ETV Bharat / state

भंडाऱ्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक; 52 कोटी थकवले - payment pending at the government Paddy shopping Center

जिल्ह्यामध्ये एकूण 67 शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. यापैकी 66 केंद्रांवर 27 ऑक्टोबर पासून धान खरेदी सुरू झालेली आहे. आतापर्यंत 8076 शेतकऱ्यांकडून 2 लाख 90 हजार 612 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्याची एकूण किंमत 52 कोटी 74 लाख 61 हजार 143 रुपये एवढी आहे. हे पैसे शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही.

dhan
भंडाऱ्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे 52 कोटींचे देयक थकीत
author img

By

Published : Dec 5, 2019, 9:31 AM IST

भंडारा - शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांचे तब्बल 52 कोटी रुपयांचे देयक थकवले आहे. विक्रीनंतर सात दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावे, असा आदेश आहे. मात्र महिना उलटल्यानंतरही शेतकर्‍यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

भंडाऱ्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे 52 कोटींचे देयक थकीत

जिल्ह्यामध्ये एकूण 67 शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. यापैकी 66 केंद्रांवर 27 ऑक्टोबर पासून धान खरेदी सुरू झालेली आहे. आतापर्यंत 8076 शेतकऱ्यांकडून 2 लाख 90 हजार 612 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्याची एकूण किंमत 52 कोटी 74 लाख 61 हजार 143 रुपये एवढी आहे. हे पैसे शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाहीत.

याविषयी बोलताना आमदार राजू कारेमोरे म्हणाले, " मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत माझे बोलणे झाले आहे. महाराष्ट्रासाठी 67 कोटींची रक्कम बँकांकडे वळती करण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसै जमा होतील" असा विलंब इथुन पुढे खपवून घेतला जाणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - 'आधारभूत किंमत खरेदी योजना' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 98 केंद्रांना मंजुरी

खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मागील तीन वर्षांपासून ऑफलाईन पद्धत बंद करून ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी यामध्ये नवनवीन बदल केले जातात. शासनाने सुरू केलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याविषयी जिल्हा मार्केटींग अधिकारी यांना विचारले असता, चौकशी करण्यासाठी अधिकारी नेमले असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

भंडारा - शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांचे तब्बल 52 कोटी रुपयांचे देयक थकवले आहे. विक्रीनंतर सात दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावे, असा आदेश आहे. मात्र महिना उलटल्यानंतरही शेतकर्‍यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

भंडाऱ्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे 52 कोटींचे देयक थकीत

जिल्ह्यामध्ये एकूण 67 शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. यापैकी 66 केंद्रांवर 27 ऑक्टोबर पासून धान खरेदी सुरू झालेली आहे. आतापर्यंत 8076 शेतकऱ्यांकडून 2 लाख 90 हजार 612 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्याची एकूण किंमत 52 कोटी 74 लाख 61 हजार 143 रुपये एवढी आहे. हे पैसे शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाहीत.

याविषयी बोलताना आमदार राजू कारेमोरे म्हणाले, " मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत माझे बोलणे झाले आहे. महाराष्ट्रासाठी 67 कोटींची रक्कम बँकांकडे वळती करण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसै जमा होतील" असा विलंब इथुन पुढे खपवून घेतला जाणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - 'आधारभूत किंमत खरेदी योजना' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 98 केंद्रांना मंजुरी

खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मागील तीन वर्षांपासून ऑफलाईन पद्धत बंद करून ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी यामध्ये नवनवीन बदल केले जातात. शासनाने सुरू केलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याविषयी जिल्हा मार्केटींग अधिकारी यांना विचारले असता, चौकशी करण्यासाठी अधिकारी नेमले असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Intro:ANC : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे तब्बल 52 कोटीचे रुपयांचे देयक थांबलेले आहेत विक्रीनंतर केवळ सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावे असा आदेश होता मात्र प्रत्यक्षात एक महिन्यानंतरही ेतकर्‍यांना एक रुपयाही मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडलेला आहे.




Body:भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 67 शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत यापैकी प्रत्यक्षात 66 केंद्र सुरू झाले असून या केंद्रावर 27 ऑक्टोबर पासून धान खरेदी सुरू झालेली आहे आतापर्यंत 8076 शेतकऱ्यांकडून दोन लाख 90 हजार 612 क्विंटल धानाची खरेदी झाली असून त्याची एकूण किंमत 52 कोटी 74 लाख 61 हजार 143 रुपये एवढी आहे त्यापैकी शेतकऱ्यांना मागील एक महिन्यात एक रुपयाही मिळालेला नाही.

खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून पहिल्यांदा सुरू असलेल्या ऑफलाईन पद्धतीला बंद करून ऑनलाईन पद्धत मागील तीन वर्षापासून सुरू केली दरवर्षी यामध्ये नवनवीन बदल केले जातात यावर्षी शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा ही विक्री च्या वेळेस देणे गरजेचे केले गेले ऑनलाईन पद्धतीमुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण पारदर्शक होतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पैसे त्वरित मिळतील अशी अपेक्षा होती शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी-विक्री करून त्याची संपूर्ण माहिती दिली आहे मात्र तरीही शासनातर्फे पैसे मिळण्यात का विलंब होत आहेत याची कल्पना आम्हाला नाही असे खरेदी विक्री संस्थाचालकांनी सांगितले.

धानाचे उत्पादन निघाल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून शेतकरी शेतीसाठी त्यांनी घेतलेले कर्ज फेडण्याच्या विचारात असतो मात्र धान्य विकून महिना संपल्यावर ही पैसे न मिळाल्याने बिचारा शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलेला आहे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नेहमीच अशा पद्धतीने पैसे मिळण्यास विलंब होतं म्हणून शेतकरी बरेचदा कमी किमतीत व्यापाऱ्यांना त्याचा धाडतो कारण या व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळतात.
शासनाने सुरू केलेल्या आधारभुत धान्य खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्या सर्वांविषयी जिल्हा मार्केटींग यांना विचारले असता याविषयी अधिकारी नेमले असून ही संस्था शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत त्यांच्यावर कारवाई करू असे सांगितले तर शासनातर्फे 28 कोटीची रक्कम लवकरच मिळणार असून पुढच्या दोन चार दिवसात शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
या तक्रार विषयी विद्यमान आमदार राजूभाऊ कारेमोरे यांना विचारले असता शेतकऱ्यांचे पैसे सात दिवसात मिळायलाच हवे होते मात्र स्थायी सरकार नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असावे मात्र असा दुर्लक्ष पुढे खपवून घेतला जाणार नाही या या विषयी मार्केटिंग फफेडरेशनच्या अअधिकाऱ्याची बोलणे झाले असून महाराष्ट्रासाठी 67 कोटीची रक्कम बँकांना वळती केली असून पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा होणार आहे यापुढे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या पैसे बद्दल विलंब खपवून घेतला जाणार नाही असं आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य हमीभाव मिळावा त्यांची फसवणूक होऊ नये आणि लवकरात लवकर पैसा मिळावा या उद्देशाने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले गेले मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे आणि त्यांना पैसाही उशिरा मिळतो आहे त्यामुळे आता सरकारने तरी ही यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी नव्या उपाययोजना करण्याची गरज आहे विशेष म्हणजे या विषयाचा सखोल अभ्यास विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदाही ही यंत्रणा सुरळीत करण्यासाठी होऊ शकतो.



Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.