बीड : जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. त्याचबरोबर या जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्यामुळे अनेक तरुण शिक्षण घेऊनसुद्धा नोकरी लागत नाही. व्यवसाय केला तर व्यवसायात यश येत नाही. त्यानंतर बीड (Beed District Suicide Statistics) जिल्ह्यात एमआयडीसीची आठ ठिकाणी शासनाने जागा आरक्षित केलेली आहे. मात्र बीड शहर सोडता बाकी इतर ठिकाणी तुरळक उद्योग उभे राहिलेले आहेत. (501 suicides in last 11 months) तर काही एमआयडीसीच्या आरक्षित जागेत एकही उद्योग नसल्याचे चित्र या बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे एकीकडे सुशिक्षित तरुणांना रोजगार नसल्याचे सुद्धा या ठिकाणी निष्पन्न होत आहे. नैराश्यातून सुद्धा अनेक तरुण आपले जीवन संपवित (Suicidal Mindset) असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Beed Crime)
बीडमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त : मराठवाड्यात बीडमध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासोबतच विविध वयोगटातील स्त्री-पुरुष अगदी क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसत आहे. नैराश्येकडे झुकलेली व्यक्ती आपल्या जिवाचे बरेवाईट करून घेणार आहे, याची कधी-कधी जवळच्यांनाही कल्पना नसते. मात्र, चेहऱ्यावरील हास्यामागेदेखील वेदना असू शकतात. याचा प्रत्यय जिल्ह्यातील काही आत्महत्येच्या घटनांनी आला आहे. यामुळे स्वतःचा जीव देऊन सुटका करून घेण्यापेक्षा आलेल्या संकटांचा धैर्याने सामना करणे हिताचे आहे.
कोणत्या महिन्यात किती आत्महत्या झाल्या?
1) जानेवारी - 40
2) फेब्रुवारी - 59
3) मार्च - 28
4) एप्रिल - 49
5) मे -. 65
6) जून - 59
7) जुलै - 28
8) ऑगस्ट - 45
9) सप्टेंबर - 33
10) ऑक्टोबर - 55
11) नोव्हेंबर. - 40
------------------
एकूण - 501
अकरा महिन्यांमध्ये 500 आत्महत्या : बीड जिल्ह्यामध्ये मागील अकरा महिन्यांमध्ये 500 आत्महत्या झालेले आहेत. आत्महत्या वास्तविक पाहता या नैराश्यातून झालेल्या आहेत याची कारणे आहेत ते विविध आहेत त्याच्यामध्ये बेरोजगारी, व्यवसाय असेल तर व्यवसायमध्ये यश न येणे, कौटुंबिक हिंसाचार याची सुद्धा शिकार काही लोक झालेले आहेत. गेल्या 11 महिने महिन्यामध्ये एवढ्या आत्महत्या होणे हे फार भयानक आहे. शेतकऱ्यांसाठी समुपदेशन केंद्र आहेत मात्र नैराशातून होत असलेल्या आत्महत्यांसाठी समोपदशन केंद्र नाही.
या उपायांची गरज : या आत्महत्येच्या घटना जेव्हा समोर येतात तेव्हा प्रत्येक आत्महत्या मागची कहानी वेगळी असते. यामध्ये शेतकरीच म्हणून नाहीतर सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी सुद्धा आत्महत्या करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खंबीर राहील पाहिजे. प्रत्येक आत्महत्येचे कारण वेगळं आहे. त्याचं विश्लेषण करता येणार नाही आणि छोट्या छोट्या समस्यांना सामोरे जायला पाहिजे, असा विचार आपल्या मनात जर आला तर आपण तो विचार मित्रापाशी किंवा नातेवाईका पाशी बोलून दाखवला पाहिजे. त्याच्यासाठी सर्वांनी त्या माणसाचे समाप्तीचे केले पाहिजे.