बुलडाणा - पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या नितीन राठोड यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. जिल्ह्यातील चोरपांग्रा येथे हा विधी करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी नितीन राठोड यांचे पार्थिव औरंगाबाद येथे व त्यानंतर ते त्यांच्या गावी चोरपांग्रा येथे आणण्यात येणार आहे.
कुटुंबाची परिस्थिती नसताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर नितीन सैन्यात भर्ती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण तसेच एक मुलगा आणि एक मुलगी, असे कुटुंब आहे.