ETV Bharat / state

'भाजपवाल्यांनी अगोदर आपले नागरिकत्व सिद्ध करावे'

author img

By

Published : Feb 8, 2020, 1:02 PM IST

ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणाऱ्या सरकारच्या विरोधात राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी बुलडाण्याच्या जळगाव जामोद याठिकाणी उपविभागीय कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात आला.

Raju Shetty
राजू शेट्टी

बुलडाणा - राज्यातील अंगणवाडी सेविकांना 6 लाख मोबाईल देणे, म्हणजे अंबानीच्या मोबाईलची विक्री करण्याचा भाजपचा फंडा आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हे मुद्दे भाजपने समोर आणले, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. तसेच अगोदर भाजपवाल्यांनी आपले नागरिकत्व सिद्ध करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष

हेही वाचा - 'कर्जमाफीचा लाभ गावातील ५ लोकांनाही नाही, द्यायचं नाही तर फसवता का?'

शेट्टी बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील आयोजित क्रांती मोर्चाचे नेतृत्व करताना बोलत होते. जामोद येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह सीएए आणि एनआरसी रद्द करण्यासाठी क्रांती मोर्चा काढण्यात आला. सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पीकविमा 100 टक्के मंजूर करून बँक खात्यात जमा करण्यात यावी या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शेट्टी म्हणाले, संपूर्ण जग महात्मा गांधींना मानते. मात्र, गांधींची हत्त्या करणाऱ्याला व्यक्तीस मान देणाऱ्या भाजपला लाज वाटली पाहिजे. भाजपला स्वातंत्र्य लढ्याचा अजिबात इतिहास नाही अन् ते आम्हाला इतिहास सांगायला निघाले, असा टोला यावेळी शेट्टींनी लगावला.

हेही वाचा - जामोदमध्ये आई-वडिलांनीच डोक्यात कुदळीने वार करून केली पोटच्या मुलाची हत्या

बुलडाणा - राज्यातील अंगणवाडी सेविकांना 6 लाख मोबाईल देणे, म्हणजे अंबानीच्या मोबाईलची विक्री करण्याचा भाजपचा फंडा आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हे मुद्दे भाजपने समोर आणले, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. तसेच अगोदर भाजपवाल्यांनी आपले नागरिकत्व सिद्ध करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष

हेही वाचा - 'कर्जमाफीचा लाभ गावातील ५ लोकांनाही नाही, द्यायचं नाही तर फसवता का?'

शेट्टी बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील आयोजित क्रांती मोर्चाचे नेतृत्व करताना बोलत होते. जामोद येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह सीएए आणि एनआरसी रद्द करण्यासाठी क्रांती मोर्चा काढण्यात आला. सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पीकविमा 100 टक्के मंजूर करून बँक खात्यात जमा करण्यात यावी या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शेट्टी म्हणाले, संपूर्ण जग महात्मा गांधींना मानते. मात्र, गांधींची हत्त्या करणाऱ्याला व्यक्तीस मान देणाऱ्या भाजपला लाज वाटली पाहिजे. भाजपला स्वातंत्र्य लढ्याचा अजिबात इतिहास नाही अन् ते आम्हाला इतिहास सांगायला निघाले, असा टोला यावेळी शेट्टींनी लगावला.

हेही वाचा - जामोदमध्ये आई-वडिलांनीच डोक्यात कुदळीने वार करून केली पोटच्या मुलाची हत्या

Intro:Body:बुलडाणा: - राज्यातील अंगणवाडी सेविकांना सहा लाख मोबाईल देणे म्हणजे अंबानी च्या मोबाईल ची विक्री करण्याचा भाजप चा फंडा असून सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला धोकादायक अश्या देशाला NRC च्या मुद्द्यात घोवले जात असल्याने आधी भाजप वाल्यांनी आपले नागरिकत्व सिद्ध करावे मत स्वाभिमानाचे राजू शेट्टी यांनी व्यक्त केले , सोबतच संपूर्ण जग महात्मा गांधींनी मानतो मात्र गांधींची हत्त्या करणाऱ्याला माननाऱ्या भाजप ला लाज वाटली पाहिजे तर भाजप ला स्वातंत्र्य लढ्याचा अजिबात इतिहास नाही आणि आम्हाला इतिहास सांगायला निघाले, असेही विधान त्यांनी यावेळी केले , ते बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील आयोजित क्रांती मोर्चाचे नेतृत्व करतांना बोलत होते. यावेळी शेतकरी शेतमजूर यांच्या विविध मागण्यांसह NRC, CAA रद्द करण्यासाठी क्रांती मोर्चा काढण्यात आला.

स्पीच - राजू शेट्टी, अध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.