ETV Bharat / state

बीडमधील महिलांच्या कुरड्या, पापडाला पुण्याच्या बाजारपेठेत मागणी

author img

By

Published : May 13, 2019, 11:39 AM IST

केज तालुक्यातील महिला गृहउद्योगाच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करत आहेत. या महिलांनी गृह उद्योगांमधून कुरड्या, पापड्या, सांडगे, खारवड्या, अशी उन्हाळी वाळवणे तयार करून पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत.

बीडमधील महिलांच्या वाळवणाला पुण्याच्या बाजारपेठेत मागणी

बीड - जिल्ह्यात मागील ३-४ वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे अल्पभूधारक शेतकरी उध्वस्त झाला आहे. कर्जबाजारीपणा व नापिकी यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य निर्माण झाले आहे. एकीकडे ही नकारात्मक परिस्थिती असताना केज तालुक्यातील महिला गृहउद्योगाच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करत आहेत. या महिलांनी गृह उद्योगांमधून कुरड्या, पापड्या, सांडगे, खारवड्या, अशी उन्हाळी वाळवणे तयार करून पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत.

बीडच्या महिलांनी बनविलेल्या कुरड्या पापड्या ला पुण्याच्या मार्केटमध्ये मागणी

महिलांनी बनवलेल्या या वाळवणाला शहरातून चांगली मागणी आहे. दर ३-४ दिवसाला एक टेम्पो भरून उन्हाळी वाळवण पुणे, मुंबईला विक्रीसाठी जात असल्याचे नवंचेतना सर्वांगीन विकास केंद्राच्या समन्वयक ज्योती सांबरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय नेत्याच्या आणि प्रशासनाच्या मदतीशिवाय महिलांनी हा लघुउद्योग प्रकल्प उभारला आहे. नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या माध्यमातून गृह उद्योग करणाऱ्या महिलांसाठी कर्ज पुरवठा केला जातो.

छोटा-मोठा उद्योग उभारण्यासाठी महिलांना सर्वतोपरी मदत करतो, यामध्ये दुग्ध व्यवसाय अथवा उन्हाळी वाळवण तयार करून बाजारात विक्रीसाठी नेण्यास देखील आमची मदत असते. यामध्ये उपक्रमात केज तालुक्यातील ४५० बचत गट काम करत आहेत. पुणे आणि मुंबई येथे नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्यावतीने एक स्टॉल उभारुन या महिलांच्या उत्पादित वस्तू आणि उत्पादनांची विक्री केले जाते, असे नवचेतना विकास केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

ऊसतोड कामगारांना रोजगार -

बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. त्याप्रमाणेच मागील २५ वर्षांपासून चंद्रकला गणपती कुरवडे आणि त्यांचे कुटुंबीय ऊस तोडणीचे काम करत होते. त्यांचा मुलगा आणि सून देखील ऊसतोडणीला जायचे. मात्र, यावर्षी प्रकल्प समन्वयक ज्योती सांबरे यांच्या मार्गदर्शनातून गृहउद्योग उभारल्यामुळे या कुटुंबाचे ऊस तोडणीचे कोयते कायमचे सुटले आहे. उद्योगासाठी यांनी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले व कांडण यंत्र तसेच उन्हाळी वाळवणाचे काम सुरू केले. त्यामुळे आज खरवडया, पापड्या व कुरवड्यांची २५० ते ३०० रुपये किलोने बाजारात विक्री होत असल्याचे चंद्रकला सांगतात.

घरबसल्या मिळाला रोजगार -

ऊसतोडणीकरून परत आल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लोकांच्या शेतात काम करावे लागायचे. मात्र, गहू उद्योग तसेच कुरवड्या पापड यांचा व्यवसाय सुरू केल्याने आमची परिस्थिती बदलली. आता आम्ही आमच्या गावातच घरी छोटे-मोठे उद्योग करत आहोत. यासाठी आम्हाला नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राने मदत केली, शीला कुरवाडे यांनी सांगितले.

बीड - जिल्ह्यात मागील ३-४ वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे अल्पभूधारक शेतकरी उध्वस्त झाला आहे. कर्जबाजारीपणा व नापिकी यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य निर्माण झाले आहे. एकीकडे ही नकारात्मक परिस्थिती असताना केज तालुक्यातील महिला गृहउद्योगाच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करत आहेत. या महिलांनी गृह उद्योगांमधून कुरड्या, पापड्या, सांडगे, खारवड्या, अशी उन्हाळी वाळवणे तयार करून पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत.

बीडच्या महिलांनी बनविलेल्या कुरड्या पापड्या ला पुण्याच्या मार्केटमध्ये मागणी

महिलांनी बनवलेल्या या वाळवणाला शहरातून चांगली मागणी आहे. दर ३-४ दिवसाला एक टेम्पो भरून उन्हाळी वाळवण पुणे, मुंबईला विक्रीसाठी जात असल्याचे नवंचेतना सर्वांगीन विकास केंद्राच्या समन्वयक ज्योती सांबरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय नेत्याच्या आणि प्रशासनाच्या मदतीशिवाय महिलांनी हा लघुउद्योग प्रकल्प उभारला आहे. नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या माध्यमातून गृह उद्योग करणाऱ्या महिलांसाठी कर्ज पुरवठा केला जातो.

छोटा-मोठा उद्योग उभारण्यासाठी महिलांना सर्वतोपरी मदत करतो, यामध्ये दुग्ध व्यवसाय अथवा उन्हाळी वाळवण तयार करून बाजारात विक्रीसाठी नेण्यास देखील आमची मदत असते. यामध्ये उपक्रमात केज तालुक्यातील ४५० बचत गट काम करत आहेत. पुणे आणि मुंबई येथे नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्यावतीने एक स्टॉल उभारुन या महिलांच्या उत्पादित वस्तू आणि उत्पादनांची विक्री केले जाते, असे नवचेतना विकास केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

ऊसतोड कामगारांना रोजगार -

बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. त्याप्रमाणेच मागील २५ वर्षांपासून चंद्रकला गणपती कुरवडे आणि त्यांचे कुटुंबीय ऊस तोडणीचे काम करत होते. त्यांचा मुलगा आणि सून देखील ऊसतोडणीला जायचे. मात्र, यावर्षी प्रकल्प समन्वयक ज्योती सांबरे यांच्या मार्गदर्शनातून गृहउद्योग उभारल्यामुळे या कुटुंबाचे ऊस तोडणीचे कोयते कायमचे सुटले आहे. उद्योगासाठी यांनी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले व कांडण यंत्र तसेच उन्हाळी वाळवणाचे काम सुरू केले. त्यामुळे आज खरवडया, पापड्या व कुरवड्यांची २५० ते ३०० रुपये किलोने बाजारात विक्री होत असल्याचे चंद्रकला सांगतात.

घरबसल्या मिळाला रोजगार -

ऊसतोडणीकरून परत आल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लोकांच्या शेतात काम करावे लागायचे. मात्र, गहू उद्योग तसेच कुरवड्या पापड यांचा व्यवसाय सुरू केल्याने आमची परिस्थिती बदलली. आता आम्ही आमच्या गावातच घरी छोटे-मोठे उद्योग करत आहोत. यासाठी आम्हाला नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राने मदत केली, शीला कुरवाडे यांनी सांगितले.

Intro:दुष्काळ बाबतची विशेष स्टोरी
बाईट- ज्योती सांबरे( महिला बचत गट समन्वयक)
बाईट- चंद्रकला कुरवडे( गृह उद्योग करणाऱ्या महिला)
बाईट- शीला कुरवाडे (गृह उद्योग करणाऱ्या महिलांची प्रतिक्रिया)
याशिवाय खालील बातमीतील महिलांचे कुरवड्या, पापड्या करतानाचे काही फोटो मेल केले आहेत...
*****************
बीडच्या महिलांनी बनविलेल्या कुरड्या-पापड्या ला पुण्याच्या बाजारात मागणी; सरकारच्या मदतीशिवाय केली जातेय दुष्काळावर मात

बीड- दुष्काळामुळे शेतातली मोलमजुरी बंद झाली, रोजगार हमी च्या कामासाठी जॉबकार्ड नाही. जनावरांना चारा नसल्याने दूध व्यवसायही बंद पडला. आता जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला. आशा बिकट परिस्थितीत देखील न डगमगता उन्हाळी वाळवणाचा उद्योग घरच्या घरी सुरू केला. भीषण दुष्काळात आम्हाला सन्मानाने जगण्याचा मार्ग सापडला. असे अभिमानाने सांगताना त्या महिलांनी सांगितले की, ही किमया घडवून आणली आहे ती बीड जिल्ह्यातील केज येथील ज्योती सांबरे यांनी. ज्योती सांबरे यांनी केज तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना ग्रह उद्योगासाठी प्रोत्साहित करत उत्पादित केलेल्या उत्पादनाला मार्केट देखील उपलब्ध करून दिल्याने दुष्काळातही महिलांना हाताला काम मिळाले आहे. याबाबतचा ईटीव्ही भारत ने घेतलेला हा आढावा....



Body:बीड जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे अल्पभूधारक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कर्जबाजारीपणा व नापिकी यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य निर्माण झाले आहे. एकीकडे ही सगळी नकारात्मक परिस्थिती असली तरी याच दुष्काळी बीड जिल्ह्यात महिला गृहउद्योगातून दुष्काळाशी दोन हात करत मोठ्या स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. ग्रह उद्योगांमध्ये कुरड्या, पापड्या, सांडगे, खरवड्या आदी प्रकारचे उन्हाळी वाळवण तयार करून पुणे मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत. विशेष म्हणजे या महिलांनी बनवलेल्या वाळवण ला शहरातून चांगली मागणी येत आहे. दर तीन-चार दिवसाला एक टेम्पो भरून उन्हाळी वाळवण पुणे, मुंबईला विक्रीसाठी जात असल्याचे नवंचेतना सर्वांगीन विकास केंद्राच्या समन्वयक ज्योती सांबरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे कुठल्याही नेत्याच्या अथवा प्रशासनाच्या मदतीशिवाय केज तालुक्यातील महिला लघुउद्योग करून समर्थपणे जीवन जगत आहे. नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रह उद्योग करणाऱ्या महिलांसाठी कर्ज पुरवठा केला जातो. छोटा-मोठा उद्योग उभारण्यासाठी लागेल ती मदत आम्ही महिलांना करतो यामध्ये कांदं यंत्र दुग्ध व्यवसाय अथवा उन्हाळी वाळवण तयार करून बाजारात विक्रीसाठी नेण्यास देखील आमची मदत असते. यात उपक्रमातून केज तालुक्यात साडेचारशे बचत गट काम करत आहेत. दर तीन-चार दिवसाला एक टेम्पो भरून उन्हाळी वाळवण पुणे-मुंबई येथे विक्रीसाठी पाठवले जाते. पुणे व मुंबई येथे नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या वतीने एक स्टॉल उभा करून बीड जिल्ह्यातील महिलांच्या उत्पादित वस्तूंना अथवा उत्पादनांना विक्री केले जाते.


Conclusion:ग्रह उद्योगामुळे यांच्या हातचे सुटले कोयते-
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. मागील 25 वर्षांपासून ऊस तोडीचे काम करणाऱ्या चंद्रकला गणपती कुरवडे यांच्या कुटुंबीयांनी मागील 25 वर्षांपासून ऊस तोडीचे काम केलेले आहे. मुलगा व सून देखील ऊस तोडीला जायचे. मात्र यावर्षी प्रकल्प समन्वयक ज्योती सांबरे यांच्या मार्गदर्शनातून ग्रहउद्योग उभा केल्यामुळे या कुटुंबाचे ऊस तोडणीचे कोयते कायमचे सुटले. यासाठी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले व कांडण यंत्र तसेच उन्हाळी वाळवण चे काम सुरू केले. खरवडया, पापड्या व कुरवड्या अडीचशे ते तीनशे रुपये किलोने पुणे मुंबईच्या बाजारात विक्री होत असल्याचे चंद्रकला यांनी सांगितले.

लोकांच्या शेतात कामाला जायची गरज नाही-
ऊस तोडणी करून परत गावी आल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आम्हाला लोकांच्या शेतात जाऊन काम करावे लागत होते. मात्र गहू उद्योग तसेच कुरवड्या पापड यांचा व्यवसाय आम्ही सुरू केला. आणि आमची परिस्थिती ती बदलली ऊस तोडणी कोयता देखील हातचा सुटला आहे. आता आम्ही आमच्या गावात व घरीच छोटे-मोठे उद्योग करून स्वाभिमानाने आज जगतो आहोत. यासाठी आम्हाला नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या समन्वयक ज्योती सांबरे यांनी मदत केली असे कुरवाडे यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.