्चे काढू, हा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, अजून बोललो नाही. तुमच्या सरकारमध्ये राहून याला जातीय तेढ निर्माण करायची आहे”, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

नाही तर असा संदेश जाईल : वाल्मीक कराडला खूनात आरोपी करावंच लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना हे करावं लागणार आहे. त्यांना दाखवावं लागेल की मी मंत्र्याच्या पाठीशी नाही. तसंच यातील एकही आरोपी सुटला तसंच त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. तसंच सध्या तरी सरकारवर कोणाचाही दबाव आहे असं वाटत नाही. पण ज्या दिवशी आरोपी सुटला असं आढळलं तर, तेव्हा मराठ्यांची फसवणूक झाली आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना उघळ्यावर सोडून देण्यात आलं असं म्हणावं लागेल, असं यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा -

  1. "हा मजा घेण्याचा प्रश्न नाही"; जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
  2. जरांगे पाटलांचं नव्या सरकारला आवाहन; 'सामूहिक आमरण उपोषणा'च्या तारखेची उद्या करणार घोषणा
  3. एक महिना थांबा, मराठा काय आहेत ते कळेल! पत्रकारांवर टोलेबाजी करत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.