ETV Bharat / state

बुलडाण्यात हुतात्मा जवांनाच्या अंत्यसंस्काराला पालकमंत्र्याची गैरहजेरी, वीरपत्नीने व्यक्त केली खंत

author img

By

Published : May 6, 2019, 11:03 AM IST

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात १ मे रोजी शीघ्र कृती दलाच्या १५ जवानांना घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनाला भूसुरुंगाने उडवून देण्यात आले. या हल्ल्यात गाडीतील सर्व १५ पोलीस जवान शहीद झाले. यात बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस जवान सर्जेराव खर्डे आणि राजू गायकवाड यांचा समावेश होता.

स्वाती खर्डे

बुलडाणा - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी १ मे रोजी शहीद झालेल्या २ पोलीस जवानांच्या अंत्यसंस्काराला गैरहजर होते. मागे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातही जिल्ह्यातील २ जवानांना वीरमरण आले होते. तेव्हाही मदन येरावार अंत्यसंस्काराला अनुपस्थित होते. त्यानंतर त्यांनी साधी विचारपूस किंवा सांत्वनपर भेटही दिली नाही, अशी खंत शहीद पोलीस जवान सर्जेराव खर्डे यांच्या पत्नी स्वाती खर्डे यांनी व्यक्ती केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात १ मे रोजी शीघ्र कृती दलाच्या १५ जवानांना घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनाला भूसुरुंगाने उडवून देण्यात आले. या हल्ल्यात गाडीतील सर्व १५ पोलीस जवान शहीद झाले. यात बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस जवान सर्जेराव खर्डे आणि राजू गायकवाड यांचा समावेश होता.

या दोघांचेही पार्थिव मुख्यमंत्र्यांच्या सलामीसाठी थांबवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. शिवाय तेथील पोलीस प्रशासनानेही पाहिजे तसे सहकार्य केले नसल्याचे स्वाती खर्डे यांनी म्हटले आहे. ग्रामस्थांनी देखील प्रशासनाच्या या वागणुकीचा आणि सरकारचा जाहीर निषेध केला आहे. आधीच दुःखाचा डोंगर कोसळला असताना पोलीस प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना नाहकच त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

बुलडाण्यात हुतात्मा जवांनाच्या अंत्यसंस्काराला पालकमंत्र्याची गैरहजेरी, वीरपत्नीने व्यक्त केली खंत

सरकारने शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मात्र, त्याची अद्यापही कोणतीच कल्पना त्यांच्या पत्नीला नाही. तसेच, कोणतीही मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी एकदाही येथे येऊन भेट दिली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पालकत्व विसरलेल्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - काँग्रेसची मागणी
जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी सांभाळू न शकणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस ने केली आहे. राज्याचे ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध मंत्री मदन येरावार यांची बुलडाणा जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. मात्र, जेव्हापासून ते जिल्ह्याचे पालकत्व सांभाळतात तेव्हापासून ते जबाबदारी विसरले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

बुलडाणा - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी १ मे रोजी शहीद झालेल्या २ पोलीस जवानांच्या अंत्यसंस्काराला गैरहजर होते. मागे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातही जिल्ह्यातील २ जवानांना वीरमरण आले होते. तेव्हाही मदन येरावार अंत्यसंस्काराला अनुपस्थित होते. त्यानंतर त्यांनी साधी विचारपूस किंवा सांत्वनपर भेटही दिली नाही, अशी खंत शहीद पोलीस जवान सर्जेराव खर्डे यांच्या पत्नी स्वाती खर्डे यांनी व्यक्ती केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात १ मे रोजी शीघ्र कृती दलाच्या १५ जवानांना घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनाला भूसुरुंगाने उडवून देण्यात आले. या हल्ल्यात गाडीतील सर्व १५ पोलीस जवान शहीद झाले. यात बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस जवान सर्जेराव खर्डे आणि राजू गायकवाड यांचा समावेश होता.

या दोघांचेही पार्थिव मुख्यमंत्र्यांच्या सलामीसाठी थांबवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. शिवाय तेथील पोलीस प्रशासनानेही पाहिजे तसे सहकार्य केले नसल्याचे स्वाती खर्डे यांनी म्हटले आहे. ग्रामस्थांनी देखील प्रशासनाच्या या वागणुकीचा आणि सरकारचा जाहीर निषेध केला आहे. आधीच दुःखाचा डोंगर कोसळला असताना पोलीस प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना नाहकच त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

बुलडाण्यात हुतात्मा जवांनाच्या अंत्यसंस्काराला पालकमंत्र्याची गैरहजेरी, वीरपत्नीने व्यक्त केली खंत

सरकारने शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मात्र, त्याची अद्यापही कोणतीच कल्पना त्यांच्या पत्नीला नाही. तसेच, कोणतीही मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी एकदाही येथे येऊन भेट दिली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पालकत्व विसरलेल्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - काँग्रेसची मागणी
जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी सांभाळू न शकणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस ने केली आहे. राज्याचे ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध मंत्री मदन येरावार यांची बुलडाणा जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. मात्र, जेव्हापासून ते जिल्ह्याचे पालकत्व सांभाळतात तेव्हापासून ते जबाबदारी विसरले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Intro:Body:anchor -- पुलवामा घटनेतील २ शहिदांच्या अंत्यसंस्काराला अनुपस्थित राहिलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी १ मे रोजी पुन्हा शहीद झालेल्या २ पोलीस  जवान बुलडाणा जिल्ह्यातील असतानाही त्यांच्या अंत्यसंस्काराला दांडी मारली .. एकीकडे मुख्यमंत्री मुंबईवरून गडचिरोलीला जातात , तर इकडे यवतमाळावरून काहीच किलोमीटरचे अंतर असताना मेहकर आणि आळंद ला यायला पालकमंत्री मदन येरावार याना का वेळ मिळाला नाही ? .. त्यानंतर साधी विचारपूस किंवा सांत्वनपर भेट घ्यायला हि आले नाहीत , अशी खंत हि शहीद पोलीस जवान सर्जेराव खर्डे यांच्या पत्नीने व्यक्त केलीय .. 

व्हिओ -१-- गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भात १ मे ला सी ६० शीघ्र कृती दलाच्या १५ जवानांना घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनाला भूसुरुंगाने उडवून देण्यात आलेय .. या हल्लयात सर्वांच्या सर्व १५ पोलीस जवान शहीद झालेय .. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस जवान सर्जेराव खर्डे आणि राजू गायकवाड यांचा समावेश होता .. या दोघांच्याही पार्थिवावर ४८ तासांनी अंत्यसंस्कार त्यांच्या गावी करण्यात आलेय .. पुलवामा हल्ल्यातील हि दोन्ही जवानांवर ४८ तासाने चे नंतर  अंत्यसंस्कार करण्यात आले होते .. मात्र या दोन्ही घटनेतील पार्थिव पोह्चन्याची वेळ बघितली तर पुलवामा कोसोदूर असताना ते पार्थिव त्या तुलनेत लवकर जिल्ह्यात पोहचले मात्र गडचिरोली हल्ल्यातील जवानाचे पार्थिव हे मुख्यमंत्र्यांच्या सलामीसाठी थांबवून ठेवण्यात आले होते .. त्यानंतर ते पार्थिव नातेवाइकांकडे देण्यात आलेय .. शिवाय तेथील पोलीस प्रशासनानेही पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य केले नसल्याचे शहीद पत्नी स्वाती खर्डे आणि त्यांच्या नातेवाईकांनी म्हंटले असून ग्रामस्थांनी सुद्धा प्रशासनाच्या  या वागणुकीचा आणि सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केलाय .. आधीच दुःखाचा डोंगर कोसळला असताना पोलीस प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना नाहकच त्रास सहन करावा लागल्याचा आरोप होतोय .. 

बाईट -- स्वाती खर्डे , शहीद पत्नी 

बाईट -- अशोक खर्डे , ग्रामस्थ .. 

व्हिओ -२-- सरकारकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केलीय .. मात्र त्याची अद्यापही कल्पना त्यांच्या पत्नीला नसून कोणतीच  मदत पोहचली नसल्याचा आरोप वीरपत्नी स्वाती खर्डे यांनी केलाय .. तर मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वसन दिलेय असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे म्हटले .. मात्र त्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि हे किती दिवस चालणार असा संतप्त सवाल वीरपत्नी यांनी केलाय .. शिवाय सरकारने त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी, घर चालवण्यासाठी आणि त्यांची मुलीला सांभाळण्यासाठी मदत करावी अशी मागणी केलीय .. एव्हढेच काय जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार हे घटनेला  ४ दिवस उलटून गेले मात्र साधी भेट घ्यायला  हि आले नाहीत , याची खंत व्यक्त केलीय .. 

बाईट -- स्वाती खर्डे , वीरपत्नी .. 

व्हिओ -३-- तर जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी सांभाळू न शकणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस ने केलीय .. राज्याचे ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध मंत्री मदन येरावार यांची बुलडाणा जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती केलीय .. मात्र जेव्हापासून ते जिल्ह्याचे पालकत्व साम्भाळकतात तेव्हापासून ते जबाबदारी विसरलेत  असा आरोप करत अतिशय दुर्दैवी घटना आणि दुःखद घटना असताना पालकमंत्र्यांना जवानांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाही आणि कुटुंबाचे सांत्वन करणायसाठी त्यांना   वेळ नाहीय, हि जिल्ह्याच्या दृष्टीने शरमेची बाब आहे .. यापूर्वी पुलवामा हल्लयात शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराला हि उपस्थित राहिले नाही , असा आरोप करत पालकमंत्री मदन येरावार यांचा निषेध केलाय तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस ने केलीय .. 

बाईट -- मनोज कायंदे , जिल्ह्याध्यक्ष , काँग्रेस .. 

व्हिओ -४-- एकंदरीत जिल्ह्याचे पालकमंत्री पालकत्व विसरले असेच म्हणावे लागेल .. कारण पालकमंत्र्यांना याबाबत काहीही गांभीर्य नाही का ? अशी चर्चा सध्या रंगू लागलीय .. तर बुलडाणा जिल्ह्याला पालकमंत्री आहे की नाही , हाच प्रश्न जिल्हावासियाना सतावतोय .. 

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.