ETV Bharat / state

गृह राज्यमंत्र्यांसमोरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, ३८ वर्षांपासून वीज कनेक्शनसाठी सुरू आहे संघर्ष

author img

By

Published : Jun 16, 2019, 2:53 AM IST

Updated : Jun 16, 2019, 7:42 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील दौऱ्यात या शेतकऱ्याचा विषय ईटीव्ही भारतने उपस्थित केला होता. तेव्हा त्यांच्यासोबत ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री येरावार उपस्थित होते. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या काळात मागच्या सरकारहून सर्वात जास्त कनेक्शन शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र या शेतकऱ्याचे कनेक्शन का राहिले ते तपासावे लागेल, असे उत्तर दिले होते.

आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्यावर उपचार

बुलडाणा - तब्बल ३८ वर्षांपासून शेतात वीज कनेक्शन मिळत नसल्याने जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मलकापूरमधील कृषी प्रदर्शनी मेळाव्यात, राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या समोर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १५ जूनला संध्याकाळी घडली. ईश्वर खुपराव खराटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

डावीकडून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन, उजवीकडे आत्महत्येचा प्रयत्न केलेला शेतकरी

विशेष म्हणजे शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मंत्री, आमदार तसेच विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची साधी भेटही घेतली नाही. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील दौऱ्यात या शेतकऱ्याचा विषय ईटीव्ही भारतने उपस्थित केला होता. तेव्हा त्यांच्यासोबत ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री येरावार उपस्थित होते. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या काळात मागच्या सरकारहून सर्वात जास्त कनेक्शन शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र या शेतकऱ्याचे कनेक्शन का राहिले ते तपासावे लागेल, असे उत्तर दिले होते. त्यानंतर या शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरले आहे.


१६ डिसेंबर १९८० साली महावितरणकडे भरली होती डिमांड नोट-
ईश्वर खराटे यांच्याकडे वळोदा गावात वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. या शेतीमध्ये वडिलोपार्जित विहीर आहे. शेतीजवळच विद्युत पोल आणि जवळच विद्युत डीपी आहे. ईश्वर खराटे यांचे आजोबा श्रीराम खुपराव खराटे यांनी विद्युत कनेक्शनसाठी महावितरणकडे (पूर्वीची एमएसईबी) १६ डिसेंबर १९८० साली ५५५ रुपयांची डिमांड नोट भरली होती. त्याची प्रतदेखील ईश्वर यांच्याकडे आहे. विद्युत कनेक्शनसाठी श्रीराम खराटे यांनी सरकारदरबारी पाठपुरावा केला. त्यानंतर ईश्वर यांचे वडील सुपराव श्रीराम खराटे यांनीदेखील पाठपुरावा केला. तरीही या शेतकरी कुटुंबाला विद्युत कनेक्शन मिळाले नाही.


वीज कनेक्शनसाठी केले होते उपोषण-
तिसऱ्या पिढीतील ईश्वर खराटे हे गेल्या अनेक वर्षांपासून कनेक्शन मिळावे यासाठी महावितरण तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी एप्रिल २००६ मध्ये ७ दिवस शेतीत कनेक्शन मिळावे यासाठी उपोषणही केलेले आहे. मलकापूर विद्युत महावितरणाच्या आश्वासनावर त्यांनी उपोषण सोडले होते. यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्यानंतरही त्यांच्या शेतात अद्यापर्यंत कनेक्शन मिळाले नाही.

महावितरणने आत्महत्येच्या इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष

खराटे यांनी कनेक्शन न मिळाल्यामुळे झालेल्या ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने १५ जूनपर्यंत भरपाई व वीज कनेक्शन द्या अन्यथा आत्मदहन करू, असा त्यांनी विद्युत महावितरणाला निवदेनाद्वारे इशारा दिला होता. यावर महावितरणने कुठलीच कार्यवाही केली नाही.

गोविंद विष्णू महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित कृषि समृद्धी या महोत्सवाचा उद्घाटनीय कार्यक्रमात ईश्वर यांनी व्यासपीठावर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांना उपचाराकरीता आय.सी.यु.वार्डात ठेवण्यात आले आहे.

व्यासपीठावर उर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार धृपद सावळे उपस्थित होते. तसेच विजयराज शिंदे, जि.प सभापती श्वेता महाले, जि.प सदस्य मधुकर वडोदे, केदार एकडे, पं.स सभापती अर्चना पाटील, संगीता पाटील, पं.स सदस्या योगिता गावंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक व तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

बुलडाणा - तब्बल ३८ वर्षांपासून शेतात वीज कनेक्शन मिळत नसल्याने जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मलकापूरमधील कृषी प्रदर्शनी मेळाव्यात, राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या समोर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १५ जूनला संध्याकाळी घडली. ईश्वर खुपराव खराटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

डावीकडून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन, उजवीकडे आत्महत्येचा प्रयत्न केलेला शेतकरी

विशेष म्हणजे शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मंत्री, आमदार तसेच विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची साधी भेटही घेतली नाही. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील दौऱ्यात या शेतकऱ्याचा विषय ईटीव्ही भारतने उपस्थित केला होता. तेव्हा त्यांच्यासोबत ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री येरावार उपस्थित होते. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या काळात मागच्या सरकारहून सर्वात जास्त कनेक्शन शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र या शेतकऱ्याचे कनेक्शन का राहिले ते तपासावे लागेल, असे उत्तर दिले होते. त्यानंतर या शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरले आहे.


१६ डिसेंबर १९८० साली महावितरणकडे भरली होती डिमांड नोट-
ईश्वर खराटे यांच्याकडे वळोदा गावात वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. या शेतीमध्ये वडिलोपार्जित विहीर आहे. शेतीजवळच विद्युत पोल आणि जवळच विद्युत डीपी आहे. ईश्वर खराटे यांचे आजोबा श्रीराम खुपराव खराटे यांनी विद्युत कनेक्शनसाठी महावितरणकडे (पूर्वीची एमएसईबी) १६ डिसेंबर १९८० साली ५५५ रुपयांची डिमांड नोट भरली होती. त्याची प्रतदेखील ईश्वर यांच्याकडे आहे. विद्युत कनेक्शनसाठी श्रीराम खराटे यांनी सरकारदरबारी पाठपुरावा केला. त्यानंतर ईश्वर यांचे वडील सुपराव श्रीराम खराटे यांनीदेखील पाठपुरावा केला. तरीही या शेतकरी कुटुंबाला विद्युत कनेक्शन मिळाले नाही.


वीज कनेक्शनसाठी केले होते उपोषण-
तिसऱ्या पिढीतील ईश्वर खराटे हे गेल्या अनेक वर्षांपासून कनेक्शन मिळावे यासाठी महावितरण तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी एप्रिल २००६ मध्ये ७ दिवस शेतीत कनेक्शन मिळावे यासाठी उपोषणही केलेले आहे. मलकापूर विद्युत महावितरणाच्या आश्वासनावर त्यांनी उपोषण सोडले होते. यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्यानंतरही त्यांच्या शेतात अद्यापर्यंत कनेक्शन मिळाले नाही.

महावितरणने आत्महत्येच्या इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष

खराटे यांनी कनेक्शन न मिळाल्यामुळे झालेल्या ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने १५ जूनपर्यंत भरपाई व वीज कनेक्शन द्या अन्यथा आत्मदहन करू, असा त्यांनी विद्युत महावितरणाला निवदेनाद्वारे इशारा दिला होता. यावर महावितरणने कुठलीच कार्यवाही केली नाही.

गोविंद विष्णू महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित कृषि समृद्धी या महोत्सवाचा उद्घाटनीय कार्यक्रमात ईश्वर यांनी व्यासपीठावर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांना उपचाराकरीता आय.सी.यु.वार्डात ठेवण्यात आले आहे.

व्यासपीठावर उर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार धृपद सावळे उपस्थित होते. तसेच विजयराज शिंदे, जि.प सभापती श्वेता महाले, जि.प सदस्य मधुकर वडोदे, केदार एकडे, पं.स सभापती अर्चना पाटील, संगीता पाटील, पं.स सदस्या योगिता गावंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक व तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

Intro:Body:बुलडाणा:- तब्बल ३८ वर्षांपासून शेतात वीज कनेक्शन मिळत नसल्याने बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आयोजित केलेल्या कृषी प्रदशनी मेळाव्यात उपस्थित असलेले राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील सह विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, जि.प अध्यक्षा सौ. उमाताई तायडे, आमदार ॲड आकाश फुंडकर, यांच्या समक्ष व्यासपीठाच्या समोर आज 15 जूनच्या संध्याकाळी शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महतेचा प्रयत्न केला. सदर शेतकऱ्याचे नाव ईश्वर खुपराव खराटे असून पोलिसांनी त्याला कृषी प्रदशनीतून मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचरासाठी भरती करण्यात आले तर पुढील उपचाराकरिता शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून सध्या आय सी यु मध्ये त्याच्यावर उपचार होत आहे.विशेष म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केल्या नंतर मंत्री महोदय,आमदार तथा विद्युत महावितरणांचे अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याची भेट ही घेतली नाही.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागच्या दौऱ्यात सदर शेतकऱ्याचा विषय इटीव्ही भारताने उपस्थित केला होता तेव्हा त्यांच्या सोबत ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री येरावार उपस्थित होते तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या राज्यात मागच्या सरकारच्या काळातील विद्युत कनेक्शन पेक्षा सर्वात जास्त कनेक्शन शेतकऱ्यांना दिले मात्र या शेतकऱ्याचे कनेक्शन का राहिले ते तपासावे लागतील असे उत्तर दिले होते..

बुलडाणा जिल्ह्यातील ईश्वर खुपराव खराटे यांच्या कडे वळोदा गावात वडिलोपार्जित देढ एकर शेती आहे. या शेती मध्ये वडिलोपार्जित विहीर आहे.शेतीजवळच विद्युत पोल आणि जवळच विद्युत डीपी असून ईश्वर खराटे यांच्या आजोबा श्रीराम खुपराव खराटे यांनी विद्युत कनेक्शन साठी महावितरण कडे अर्ज करून दिनांक १६ डिसेंबर १९८० साली ५५५ रुपयेची विद्युत महावितरण कडे डिमांड नोट भरली होती त्याची प्रत सध्या ही ईश्वर खराटे यांच्या कडे आहे.आजोबा श्रीराम खराटे यांनी पाठपुरावा केला.त्यानंतर ईश्वर यांचे वडील सुपराव श्रीराम खराटे यांनी पाठपुरावा केला तरीही कनेक्शन मिळालं नाही.दोन पिढ्याला महावितरण कडून शेतीत विद्युत कनेक्शन मिळालं नाही.आता तिसऱ्या पिढीतील ईश्वर खराटे हे ही गेल्या अनेक वर्षांपासून कनेक्शन मिळावे यासाठी पाठपुरावा करत आहे एवढेच नव्हे तर त्यांनी एप्रिल २००६ मध्ये ७ दिवस शेतीत कनेक्शन मिळावे यासाठी उपोषण ही केलेले आहे आणि मलकापूर विद्युत महावितरणाच्या कनेक्शन देतो या अश्वासनावर उपोषण ही सोडले आहे.यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर ही त्यांच्या शेतात अद्यापर्यंत कनेक्शन मिळाल नाही म्हणून खराटे शेतकऱ्याने कनेक्शन न मिळाल्यामुळे झालेल्या ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.ही मागणी पूर्ण न झाल्याने विद्युत महावितरणाला एका निवेदनाद्वारे १५ पर्यन्त भरपाई व वीज कनेक्शन द्या अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.यावर कुठलीच कार्रवाई झाली नाही म्हणून आज शेतकरी खराटे यांनी मलकापूर येथे गोविंद विष्णू महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित कृषि समृद्धी या महोत्सवाचा उद्घाटनीय कार्यक्रमात उर्जाराज्य मंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार,गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, जि.प अध्यक्षा सौ. उमाताई तायडे, आमदार ॲड आकाश फुंडकर, माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराज शिंदे, जि.प सभापती सौ श्वेताताई महाले, जि.प सदस्य मधुकर वडोदे, केदार एकडे, पं.स सभापती अर्चनाताई पाटील, संगीताताई पाटील, पं.स सदस्या सौ योगिताताई गावंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्या समक्ष व्यसपीठासमोरच त्रस्त शेतकरी ईश्वर खराटे यांनी ओरोजल पोईजन नावाच्या विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी त्यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असता त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.त्यांना उपचारा करीता आय.सी.यु.वार्डात ठेवण्यात आले आहे..

1) बाईट:-शेतकरी ईश्वर खराटे, हिंदी & मराठी बाईट

2) बाईट:-डॉ.स्वाती फिरके, उपजिल्हा रुग्णालया,मलकापूर

3) बाईट:- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ,
जुना बाईट आहे

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
Last Updated : Jun 16, 2019, 7:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.