ETV Bharat / state

बीडमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची २५ किलोमीटरची पायपीट - खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही

पीक विम्याचा हप्ता भरूनही संपूर्ण गावाला योजनेपासून दूर ठेवल्याच्या निषेधार्थ आपेगावातील शेतकऱ्यांनी चक्क 25 किलोमीटर चालत जात, अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

बीडच्या आपेगावातील शेतकऱ्यांचा मोर्चा
author img

By

Published : Sep 14, 2019, 5:32 PM IST

बीड - जिल्ह्यातील आपेगावातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरूनही गावाला या योजनेपासून दूर ठेवल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. यावेळी शेतकऱ्यांनी २५ किलोमीटरची पायपीट करत अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयावर धडक मारली.

आपेगावातील शेतकऱ्यांनी पिक विमासाठी अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला

हेही वाचा... केंद्रासह राज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी टाळावी; आरबीआय अंतर्गत कार्यसमुहाची शिफारस

या मोर्चात महिला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा... रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी विशेष खिडकीतून १० हजार कोटी; निर्यातवाढीसाठी विविध योजना अर्थमंत्र्यांकडून जाहीर​​​​​​​

अंबाजोगाई तालुक्यामधील आपेगाव येथील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरूनही सन २०१८ साली खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. विमा कंपनीने हे गावच तांत्रिकदृष्ट्या या योजनेपासून वंचित ठेवले. ग्रामस्थांनी यापूर्वी चारवेळा उपजिल्हाधिकारी, कृषी कार्यालय यांना निवेदने दिली. मात्र याची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी शनिवारी पायी मोर्चा काढला. ग्रामस्थांना पीकविम्याची रक्कम तात्काळ द्यावी, गुरांना चारा उपलब्ध करून द्यावा, गावात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा विविध मागण्या यावेळी शेतकऱ्यांकडून मांडण्यात आल्या.

बीड - जिल्ह्यातील आपेगावातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरूनही गावाला या योजनेपासून दूर ठेवल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. यावेळी शेतकऱ्यांनी २५ किलोमीटरची पायपीट करत अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयावर धडक मारली.

आपेगावातील शेतकऱ्यांनी पिक विमासाठी अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला

हेही वाचा... केंद्रासह राज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी टाळावी; आरबीआय अंतर्गत कार्यसमुहाची शिफारस

या मोर्चात महिला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा... रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी विशेष खिडकीतून १० हजार कोटी; निर्यातवाढीसाठी विविध योजना अर्थमंत्र्यांकडून जाहीर​​​​​​​

अंबाजोगाई तालुक्यामधील आपेगाव येथील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरूनही सन २०१८ साली खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. विमा कंपनीने हे गावच तांत्रिकदृष्ट्या या योजनेपासून वंचित ठेवले. ग्रामस्थांनी यापूर्वी चारवेळा उपजिल्हाधिकारी, कृषी कार्यालय यांना निवेदने दिली. मात्र याची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी शनिवारी पायी मोर्चा काढला. ग्रामस्थांना पीकविम्याची रक्कम तात्काळ द्यावी, गुरांना चारा उपलब्ध करून द्यावा, गावात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा विविध मागण्या यावेळी शेतकऱ्यांकडून मांडण्यात आल्या.

Intro:बीडमध्ये पीकविम्यासाठी शेतकऱ्यांची २५ किलोमीटरची पायपीट; शासनावर व्यक्त केला रोष

बीड : पीक विम्याचा हप्ता भरूनही संपूर्ण गावाला या योजने पासून दूर ठेवल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात आपेगाव येथे घडला आहे. विमा कंपनी व शासनाच्या या तुघलकी कारभारा विरोधात शेतकऱ्यांनी चक्क 25 किलोमीटर चालत जात अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची मोठी उपस्थिती होती यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले


बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील आपेगाव येथील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरूनही सन २०१८ साली खरीप हंगामाचा पीक विमा शेतक-यांना मिळाला नाही. विमा कंपनीने हे गावच तांत्रिकदृष्ट्या या योजनेपासून वंचित ठेवले. ग्रामस्थांनी यापूर्वी चारवेळा उपजिल्हाधिकारी, कृषी कार्यालय यांना निवेदने दिली. मात्र,याची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी आज पायी मोर्चा काढला. ग्रामस्थांना पीकविम्याची रक्कम तात्काळ द्यावी, गुरांना चारा उपलब्ध करून द्यावा, गावात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. दुष्काळात सापडलेल्या शेतक-यांना पीक विम्याचा आधार मिळेल. यासाठी पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करावी. ही प्रमुख मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी शेतक-यांशी संवाद साधून या मागणीचा पाठपुरावा दिल्लीच्या मुख्य कार्यालयाकडे सुरू असल्याचे सांगितले. अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव, धानोरा, अंजनपूर, कोपरा येथील शेतक-यांनी आपेगाव ते अंबाजोगाई या हे २५ कि.मी. अंतर पायी पार करत मोर्चा काढला. हा मोर्चा सकाळी ८ वाजता आपेगाव येथून निघाला. तो दुपारी ३ वाजता अंबाजोगाईत येऊन धडकला.
या मोर्चात महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच या मोर्चाला आधार माणुसकीचा या सामाजिक संघटनेने आपला पाठिंबा दर्शविला होता.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.