ETV Bharat / state

चंद्रपूर : रामाळा तलाव सफाई प्रकल्पाचा फज्जा, उद्घाटनाच्या दिवशीच बोट बुडाली

रामाळा तलावाच्या सफाईसाठी आणलेली 'केवट' नावाची बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्याची नामुष्की मनपा प्रशासनावर ओढवली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमात उपस्थित न झाल्याने ते बचावले आहेत.

author img

By

Published : Jul 25, 2019, 7:50 PM IST

रामाळा तलावाच्या सफाईसाठी आणलेली 'केवट' नावाची बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली.

चंद्रपूर - शहरातील रामाळा तलाव सफाई मोहिमेची उद्घाटनाआधीच फजिती झाली आहे. तलावाच्या सफाईसाठी आणलेली 'केवट' नावाची बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्याची मनपा प्रशासनावर नामुष्की ओढवली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमात उपस्थित न झाल्याने ते बचावले आहेत.

जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामाळा तलाव आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ केला जाणार होता. या प्रकल्पाचे उद्घाटन आज(दि. २५ जुलै) दुपारी अडीच वाजता होणार होते. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवणार होते.

रामाळा तलावाच्या सफाईसाठी आणलेली 'केवट' नावाची बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली.

मुनगंटीवार यांचा निर्देशानुसार जिल्हाधिकारी कुणाल खेमणार व आयुक्त संजय काकडे यांनी वेळोवेळी संबंधित प्रकल्पासाठी बैठकी घेतल्या होत्या. तलाव स्वच्छता व शुद्धीकरणाचे विविध उपाय यादरम्यान तपासण्यात आल्यानंतर १ महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर 'केवट' ही बोट मागवण्यात आली. 'ओमीओम क्लीनटेक' या कंपनीने ही बोट तयार केली असून, पाणी सफाई तसेच शुद्धीकरण असे विविध काम करणारी ही भारतातील पहिलीच बोट आहे. या एक महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील पाण्यावरील तरंगणारा तसेच खोलात असलेला कचरा साफ करण्याचे काम बोटीद्वारे करण्यात येणार आहे.

या अभिनव प्रयोगाची मुहूर्तमेढ आज अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार होती. मात्र, ऐनवेळी ह्या बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उद्घाटनाआधीच बोट बुडाली. याची माहिती मिळाल्याने मुनगंटीवार यांनी उद्घाटनस्थळी येण्याचे टाळले.

चंद्रपूर - शहरातील रामाळा तलाव सफाई मोहिमेची उद्घाटनाआधीच फजिती झाली आहे. तलावाच्या सफाईसाठी आणलेली 'केवट' नावाची बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्याची मनपा प्रशासनावर नामुष्की ओढवली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमात उपस्थित न झाल्याने ते बचावले आहेत.

जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामाळा तलाव आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ केला जाणार होता. या प्रकल्पाचे उद्घाटन आज(दि. २५ जुलै) दुपारी अडीच वाजता होणार होते. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवणार होते.

रामाळा तलावाच्या सफाईसाठी आणलेली 'केवट' नावाची बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली.

मुनगंटीवार यांचा निर्देशानुसार जिल्हाधिकारी कुणाल खेमणार व आयुक्त संजय काकडे यांनी वेळोवेळी संबंधित प्रकल्पासाठी बैठकी घेतल्या होत्या. तलाव स्वच्छता व शुद्धीकरणाचे विविध उपाय यादरम्यान तपासण्यात आल्यानंतर १ महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर 'केवट' ही बोट मागवण्यात आली. 'ओमीओम क्लीनटेक' या कंपनीने ही बोट तयार केली असून, पाणी सफाई तसेच शुद्धीकरण असे विविध काम करणारी ही भारतातील पहिलीच बोट आहे. या एक महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील पाण्यावरील तरंगणारा तसेच खोलात असलेला कचरा साफ करण्याचे काम बोटीद्वारे करण्यात येणार आहे.

या अभिनव प्रयोगाची मुहूर्तमेढ आज अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार होती. मात्र, ऐनवेळी ह्या बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उद्घाटनाआधीच बोट बुडाली. याची माहिती मिळाल्याने मुनगंटीवार यांनी उद्घाटनस्थळी येण्याचे टाळले.

Intro:चंद्रपूर : रामाळा तलावाच्या सफाई मोहिमेचा उद्घाटनाच्या आधीच फज्जा झाला. रामाळा तलावाच्या सफाई साठी आणलेली "केवट" ही बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम स्थगित करण्याची मनपा वर नामुष्की ओढविलो. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमात उपस्थित न झाल्याने सुदैवाने ते बचावलेBody:जिल्हा प्रशासन, चंद्रपूर शहर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामाळा तलाव आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ केला जाणार होता. या प्रकल्पाचे उदघाटन आज दुपारी अडीच वाजता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार होते. मुनगंटीवार यांचा निर्देशानुसार जिल्हाधिकारी कुणाल खेमणार व आयुक्त श्री. संजय काकडे यांनी याकरीता वेळोवेळी बैठकी घेतल्या. तलाव स्वच्छता व शुद्धीकरणाचे विविध उपाय यादरम्यान तपासण्यात आल्यानंतर १ महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर " केवट " ही बोट मागविण्यात आली. ओमीओम क्लीनटेक या कंपनीद्वारे सदर बोट तयार करण्यात आली असून पाणी सफाई, पाण्याचे शुद्धीकरण असे विविध कार्य करणारी भारतातील पहिलीच बोट आहे. या १ महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील पाण्याची संपूर्ण स्वच्छता याद्वारे करण्यात येणार आहे. पाण्यावरील तरंगणारा, खोलात असलेला कचरा व गाळ साफ करण्याचे काम बोटीद्वारे करण्यात येणार आहे. रामाळा तलावातील पाणी सध्या दर्शनीय हिरवे असून बोटीद्वारे निरंतर स्वच्छतेनंतर तलावाचे पाणी स्वच्छ होण्यास मदत होते. या अभिनव प्रयोगाची मुहूर्तमेढ आज अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार होती. मात्र, ऐनवेळी ह्या बोटेत तांत्रिक बिघाड आल्याने उद्घाटनापुर्वीच बोट बुडाली. याची माहिती मिळाल्याने मुनगंटीवार उद्घाटनस्थळी आलेच नाही.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.