ETV Bharat / state

कोरोनाचे सावट; सैलानी यात्रा रद्दबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केली अधिकृत घोषणा

author img

By

Published : Mar 6, 2020, 8:04 PM IST

Updated : Mar 6, 2020, 8:32 PM IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी ठेवण्यात येत आहे. राज्यभरात हजारो लोक एकत्र येणारे मोठे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने सैलानी यात्राही रद्द करण्यात आली आहे. या अनुषंगाने सैलानी यात्रेसंदर्भात गुरुवारी 5 मार्चला अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांच्या बैठकीस यात्रे रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

सुमन चंद्रा
सुमन चंद्रा

बुलडाणा - चीननंतर जगात अनेक ठिकाणी 'कोरोना' विषाणूचे रूग्ण पहायला मिळत आहेत. याबरोबर भारतातही काही ठिकाणी या विषाणूची लागण झालेले 29 रूग्ण पहायला मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी यावर्षीची सैलानी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी अधिकृत घोषणा केली आहे. तर महिला दिनाचेही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर पिंपळगाव सराई येथून गावातून दर्गा पर्यंत निघणार बाबांचा संदल प्रथेनुसार मोजकेच मुजावर करणार आहेत. या ठिकाणी होणारी नारळाची होळी आणि संदल रद्द करण्यात आली आहे.

सैलानी यात्रा रद्दबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केली अधिकृत घोषणा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी ठेवण्यात येत आहे. राज्यभरात हजारो लोक एकत्र येणारे मोठे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने सैलानी यात्राही रद्द करण्यात आली आहे. या अनुषंगाने सैलानी यात्रेसंदर्भात गुरुवारी 5 मार्चला अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांच्या बैठकीस यात्रे रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

हेही वाचा - 'सुरुवातीला तर हा पुण्याचाच अर्थसंकल्प असल्यासारखं वाटलं'

या यात्रेस देशभरातून तसेच विविध राज्यातील भाविक येत असतात. ते देखील या यात्रेस येणार नाही याचीही दखल घेण्यात आली आहे. सैलानी यात्रेसाठी पंधरा दिवस शेकडो अतिरिक्त बसेस सोडण्यात येतात. त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. होळी पासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी आता पासून आलेल्या भाविकांना देखील सैलानी वरून बाहेर काढण्यात प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. तर सैलानी यात्रेला येणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यावर नाकाबंदी लावून भाविकांना परत करणार आहे.

बुलडाणा - चीननंतर जगात अनेक ठिकाणी 'कोरोना' विषाणूचे रूग्ण पहायला मिळत आहेत. याबरोबर भारतातही काही ठिकाणी या विषाणूची लागण झालेले 29 रूग्ण पहायला मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी यावर्षीची सैलानी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी अधिकृत घोषणा केली आहे. तर महिला दिनाचेही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर पिंपळगाव सराई येथून गावातून दर्गा पर्यंत निघणार बाबांचा संदल प्रथेनुसार मोजकेच मुजावर करणार आहेत. या ठिकाणी होणारी नारळाची होळी आणि संदल रद्द करण्यात आली आहे.

सैलानी यात्रा रद्दबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केली अधिकृत घोषणा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी ठेवण्यात येत आहे. राज्यभरात हजारो लोक एकत्र येणारे मोठे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने सैलानी यात्राही रद्द करण्यात आली आहे. या अनुषंगाने सैलानी यात्रेसंदर्भात गुरुवारी 5 मार्चला अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांच्या बैठकीस यात्रे रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

हेही वाचा - 'सुरुवातीला तर हा पुण्याचाच अर्थसंकल्प असल्यासारखं वाटलं'

या यात्रेस देशभरातून तसेच विविध राज्यातील भाविक येत असतात. ते देखील या यात्रेस येणार नाही याचीही दखल घेण्यात आली आहे. सैलानी यात्रेसाठी पंधरा दिवस शेकडो अतिरिक्त बसेस सोडण्यात येतात. त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. होळी पासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी आता पासून आलेल्या भाविकांना देखील सैलानी वरून बाहेर काढण्यात प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. तर सैलानी यात्रेला येणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यावर नाकाबंदी लावून भाविकांना परत करणार आहे.

Last Updated : Mar 6, 2020, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.