ETV Bharat / state

बालदिन विशेष : उपेक्षित समाजातील बालके अजूनही विकासापासून दूरच....

author img

By

Published : Nov 14, 2019, 6:32 AM IST

Updated : Nov 14, 2019, 7:10 PM IST

एकीकडे शाळेतील बालदिनाच्या कार्यक्रमाला लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीटे वाटप केली जातात. तर दुसरीकडे मात्र, वितभर पोटासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आणि पालावरचे आयुष्य जगणाऱ्या वंचित, उपेक्षित घटकांतील मुलांना 'बालदिन' म्हणजे काय? हे माहीतही नसते.

बीड जिल्ह्यातील वंचित, उपेक्षित घटकातील बालके

बीड - पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणजेच 'बालदिन' म्हटला की लहान मुलांची धम्माल असते. अलीकडच्या काळात काही शाळांमधील लहान मुले नटून थटून शाळेमध्ये येतात. बालदिनाच्या दिवशी विविध उपक्रमांमध्ये मुले सहभागी होतात. मात्र दुसरीकडे, वितभर पोटासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आणि पालावरचे आयुष्य जगणाऱ्या वंचित, उपेक्षित घटकांतील मुलांना 'बालदिन' म्हणजे काय? हे माहीतही नसते.

उपेक्षित समाजातील बालके अजूनही विकासापासून दूरच

बीड शहरात हॉटेल व रस्त्याच्या कडेला छोट्या-मोठ्या वस्तू विकणारी लहान मुले आजही दिसतात. प्रशासन मात्र कागदावर बालकामगार थांबवण्यासाठी प्रयत्न करते. परंतु, प्रत्यक्षात मात्र ना बालकामगार कमी झालेत ना पालावरच्या त्या चिमुकल्यांच्या आयुष्यातील अंधार कमी झाला आहे. सत्तास्थापनेसाठी ज्याप्रकारे लोकप्रतिनिधी झगडत आहेत, त्याप्रमाणेच जर या चिमुकल्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न झाले, तर या वंचित व उपेक्षितांच्या आयुष्यात प्रकाश येईल. अन्यथा अंधारात चाचपडणाऱ्या त्या निरागस व चिमुकल्यांच्या आयुष्यात असे कितीही बालदिन (चिल्ड्रन डे) येऊन गेले, तरीही त्यांच्या नशिबी अठराविश्व दारिद्र्य राहणार, हे तितकेच खरे आहे.

हेही वाचा... बालदिन विशेष : या दोन बालकांनी मोठे होऊन गाजवला मराठीसह हिंदीचा रुपेरी पडदा

पोटाची खळगी भरण्यासाठी आज इथे तर उद्या तिथे, असा प्रवास करणाऱ्यांच्या मुलांची स्थिती बिकट आहे. आई वडिलांच्या नशिबी आलेले अठराविश्व दारिद्र्य अगदी कोवळ्या वयात भोगणाऱ्या या चिमुकल्यांच्या भविष्याचा प्रश्न बिकट आहे. राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून चाललेल्या गोंधळात, या निरागस चिमुकल्यांचा किलबिलाट सरकारच्या कानी पडेल का, असा प्रश्न अशावेळी उपस्थित होतो.

बीड - पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणजेच 'बालदिन' म्हटला की लहान मुलांची धम्माल असते. अलीकडच्या काळात काही शाळांमधील लहान मुले नटून थटून शाळेमध्ये येतात. बालदिनाच्या दिवशी विविध उपक्रमांमध्ये मुले सहभागी होतात. मात्र दुसरीकडे, वितभर पोटासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आणि पालावरचे आयुष्य जगणाऱ्या वंचित, उपेक्षित घटकांतील मुलांना 'बालदिन' म्हणजे काय? हे माहीतही नसते.

उपेक्षित समाजातील बालके अजूनही विकासापासून दूरच

बीड शहरात हॉटेल व रस्त्याच्या कडेला छोट्या-मोठ्या वस्तू विकणारी लहान मुले आजही दिसतात. प्रशासन मात्र कागदावर बालकामगार थांबवण्यासाठी प्रयत्न करते. परंतु, प्रत्यक्षात मात्र ना बालकामगार कमी झालेत ना पालावरच्या त्या चिमुकल्यांच्या आयुष्यातील अंधार कमी झाला आहे. सत्तास्थापनेसाठी ज्याप्रकारे लोकप्रतिनिधी झगडत आहेत, त्याप्रमाणेच जर या चिमुकल्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न झाले, तर या वंचित व उपेक्षितांच्या आयुष्यात प्रकाश येईल. अन्यथा अंधारात चाचपडणाऱ्या त्या निरागस व चिमुकल्यांच्या आयुष्यात असे कितीही बालदिन (चिल्ड्रन डे) येऊन गेले, तरीही त्यांच्या नशिबी अठराविश्व दारिद्र्य राहणार, हे तितकेच खरे आहे.

हेही वाचा... बालदिन विशेष : या दोन बालकांनी मोठे होऊन गाजवला मराठीसह हिंदीचा रुपेरी पडदा

पोटाची खळगी भरण्यासाठी आज इथे तर उद्या तिथे, असा प्रवास करणाऱ्यांच्या मुलांची स्थिती बिकट आहे. आई वडिलांच्या नशिबी आलेले अठराविश्व दारिद्र्य अगदी कोवळ्या वयात भोगणाऱ्या या चिमुकल्यांच्या भविष्याचा प्रश्न बिकट आहे. राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून चाललेल्या गोंधळात, या निरागस चिमुकल्यांचा किलबिलाट सरकारच्या कानी पडेल का, असा प्रश्न अशावेळी उपस्थित होतो.

Intro: (संबंधित बातमी पॅकेज स्टोरी साठी पाठवत आहे. यामध्ये तत्वशिल कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) यांचा बाईट तसेच p2c व पालावरील लहान मुलांचे विजवल तसेच मुले काम करतानाचे व्हिज्युअल अपलोड केलेले आहेत)

बालदिन स्पेशल; वंचित,उपेक्षित घटकातील बालके 'दीन'च

पालावरचं आयुष्य जगणाऱ्या चिमुकल्यांचे केव्हा येणार 'अच्छे दिन'

बीड- बालदिन ('चिल्ड्रन डे') म्हटलं की उच्चभ्रू वर्गातील मुलांची खरंतर धम्माल असते. अलीकडच्या काळात इंग्रजी शाळांमधील मुलं नटून-थटून स्कूलमध्ये येतात. चिल्ड्रन डे च्या दिवशी विविध उपक्रमात मुलं सहभागी होतात. शाळेतील समारोपाला शाळेकडून चॉकलेट, बिस्कीट वाटप केली जातात. मात्र वितभर पोटासाठी काबाडकष्ट करणाऱ्या अन् पालावरचं आयुष्य जगणाऱ्यांची मुलं 'चिल्ड्रन डे' म्हणजे काय असतं हे ही त्यांना माहीत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी आज इथे तर उद्या तिथे असा प्रवास करणाऱ्यांच्या मुलांची स्थिती बिकट आहे. आई बापाच्या नशीबी आलेलं अठराविश्व दारिद्र्य अगदी कोवळ्या वयात भोगणाऱ्या या चिमुकल्यांच्या 'चिल्ड्रन डे' ला काय नाव द्यायचं? असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा संवेदनशील मने सुन्न होतात. राज्यात सध्या सत्ता स्थापने वरून चाललेल्या गोंधळात या कोवळ्या व पालावरचं आयुष्य जगणार्‍या निरागस चिमुकल्यांचा किलबिलाट या सरकारच्या कानी पडेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Body:गुरुवारी जिल्हाभरात पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन बालदिन म्हणजेच 'चिल्ड्रन डे' म्हणून देशभरात साजरा केला जात आहे. इंग्रजी शाळांमधील मुलं मोठ्या उत्साहात बालदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम व उपक्रमांमध्ये उस्फूर्तपणे सहभागी होताना दिसतात. मात्र दुसरीकडे पालावरचं व निराश्रित आयुष्य जगणाऱ्या त्या निरागस चिमुकल्यांच्या बालदिना ची काय अवस्था आहे हे पाहण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही. अन समजा जरी वेळ मिळालाच तरी केवळ गोळ्या-बिस्किट वाटून त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा तोकडा प्रयत्न होत असतो. मात्र त्या चिमुकल्यांच्या आयुष्याला किंवा त्यांच्या पालकांना कायमचा आधार मिळेल अशी यंत्रणा आजवर शासनाने राबवली ना प्रशासन त्यासाठी सकारात्मक आहे. जून महिना आला की केवळ शाळाबाह्य मुलं शोधायची आकडे फुगवायचे एवढाच काय तो प्रयत्न झालेला. या स्थितीबाबत बोलताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तत्वशिल कांबळे यांनी सांगितले की, पालावर आयुष्य जगणाऱ्या मुलांपर्यंत शिक्षण व मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अधिक प्रयत्न अपेक्षित आहेत. याचा अर्थ असा नाही की, यापूर्वी प्रयत्न झाले नाहीत असे नाही मात्र उपेक्षितांची संख्या लक्षात घेता त्या पटीने शाळाबाह्य मुलं असतील किंवा वाड्या, वस्ती, तांड्यावर राहणारी कुटुंबे असतील त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणारा उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. हे करणे म्हणजेच बालदिनाच्या शुभेच्छा असतील असे ते म्हणाले.


Conclusion:बीड शहरात हॉटेल व रस्त्याच्या कडेला छोट्या-मोठ्या वस्तू विकणारी लहान मुलं आजही दिसतात. प्रशासन मात्र कागदावर बालकामगारी थांबवण्यासाठी प्रयत्न करते. परंतु प्रत्यक्षात मात्र बालकामगार कमी झालेत ना पालावरच्या त्या चिमुकल्यांच्या आयुष्यातील अंधार कमी झालयं. सत्तास्थापनेसाठी ज्याप्रकारे लोकप्रतिनिधी झगडत आहेत त्याप्रमाणेच जर या चिमुकल्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न झाले तर या वंचित व उपेक्षितांच्या आयुष्यात प्रकाश येईल अन्यथा अंधारात चाचपडणाऱ्या त्या निरागस व चिमुकल्यांच्या आयुष्यात असे कितीही बालदिन ( चिल्ड्रन डे) येऊन गेले तरीही नशिबी अठराविश्व दारिद्र्य राहणार हे तितकेच खरे....
********
सोबत
तत्वशिल कांबळे यांचा बाईट व p2c तसेच व्हिज्युअल
Last Updated : Nov 14, 2019, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.