ETV Bharat / state

ऑनलाईन महापरीक्षा पोर्टल रद्द करा; बीडमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

author img

By

Published : Jul 31, 2019, 7:29 PM IST

ऑनलाईन महापरीक्षा पोर्टल रद्द करुन ऑफलाईन परीक्षा घ्या, अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

बीडमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

बीड - ऑनलाईन महापरीक्षा पोर्टल रद्द करुन ऑफलाईन परीक्षा घ्या, अशी मागणी करत आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बीडमध्ये आंदोलन केले.

महाराष्ट्र सरकारद्वारे महाभरती प्रक्रियेतील सरळ सेवा भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे विविध पदासाठी परीक्षा घेण्यात येतात. मात्र, परीक्षा घेत असताना परीक्षा दिलेल्या उमेदवाराला प्रश्नपत्रिका दिली जात नाही. त्यामुळे आम्ही या महापरीक्षा पोर्टलला आमचा विरोध आहे, असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

बीडमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

ऑनलाईन महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेण्याचे बंद करुन ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्र सरकारने परीक्षा घ्याव्यात, अशी आमची मुख्य मागणी आहे, असे म्हणत या विद्यार्थ्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी केली. यामुळे हा परिसर दणाणून गेला.

यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सर्व स्पर्धा परीक्षार्थी आंदोलकांनी म्हटले, की एका पदाची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात यावी, याशिवाय एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात यावी, जिल्हा नियोजन समितीमार्फत परीक्षा शुल्क निश्चित करावे, वनरक्षक आणि तलाठी परीक्षेत खूप मोठा गोंधळ असून सदरील परीक्षा लेखी स्वरुपात परत नव्याने घेण्यात यावी. तसेच मेघा पोलीस भरती लवकरात लवकर घ्यावी. यासह विविध मागण्या बीड जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान केल्या.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर विक्रांत वीर, नितीन चव्हाण, जयवंत जगताप, प्रदीप तुपे, दत्ता गवते, सौरभ कोरडे यासह शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले.

बीड - ऑनलाईन महापरीक्षा पोर्टल रद्द करुन ऑफलाईन परीक्षा घ्या, अशी मागणी करत आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बीडमध्ये आंदोलन केले.

महाराष्ट्र सरकारद्वारे महाभरती प्रक्रियेतील सरळ सेवा भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे विविध पदासाठी परीक्षा घेण्यात येतात. मात्र, परीक्षा घेत असताना परीक्षा दिलेल्या उमेदवाराला प्रश्नपत्रिका दिली जात नाही. त्यामुळे आम्ही या महापरीक्षा पोर्टलला आमचा विरोध आहे, असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

बीडमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

ऑनलाईन महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेण्याचे बंद करुन ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्र सरकारने परीक्षा घ्याव्यात, अशी आमची मुख्य मागणी आहे, असे म्हणत या विद्यार्थ्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी केली. यामुळे हा परिसर दणाणून गेला.

यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सर्व स्पर्धा परीक्षार्थी आंदोलकांनी म्हटले, की एका पदाची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात यावी, याशिवाय एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात यावी, जिल्हा नियोजन समितीमार्फत परीक्षा शुल्क निश्चित करावे, वनरक्षक आणि तलाठी परीक्षेत खूप मोठा गोंधळ असून सदरील परीक्षा लेखी स्वरुपात परत नव्याने घेण्यात यावी. तसेच मेघा पोलीस भरती लवकरात लवकर घ्यावी. यासह विविध मागण्या बीड जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान केल्या.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर विक्रांत वीर, नितीन चव्हाण, जयवंत जगताप, प्रदीप तुपे, दत्ता गवते, सौरभ कोरडे यासह शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले.

Intro:बातमीसोबत व्हिज्युअल व दोन स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे बाईट पाठवत आहे...
*******
ऑनलाइन महापरीक्षा पोर्टल रद्द करून ऑफलाइन परीक्षा घ्या; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी

बीड- महाराष्ट्र शासनाद्वारे महाभरती प्रक्रियेतील सरळ सेवा भरतीसाठी महापरीक्षा पोर्टल द्वारे विविध पदासाठी परीक्षा घेण्यात येतात. मात्र परीक्षा घेत असताना परीक्षा दिलेल्या उमेदवाराला प्रश्नपत्रिका दिली जात नाही. त्यामुळे आम्ही या महापरीक्षा पोर्टल ला विरोध करत आहोत. पोर्टल द्वारे परीक्षा घेण्याचे बंद करून ऑफलाइन पद्धतीने महाराष्ट्र सरकारने परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी बीड जिल्ह्यातील सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलनादरम्यान केली. यावेळी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलक विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.


Body:यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सर्व स्पर्धा परीक्षार्थी आंदोलकांनी म्हटले आहे की, एका पदाची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात यावी, याशिवाय एम. पी. एस. सी. च्या धर्तीवर परीक्षा घेण्यात यावी, जिल्हा नियोजन समितीमार्फत फीस निश्चित करावी, वनरक्षक आणि तलाठी परीक्षेत खूप मोठा गोधळ असून सदरील परीक्षा लेखी स्वरूपात परत नव्याने घेण्यात यावी. आणि मेघा पोलीस भरती लवकरात लवकर घ्यावी. यासह विविध मागण्या बीड जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान केल्या आहेत.


Conclusion:प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर विक्रांत वीर नितीन चव्हाण, जयवंत जगताप, प्रदीप तुपे, दत्ता गवते, सौरभ कोरडे यासह शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी बीड यांना विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.