ETV Bharat / state

शेतकऱ्यांनं जगावं की मरावं हा एकच प्रश्न...खराटे कुटूंबीयांची व्यथा

सुभाष खराटे या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतरही या कुटूंबीयाची अवहेलना संपली नाही.

author img

By

Published : Jun 21, 2019, 2:12 PM IST

समाधान खराटे

बुलडाणा - सततच्या नापिकीनं कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जीव वाचवण्यासाठी पैसा नसल्यानं डॉक्टरानं उपचारच थांबवले. . . . . डॉक्टरनं उपचार थांबवल्यानं घराचा आधार डोळ्यादेखत कोलमडून पडला. . . . .सारं जग पोरकं झालं. . . . .कुटूंब उघड्यावर आलं . . . पण कोणाला त्याचं काहीच सोयरं सूतक नव्हतं. . . .ही काही एखाद्या चित्रपटाची कथा नाही. . . .तर हे वास्तव आहे मूर्ती गावातील कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी सुभाष खराटेंचं. . . .

समाधान खराटे


खराटेकडं साडेतीन एकर ओलीती शेती आहे. पीक कर्जासाठी महाराष्ट्र बँकेचं 1 लाख 20 हजार, सस्टेनेबल अॅग्रो-कामर्शिल फायनन्सचं 1 लाख 20 हजार तर सावकाराकडून 40 हजार रुपयांचं कर्ज सुभाष खराटेंनी घेतलं होतं. मात्र सततच्या नापिकीमुळं डोक्यावर कर्जाचं ओझं वाढल्यानं सुभाष खराटे यांनी विष पिऊन 18 ऑगस्टला आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा जीव वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी बुलडाण्यातील डॉ. मेहेत्रेंच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. . त्यानंतर मात्र 28 ऑगस्ट 2018 रोजी मेहेत्रे रुग्णालयाकडून साध्या कागदावर 1 लाख 7 हजार रुपयांचं रुग्णालयाचं आणि 45 हजार रुपये बिल औषधांचं लिहून दिलं. त्यावेळी डॉक्टर मेहेत्रेंना आयसीयूमध्ये भेटून माझ्या आईनं आमच्याकडं एव्हढे पैसे नाहीत, म्हणून माझ्या बाबाला सुट्टी द्या, आम्ही त्यांना सरकारी रुग्णालयात भरती करतो असं सांगितलं. त्यावर डॉक्टरांनी माझ्या आईला आयसीयूमध्येच पूर्ण पैसे भरण्यासाठी सांगितलं. मी आणि माझ्या आईनं डॉक्टर मेहेत्रेंना पैसे नसल्याचं सांगत सुट्टी देण्याची वारंवार विनंती केली. मात्र पैसे नसल्यानं डॉक्टरांनी माझ्या वडिलांचा 28 ऑगस्टपासून उपचार थांबविल्याचा आरोप समाधाननं केला.


याबाबत जिल्हाधिकऱ्यांकडे 31 ऑगस्ट 2018 ला आमची कैफियत मांडली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही डॉक्टर मेहेत्रे आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन करून तेथून माझ्या बाबाची सुट्टी करून घेण्याचे आदेश दिले. मात्र डॉक्टर मेहेत्रेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुमानलं नाही. परिणामी माझ्या वडिलांचा 1 सप्टेंबर 2018 रोजी मेहेत्रे रुग्णालयातच मृत्यू झाल्याचा आरोप समाधाननं केलाय. त्यानं बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर मेहेत्रेंनी उपचार थांबविल्यामुळं वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. डॉक्टरांच्या त्री सदस्यीय समितीनं चौकशी अहवालात डॉ. मेहेत्रेंवर हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाच्या ठपक्यासह गंभीर स्वरूपाचे खुलासे करण्यात आले आहेत. तरीही पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप, समाधाननं केला आहे.


सध्या खरीप हंगाम सुरू असून समाधानकडं पेरणीला पैसे नाहीत. त्याला आता सावकारांकडून व्याजानं कर्ज घ्यावं लागणार आहे. एकीकडं सरकारही शेतकऱ्याच्या पाठिशी असल्याचं सांगते. तर दुसरीकडं राज्यातील शेतकऱ्यांची अशी दैना आहे. कर्जापायी बापानं आत्महत्या केली. मात्र बापाची सावली तर गेलीच दुसरीकडं कर्ज आहे तसंच आहे. ते सगळं कर्ज समाधानच्या डोक्यावर आलंय. त्यामुळं शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा सवाल उपस्थित होत आहे....

बुलडाणा - सततच्या नापिकीनं कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जीव वाचवण्यासाठी पैसा नसल्यानं डॉक्टरानं उपचारच थांबवले. . . . . डॉक्टरनं उपचार थांबवल्यानं घराचा आधार डोळ्यादेखत कोलमडून पडला. . . . .सारं जग पोरकं झालं. . . . .कुटूंब उघड्यावर आलं . . . पण कोणाला त्याचं काहीच सोयरं सूतक नव्हतं. . . .ही काही एखाद्या चित्रपटाची कथा नाही. . . .तर हे वास्तव आहे मूर्ती गावातील कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी सुभाष खराटेंचं. . . .

समाधान खराटे


खराटेकडं साडेतीन एकर ओलीती शेती आहे. पीक कर्जासाठी महाराष्ट्र बँकेचं 1 लाख 20 हजार, सस्टेनेबल अॅग्रो-कामर्शिल फायनन्सचं 1 लाख 20 हजार तर सावकाराकडून 40 हजार रुपयांचं कर्ज सुभाष खराटेंनी घेतलं होतं. मात्र सततच्या नापिकीमुळं डोक्यावर कर्जाचं ओझं वाढल्यानं सुभाष खराटे यांनी विष पिऊन 18 ऑगस्टला आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा जीव वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी बुलडाण्यातील डॉ. मेहेत्रेंच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. . त्यानंतर मात्र 28 ऑगस्ट 2018 रोजी मेहेत्रे रुग्णालयाकडून साध्या कागदावर 1 लाख 7 हजार रुपयांचं रुग्णालयाचं आणि 45 हजार रुपये बिल औषधांचं लिहून दिलं. त्यावेळी डॉक्टर मेहेत्रेंना आयसीयूमध्ये भेटून माझ्या आईनं आमच्याकडं एव्हढे पैसे नाहीत, म्हणून माझ्या बाबाला सुट्टी द्या, आम्ही त्यांना सरकारी रुग्णालयात भरती करतो असं सांगितलं. त्यावर डॉक्टरांनी माझ्या आईला आयसीयूमध्येच पूर्ण पैसे भरण्यासाठी सांगितलं. मी आणि माझ्या आईनं डॉक्टर मेहेत्रेंना पैसे नसल्याचं सांगत सुट्टी देण्याची वारंवार विनंती केली. मात्र पैसे नसल्यानं डॉक्टरांनी माझ्या वडिलांचा 28 ऑगस्टपासून उपचार थांबविल्याचा आरोप समाधाननं केला.


याबाबत जिल्हाधिकऱ्यांकडे 31 ऑगस्ट 2018 ला आमची कैफियत मांडली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही डॉक्टर मेहेत्रे आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन करून तेथून माझ्या बाबाची सुट्टी करून घेण्याचे आदेश दिले. मात्र डॉक्टर मेहेत्रेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुमानलं नाही. परिणामी माझ्या वडिलांचा 1 सप्टेंबर 2018 रोजी मेहेत्रे रुग्णालयातच मृत्यू झाल्याचा आरोप समाधाननं केलाय. त्यानं बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर मेहेत्रेंनी उपचार थांबविल्यामुळं वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. डॉक्टरांच्या त्री सदस्यीय समितीनं चौकशी अहवालात डॉ. मेहेत्रेंवर हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाच्या ठपक्यासह गंभीर स्वरूपाचे खुलासे करण्यात आले आहेत. तरीही पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप, समाधाननं केला आहे.


सध्या खरीप हंगाम सुरू असून समाधानकडं पेरणीला पैसे नाहीत. त्याला आता सावकारांकडून व्याजानं कर्ज घ्यावं लागणार आहे. एकीकडं सरकारही शेतकऱ्याच्या पाठिशी असल्याचं सांगते. तर दुसरीकडं राज्यातील शेतकऱ्यांची अशी दैना आहे. कर्जापायी बापानं आत्महत्या केली. मात्र बापाची सावली तर गेलीच दुसरीकडं कर्ज आहे तसंच आहे. ते सगळं कर्ज समाधानच्या डोक्यावर आलंय. त्यामुळं शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा सवाल उपस्थित होत आहे....

Intro:nullBody:एक दिवस बळीराजासोबत .....


स्टोरी:- बुलडाण्यातील मृतक शेतकरी खराटेंच्या कुटूंबियांची अशीही वैथा, शेतकऱ्यांनी जगाव की मरावं हा एकच प्रश्न...

बुलडाणा:- 3 ते 4 वर्षांपासून सतत च्या नापिकीमुळे कर्जाच्या वाढता डोगराला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न आणि जीव वाचवण्यासाठी पैसा नसल्याने डॉक्टराने उपचार थांबविणे परिणामी मृत्यू होणे ही काही चित्रपटातील कथा नसून बुलडाण्यातील मोताळा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या मूर्ती गावातील कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी सुभाष खराटेंची आहे वैथा, उपचारासाठी पैसे उपलब्ध नसल्यामुळे वडिलांचा उपचार थांबविल्यामुळे वडीलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत मृतुक शेतकरी सुभाष खरटेंच्या मुलगा समाधान खराटेंनी दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून आणि जिल्हा सामन्य रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या त्री सदस्य समितीने डॉक्टर दोषी असल्याचा अहवाल दिल्यावरही दोषी डॉक्टरावर कार्रवाई होत नाहीय डॉक्टरावर कार्रवाईसाठी जिल्हा प्रशासनानकडे समाधान खराटे उबरठे झिझवत आहे तरीही शेतकऱ्याच्या कुटूंबियांना न्याय मिळत नाही.तर खरीप हंगामात समाधानकडे पेरणी साठी बियानेसाठी पैसे नसल्याने तो सावकारांकडे चकरा मारत आहे यामुळेच शेतकऱ्यांनी जगाव की मरावं हा एकच प्रश्न? या प्रश्नाखाली ईटीव्ही भारतच्या स्पेशल शो मध्ये आपण मुर्ती येथील मृतुक शेतकरी खराटे यांच्या कुटूंबियांची वैथेचा स्पेशल रिपोर्ट पाहणार आहे.

हा आहे मूर्ती येथील मृतुक शेतकरी सुभाष खराटे यांचा मुलगा समाधान खराटे..वडिलांच्या आत्महत्ये नंतर सर्व कुटूंबियांची सर्व जबाबदारी समाधान वरच आली.खराटेकडे साडे तीन एकर ओलीती शेती आहे.शेती मध्ये कापूस-सोयाबीनचे वडील सुभाष खराटे पीक घ्यायचे. शेतकरी सुभाष खराटे यांच्या कुटूंबात तीन मुली, एक मुलगा,पत्नी व सून आहे.तिन्ही मुलीं व एका मुलाचे लग्न झालेले आहे.सध्या कुटूंबात आई अंजनाबाई, मुलगा समाधान व समाधानची बायको मूर्ती येथे राहतात.या सगळ्यांच्या लग्ना साठी सुभाष खराटे यांनी कर्ज घेतले त्यासोबत पीक कर्जकरिता महाराष्ट्र बैंकेचे 1लाख 20 हजार , सस्टेनेबल ऍग्रो-कामर्शिल फायनन्सचे 1 लाख 20 हजार 60 हजार, सावकाराचे 40 हजार रुपयांचे कर्ज देखील घेतलेले आहे. 3 ते 4 वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे डोक्यावर कर्जाचा ओझा वाढल्यामुळे कर्जाला कंटाळून शेतकरी सुभाष खराटे यांनी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून 18 ऑगस्टला आत्महत्येचा प्रयत्न केला त्याचा जीव वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांना उपचरासाठी बुलडाण्यातील डॉ.मेहेत्रें च्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते तिथं महात्मा फुले जन आरोग्य योजनाची योजना असल्याकारणाने त्यांचा उपचार या योजनेत करण्यात संदर्भात डॉक्टर राहुल मेहेत्रें यांनी सांगितल्याचा समाधान खराटेचा म्हणणं आहे.मात्र काही दिवसानंतर पैसे भरण्यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितल्यावर दरम्यान मी रुग्णालयाच्या खर्चामध्ये 10 हजार रुपये, औषधीचे 18 हजार रुपये, रक्त लघवी तपासणीचे 10 हजार रुपये असे 38 हजार रुपये भरले आहे.नंतर 28 ऑगस्ट 2018 रोजी मेहेत्रें रुग्णालयाकडून साध्या कागदावर 1 लाख 7 हजार रुपयांचा रुग्णालयाचे आणि औषधीचे 45 हजार रुपये बिल लिहून दिले त्यावेळी डॉक्टर मेहेत्रें यांना आय.सी.यू मध्ये भेटून माझ्या आईने म्हटले की आमच्या कडे एवढे पैसे नाही म्हणून माझ्या बाबाला सुट्टी द्या आम्ही त्यांना सरकारी रुग्णालयात भरती करतो त्यावर डॉक्टरांनी माझ्या आईला आय.सी.यू मध्येच पूर्ण पैसे भरण्यासाठी सांगितले त्यानंतर पुन्हा 30 ऑगस्ट 2018 रोजी 15 हजार रुपयांचा साध्या कागदांवर बिल दिले.त्यावर मी आणि माझ्या आईने डॉक्टर मेहेत्रें यांना पैसे नसल्याचे सांगत सुट्टी देण्याची वारंवार विनंती केली त्यावर डॉक्टरांनी माझ्या वडिलांचा 28 ऑगस्ट पासून उपचार थांबविला होता.नाइलाजस्तव मला व माझ्या आईला जिल्हाधिकरी मैडम यांच्याकडे 31 ऑगस्ट 2018 ला आमची कैफियत मांडली त्यावर जिल्हाधिकारी यांनी ही यागोष्टीची गांभीर्य लक्षात घेवून डॉक्टर मेहेत्रें आणि जिल्हाशल्यचिकित्सक यांना फोन करून तेथून माझ्या बाबीची सुट्टी करून घेण्याचे आदेश दिले त्यानुसार आम्ही पुन्हा डॉक्टर मेहेत्रें यांच्या कडे बाबाची सुट्टी करायला गेलो तेव्हा डॉक्टर मेहेत्रें यांनी माझ्या बाबाला जो पर्यंत पैसे भरत नाही सुट्टी देत नाहीचा पवित्रा घेत सुट्टी दिली नाहीं परिणामी माझ्या वडिलांचा 1 सप्टेंबर 2018 रोजी मेहेत्रें रुग्णालयातच मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत समाधान खराटे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर मेहेत्रें यांनी उपचार थांबविल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची तक्रार नोंदविली आहे.जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे यांनी प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित यांना चॉकशी करण्याच्या सूचना दिल्या प्रकरणी सर्जन डॉक्टरांच्या त्री समितीने चॉकशी अहवालात डॉ. मेहेत्रे यांच्या वर हलगर्जीपणा केल्याच्या ठपक्यासह गंभीर स्वरूपाचे खुलासे करण्यात आले आहे.तरीही पोलीस काहीच कार्रवाई करण्यासंबंधी तसदी करत नाही.डॉक्टरांवर कार्रवाई साठी गांधी जयंती 2 ऑक्टोबरपासून 5 दिवस उपोषणही केलेले आहे.कार्रवाईच्या आश्वासनार त्याचे उपोषण सोडून घेतले तर तो सध्या ही जिल्हा प्रशासनाचे ऊबंरठे जिझवत आहे.पोलीस त्याला जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तर जिल्हाधिकारी कडे फिरवत आहे मात्र डॉक्टरवर कार्रवाई करत नाही.तर दुसऱ्यांकडे मजुरी करून समाधान खराटे आपल्या कुटूंबाला साभाळत आहे.तर वडील सुभाष खराटे यांच्यावर असलेले कर्ज जैसे थे च्या परिस्थिती आहे.सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 1 लाख 50 हजार रुपयांची माफीच्या योजनेत महाराष्ट्र बैंकेचे 1लाख 20 हजार रुपये पैकी 60 हजार रुपये माफ झाल्याचे समाधान चे म्हणणे आहे.तर समाधान यांच्या कुटूंबियांना सस्टेनेबल ऍग्रो-कामर्शिल फायनन्सचे कर्ज भरण्याकरिता वकीला मार्फत नोटीस ही आलीय आहे.सध्या खरीप हंगाम सुरू असून समाधान कडे पेरणी साठी बियानेकरीत पैसे नसल्याने त्याला आता सावकारांकडुन व्याजाचे कर्ज घ्यावे लागतील एकीकडे सरकार ही शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचे सांगते तर दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांची अशी दैना आहे.यामुळेच एकच प्रश्न उपस्थित होत आहे.की शेतकऱ्यांनी जगाव की मरावं...

बाईट:-1) समाधान खराटे,मृतक सुभाष ख्रराटेंचा मुलगा..

2) प्रेमचंद पंडित,जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा..

3) वसीम P2C

-वसीम शेख,बुलडाणा-

महत्वाचे-MH_BUL_One day with a farmer_VIS & Byet 2_7203763 या क्रमांका मध्ये समाधान आणि त्याच्या आईचे बाईट आहे..कृपया फाईल ओपन करून पूर्ण पाहावे...

बातमीतील काही कटाव्हेज & बाईट याच sulg ने दुसऱ्यांदा पाठवत आहे...Conclusion:null

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.