ETV Bharat / state

स्वस्त धान्य दुकानात गव्हासह तांदळाचा निकृष्ट दर्जा; नागरिकांमध्ये संताप

author img

By

Published : Nov 27, 2019, 3:17 AM IST

Updated : Nov 27, 2019, 7:52 AM IST

नोव्हेंबर महिन्याचे धान्य सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात आले. या दुकानदारांनी धान्याचे वितरण ग्राहकांना सुरू केले आहे. मात्र, खामगाव शहर आणि परिसरातील काही भागांत निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण केले जात आहे.

रेशनिंग कार्ड
रेशनिंग कार्ड

बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव शहर आणि तालुक्यातील भागात स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. किडलेला, सडलेला, कुजलेल्या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात खडे व माती असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

नोव्हेंबर महिन्याचे धान्य सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात आले. या दुकानदारांनी धान्याचे वितरण ग्राहकांना सुरू केले आहे. मात्र, खामगाव शहर आणि परिसरातील काही भागांत निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण केले जात आहे.

गरीब कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानामधून दोन रुपये दराने गहू तर तीन रुपये दराने तांदूळ प्रति किलो देण्यात येते. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रेशनिगंचे धान्य घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी दुकानदारांकडे तक्रार केल्यास सरकारकडून निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. खामगाव तालुक्यातील वाडी येथील स्वस्त धान्य दुकानांतील मिळालेल्या धान्याला कीड लागलेली आहे. गव्हात अळ्या, तांदुळात भोंगी व कचरा असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. सरकारी नियमाप्रमाणे धान्यही मिळत नसल्याची ओरडही परिसरातील नागरिक करत आहेत. दर महिन्याला स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येत नाही. याबाबत नागरिक संतोष दामोदर यांनी तहसीलदार डॉ. रसाळ यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चांगल्या धान्याचा पुरवठा व्हावा -

मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडू लागले आहेत. धान्याचे दरही आवाक्याबाहेर गेल्यामुळे घरखर्च भागविताना सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील महिन्यात वितरित करण्यात आलेल्या धान्यात मातीचे ढेकूळ, सिमेंटचे खडे आढळून आले. दुष्काळी परिस्थितीमध्ये कित्येक कुटुंबे रेशनच्या धान्यावर उदरनिर्वाह करीत आहेत. त्यातही भेसळ होत असल्याने गरीब कुटुंबातील लोक हवालदिल झाले आहेत.

स्वस्त धान्य दुकानात धान्याचा निकृष्ट दर्जा

गांभीर्याने दखल घेण्याची गरज-

दरमहा रेशनमधील गहू घेतल्यानंतरही त्यात मिसळण्यासाठी चांगले गहू विकत आणावे लागतात. साधारण दहा किलो रेशनच्या गव्हात दोन किलो चांगल्या प्रतिचे महागडे गहू मिसळावे लागतात. गहू दळून आणल्यानंतर पीठ मळताना त्यामध्ये कोमट पाणी घालावे लागते. ही उठाठेव केल्याशिवाय चपाती खाण्यायोग्य होत नाही.
चांगल्या दर्जाच्या धान्याचा पुरवठा होण्यासाठी सरकारकाने कार्यवाही करावी, अशी मागणी रेशनकार्डधारकांनी केली आहे. पंजाबसह राजस्थान, हरियाणा या राज्यांमधील पावसाने काळवंडलेला गहू राज्यात रेशन दुकानांमधून वितरित केला जात आहे.

बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव शहर आणि तालुक्यातील भागात स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. किडलेला, सडलेला, कुजलेल्या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात खडे व माती असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

नोव्हेंबर महिन्याचे धान्य सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात आले. या दुकानदारांनी धान्याचे वितरण ग्राहकांना सुरू केले आहे. मात्र, खामगाव शहर आणि परिसरातील काही भागांत निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण केले जात आहे.

गरीब कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानामधून दोन रुपये दराने गहू तर तीन रुपये दराने तांदूळ प्रति किलो देण्यात येते. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रेशनिगंचे धान्य घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी दुकानदारांकडे तक्रार केल्यास सरकारकडून निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. खामगाव तालुक्यातील वाडी येथील स्वस्त धान्य दुकानांतील मिळालेल्या धान्याला कीड लागलेली आहे. गव्हात अळ्या, तांदुळात भोंगी व कचरा असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. सरकारी नियमाप्रमाणे धान्यही मिळत नसल्याची ओरडही परिसरातील नागरिक करत आहेत. दर महिन्याला स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येत नाही. याबाबत नागरिक संतोष दामोदर यांनी तहसीलदार डॉ. रसाळ यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चांगल्या धान्याचा पुरवठा व्हावा -

मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडू लागले आहेत. धान्याचे दरही आवाक्याबाहेर गेल्यामुळे घरखर्च भागविताना सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील महिन्यात वितरित करण्यात आलेल्या धान्यात मातीचे ढेकूळ, सिमेंटचे खडे आढळून आले. दुष्काळी परिस्थितीमध्ये कित्येक कुटुंबे रेशनच्या धान्यावर उदरनिर्वाह करीत आहेत. त्यातही भेसळ होत असल्याने गरीब कुटुंबातील लोक हवालदिल झाले आहेत.

स्वस्त धान्य दुकानात धान्याचा निकृष्ट दर्जा

गांभीर्याने दखल घेण्याची गरज-

दरमहा रेशनमधील गहू घेतल्यानंतरही त्यात मिसळण्यासाठी चांगले गहू विकत आणावे लागतात. साधारण दहा किलो रेशनच्या गव्हात दोन किलो चांगल्या प्रतिचे महागडे गहू मिसळावे लागतात. गहू दळून आणल्यानंतर पीठ मळताना त्यामध्ये कोमट पाणी घालावे लागते. ही उठाठेव केल्याशिवाय चपाती खाण्यायोग्य होत नाही.
चांगल्या दर्जाच्या धान्याचा पुरवठा होण्यासाठी सरकारकाने कार्यवाही करावी, अशी मागणी रेशनकार्डधारकांनी केली आहे. पंजाबसह राजस्थान, हरियाणा या राज्यांमधील पावसाने काळवंडलेला गहू राज्यात रेशन दुकानांमधून वितरित केला जात आहे.

Intro:Body:mh_bul_nferior grain supply_10047

Slug : रेशनवर काळवंडलेला गहू आणि तांदळात भोंगी !
निकृष्ठ धान्य पुरवठा
शासनाने गांभीर्याने दखल घेण्याची कार्डधारकांची मागणी


बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहर आणि तालुक्यातील भागात रेशन दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. किडलेला, सडलेला, कुजलेला आणि गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात खडे वमाती असून त्याचा दर्जाही चांगला नाही. तर तांदळात मोठ्या प्रमाणावर भोंगी
असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाआहे.
शासनाकरून माहे नोव्हेंबर महिन्याचे रेशन वरील धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात आले असून रेशन दुकानदारांनी या धान्याचे वितरण ग्राहकांना सुरु केले आहे. मात्र खामगाव शहर आणि परिसरातील काही भागांत निकृष्ठ दर्जाच्या धान्याचे वितरण केले जात ओरड होता असून गरीब कुटुंबीयांना दोन रुपये दराने गहू व तीन रुपये दराने तांदूळ मिळत असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पाहताधान्य घेण्याशिवाय पर्याय नाही. या संदर्भात दुकानदारांकडे तक्रार केल्यास शासनाकडूनच निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्यामुळे दुकानदार काहीच करू शकत नसल्याचे सांगितल्या जात आहे.
खामगाव तालुक्यातील वाडी येथील स्वस्त धान्य दुकानांतील मिळालेल्या ज्ञानात किळ लागलेली व गव्हात अळ्या ,तांदुळात भोंगी व कचरा दिसून येतो ग्राहकांना माल दिला याचे बिल दिले जात नाही.सोबतच निर्धारित किलोप्रमाणे धान्यही मिळत नाही.स्वस्त धान्य दुकानदार स्वस्त धान्य महिन्यावारी वाटत नाही व नियाप्रमाने धान्य दुकानदार क्षीदा वाटप करताना उपस्थित नसतो तर 2 व्यक्ती कामाला लावून धान्य वाटप करण्यात येते त्यामूळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो अशी ओरड येथील रेशन धारक करीत आहे. याबाबत संतोष दामोदर यांनी संबंधितांकडे तक्रार दाखल केली असून याबाबत तहसीलदार डॉ. रसाळ यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

चांगल्या धन्याचा पुरवठा व्हावा
मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडू लागले आहेत. धान्याचे दरही आवाक्याबाहेर गेल्यामुळे घरखर्च भागविताना सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावीलागत आहे. मागच्या महिन्यात रेशनवर धान्य वाटप करण्यात आले तेव्हा अनेक ठिकाणी रेशन दुकानांत विक्रीसाठी आलेल्या गव्हामध्ये मोठ्याप्रमाणात खडे-मातीमिश्रीत, भेसळयुक्त वनिकृष्ट दर्जाच्या गहू त्यात मातीचे ढेकळही, सिमेंटचे खडे आढळून आले. महागाई कमी करण्यात शासनास अपयश आले आहे. किमान रेशनवर दिले जाणारे धान्यतरी चांगल्या दर्जाचे दिले जावे अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.. दुष्काळी परिस्थितीमध्ये कित्येक कुटुंबे रेशनच्याधान्यावर उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र गरीब जनतेला शासनाकडून मिळणाऱ्या या धान्यातच भेसळ होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. गोरगरीब जनतेसाठी संजीवनी ठरत असलेल्याधान्यातच भेसळ होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.


गांभीर्याने दखल घेण्याची गरज

दरमहा रेशनमधील गहू घेऊन त्यात बाहेरून चांगले गहू आणून मिसळावे लागतात. साधारण दहा किलो रेशनच्या गव्हात दोन किलो बाहेरचे महाग गहू मिसळावे लागतात. गहू दळूनआणल्यानंतर पीठ मळताना त्यामध्ये कोमट पाणी घालावे लागते. ही उठाठेव केल्याशिवाय चपाती खाण्यायोग्य होत नाही. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी जोरदार मागणीकार्डधारकांनी केली आहे. पंजाबसह राजस्थान, हरियाणा या राज्यांमध्ये पावसामुळे काळवंडलेला गहू राज्यात रेशन दुकानांमधून वितरित केला जातो आहे


Byte संतोष दामोदर ग्राहक

--------------------------------------------------Conclusion:
Last Updated : Nov 27, 2019, 7:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.