ETV Bharat / state

बीड : केंद्रीय पथक पाहणीसाठी येण्याआधीच शेतकऱ्याची आत्महत्या; निपाणी टाकळी येथील घटना

केंद्रीय पथक नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात येण्याआधीच निपाणी टाकळी येथील नारायण सोळंके या शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे ते मागील काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते.

author img

By

Published : Nov 22, 2019, 5:22 PM IST

मृत नारायण अप्पाराव सोळंके

बीड - परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी एक केंद्रीय पथक जिल्ह्यात येणार आहे. मात्र, हे पथक दाखल होण्याआधीच माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. नारायण अप्पाराव सोळंके (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - राज्यभरात मागील दहा महिन्यांमध्ये 2 हजार 225 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राजू शेट्टी संतप्त

नारायण सोळंके यांच्याकडे दहा एकर बागायती शेती आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे ते मागील काही दिवसांपासून चिंतेत होते. सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले असता, घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, निपाणी टाकळी शिवारातील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बीड - परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी एक केंद्रीय पथक जिल्ह्यात येणार आहे. मात्र, हे पथक दाखल होण्याआधीच माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. नारायण अप्पाराव सोळंके (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - राज्यभरात मागील दहा महिन्यांमध्ये 2 हजार 225 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राजू शेट्टी संतप्त

नारायण सोळंके यांच्याकडे दहा एकर बागायती शेती आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे ते मागील काही दिवसांपासून चिंतेत होते. सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले असता, घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, निपाणी टाकळी शिवारातील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:केंद्रीय पथकला शेतकरी आत्महत्या ने सलामी; निपाणी टाकळी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

बीड- बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी एक केंद्रीय पथक बीड जिल्ह्यात येत आहे. त्यांच्या स्वागतालाच जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथे वयोवृद्ध शेतकऱ्याने नापिकी व नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आली आहे.

नारायण अप्पाराव सोळंके (वय ६५) यांनी शुक्रवारी स्वतः च्या निपाणी टाकळी शिवारातील शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, नारायण सोळंके यांना १० एकर बागायती जमीन असुन त्यांना दोन मुली व एक मुलगा हे तिघेही विवाहित आहेत. सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले होते व ते घरीच आले नाही म्हणून नातेवाईकांनी शोधाशोध केली पण त्यांना पत्ता लागला नाही आणि शेवटी त्या़ंचे प्रेत झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. मागील काही दिवसात ते चिंताक्रांत परिस्थितीत होते सदर पडणारा दुष्काळ नापिकी व परतीच्या पावसाचा फटका यातून झालेल्या नुकसानीमुळे त्यांना नैराश्य आले होते.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.