ETV Bharat / state

नगरपरिषदेच्या कोंडवाड्यातून ५ जनावरे पळवली, एका गाईला अमानुषपणे मारहाण - कन्नड नगर परिषदेच्या कोंडवाड्यातून जनावरे पळवले

कन्नड शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना कोंडवाड्यात डांबण्यात येते. नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात ११ मोकाट जनावरे होती. त्यापैकी ५ जनावारांना चोरट्यांनी पळवले. यावेळी एका गाईला आतिशय अमानुषपणे मारहाण केली गेली.

theif stolen 5 cattle from kannad corporation
नगरपरिषदेच्या कोंडवाड्यातून ५ जनावरे पळवले
author img

By

Published : Dec 5, 2019, 10:11 PM IST

औरंगाबाद - कन्नड नगर परिषदेच्या आवारात असलेल्या कोंडवाड्याची भिंत पाडून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ५ जनावरे पळवली. यापैकी एका गाईला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. बेकायदेशीर गोमास विक्री करण्यासाठी ही जनावरे चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना कोंडवाड्यात डांबण्यात येते. नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात ११ मोकाट जनावरे होती. त्यापैकी ५ जनावारांना चोरट्यांनी पळवले. यावेळी एका गाईला आतिशय अमानुषपणे मारहाण केली गेली. या गाईवर नगरपरिषदेकडून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेने शहर पोलिसात याबद्दल तक्रार दाखल केली आहे.

जनावरांना कोंडवाड्यात चारापाण्याची व्यवस्था असल्यामुळे या जनावरांचे मालक महिना-महिना आपली जनावरे घेऊन जात नाहीत. शेवटी कमी दंड भरून ही जनावरे घेऊन जातात. यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांचा चारा-पाण्याचा खर्च वाचतो. याशिवाय गोहत्या करणाऱ्या तथाकथित गुन्हेगारांनी जनावरे मोकाट सोडून दिली आहेत. गरज पडल्यास ही जनावरे पकडली जातात. तसेच त्यांची हत्या केली जाते. त्यामुळे कुणाला संशय सुद्धा येत नाही. अशी नवीन पद्धत गुन्हेगारांनी शोधली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शहरात ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला असताना देखील शहरात चोरीच्या अनेक घटना होत आहेत. यामुळे पोलीस प्रशासन घेत असलेल्या खबरदारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

औरंगाबाद - कन्नड नगर परिषदेच्या आवारात असलेल्या कोंडवाड्याची भिंत पाडून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ५ जनावरे पळवली. यापैकी एका गाईला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. बेकायदेशीर गोमास विक्री करण्यासाठी ही जनावरे चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना कोंडवाड्यात डांबण्यात येते. नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात ११ मोकाट जनावरे होती. त्यापैकी ५ जनावारांना चोरट्यांनी पळवले. यावेळी एका गाईला आतिशय अमानुषपणे मारहाण केली गेली. या गाईवर नगरपरिषदेकडून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेने शहर पोलिसात याबद्दल तक्रार दाखल केली आहे.

जनावरांना कोंडवाड्यात चारापाण्याची व्यवस्था असल्यामुळे या जनावरांचे मालक महिना-महिना आपली जनावरे घेऊन जात नाहीत. शेवटी कमी दंड भरून ही जनावरे घेऊन जातात. यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांचा चारा-पाण्याचा खर्च वाचतो. याशिवाय गोहत्या करणाऱ्या तथाकथित गुन्हेगारांनी जनावरे मोकाट सोडून दिली आहेत. गरज पडल्यास ही जनावरे पकडली जातात. तसेच त्यांची हत्या केली जाते. त्यामुळे कुणाला संशय सुद्धा येत नाही. अशी नवीन पद्धत गुन्हेगारांनी शोधली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शहरात ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला असताना देखील शहरात चोरीच्या अनेक घटना होत आहेत. यामुळे पोलीस प्रशासन घेत असलेल्या खबरदारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Intro:
शहरात स्वामी समर्थ मंदिरातील चोरीची घटना ताजी असतानाच कन्नड नगर परिषदेच्या आवारात असलेल्या कोंडवाड्यातुन अज्ञात चोरांनी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कोंडवाड्यात बंदिस्त केलेले अकरा मोकाट जनावरांना पैकी पाच जनवारे भिंत पाडून पळविले व यापैकी एका गाईला अमानुषपणे मारहाण करून पोबारा केला.
Body:या घटनेमुळे कन्नड शहरात एकच खळबळ उडाली आहे असून घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेने शहर पोलिसात याबद्दल तक्रार दाखल केली आहे. शहरात सहा डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला असताना देखील शहरात चोरीच्या अनेक घटना होत असून यामुळे पोलीस प्रशासन घेत असलेल्या खबरदारी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपरिषद हद्दीत असलेल्या कोंडवाड्यातून जनावरे पळून येतांना एका गाईला आतिशय अमानुषपणे मारहाण केली गेली. या गाईला एका नालीत डांबून तिच्या डोक्यात लोखंडी खांब टाकुन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला .याजखमी गाईवर नगरपरिषद उपचार करीत आहे . हे पळवून नेलेले जनावरे हे बेकायदेशीर गोमास विक्री करण्यासाठी चोरी केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.Conclusion:कन्नड शहरात मोकाट फिरणारे जनावरांमुळे मागील काही दिवसांपासून अनेक अपघात होत असल्यामुळे शहरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी मोकाट या जनावरांना पकडून कोंडवाड्यात डांबण्यात येते. कोंडलेल्या जनावरांना कोंडवाड्यात चारापाण्याची व्यवस्था असल्यामुळे या जनावरांचे मालक हे महिना महिना आपली जनावरे घेऊन जात नाही आणि शेवटी अगदी मामुली दंड भरून ही जनावरे घेऊन जातात यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांचा संभाळण्याचा चारापाण्याचा खर्च वाचतो याशिवाय गोहत्या करणारे तथाकथित गुन्हेगारांनी जनावरे मोकाट सोडून दिले आहेत गरज पडल्यास ही जनावरे पकडले जातात व त्यांची हत्या केली जाते त्यामुळे कुणाला संशय सुद्धा येत नाही अशी नवीन पद्धत गुन्हेगारांनी शोधली असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.