ETV Bharat / state

मंदिर उघडण्याच्या मागणीवरून औरंगाबादेत शिवसेना-एमआयएम आमने सामने

author img

By

Published : Sep 1, 2020, 4:13 PM IST

दुपारी दोनच्या सुमारास एमआयएमचे कार्यकर्ते मंदिर परिसरात दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे हे मंदिर परिसरात दाखल झाल्याने वातावरण तापले होते.

औरंगाबाद
औरंगाबाद

औरंगाबाद - धार्मिक स्थळे उघडण्याचा मुद्द्यावरून औरंगाबाद शिवसेना आणि एमआयएम आमने-सामने आले आहेत. पोलिसांच्या आश्वासनानंतर एमआयएमने मंदिरांमध्ये जाऊन निवेदन देण्याचे रद्द केले. मात्र, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हे राजकारण असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. शेवटच्या क्षणी मनसेने देखील या वादात उडी घेत शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे असल्याचा आरोप केला.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी 1 सप्टेंबरपासून मंदिरे उघडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जलील औरंगाबादच्या ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिरात पुजाऱ्यांना निवेदन देण्यासाठी येणार होते. यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्त लावत मंदिराला वेढा घातला होता. दुपारी दोनच्या सुमारास एमआयएमचे कार्यकर्ते मंदिर परिसरात दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे हे मंदिर परिसरात दाखल झाल्याने वातावरण तापलं होते. दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी त्याला प्रतिसाद देत मंदिर परिसर सोडला.

पोलिसांनी मंदिराकडे निवेदन देऊ नका, असे सांगितल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी आपण आज निवेदन देणार नसून दोन-तीन दिवसांनी हे निवेदन देऊ. मी मंदिर उघडण्याची मागणी केल्यानंतर काही जणांना ही बाब आवडली नाही. त्यामुळे ते काही वक्तव्ये करत आहेत. आज गणेश विसर्जन असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरता आपण निवेदन देण्याचे रद्द करत आहोत. मात्र, उद्या मशीद आम्ही उघडणार असल्याचे जलील यांनी सांगितले. तर दुसरीकडे सणाच्या दिवशी इम्तियाज जलील राजकारण करू पाहत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे शहरातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो. जलील मंदिर उघडायला आले, तर आम्ही येथे उभे आहोत, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी दिला.

ऐनवेळी मनसेने देखील या वादात उडी घेतली. शेवटच्या क्षणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे आपल्या कार्यकर्त्यांसह खडकेश्वर मंदिर परिसरात दाखल झाले. शिवसेना आणि एमआयएम हे दोघे मिळून शहरात वातावरण खराब करत आहेत. दोघं एकमेकांना मिळालेले आहेत. धार्मिक स्थळांच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या या दोन्ही पक्षांचा आम्ही निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद - धार्मिक स्थळे उघडण्याचा मुद्द्यावरून औरंगाबाद शिवसेना आणि एमआयएम आमने-सामने आले आहेत. पोलिसांच्या आश्वासनानंतर एमआयएमने मंदिरांमध्ये जाऊन निवेदन देण्याचे रद्द केले. मात्र, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हे राजकारण असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. शेवटच्या क्षणी मनसेने देखील या वादात उडी घेत शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे असल्याचा आरोप केला.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी 1 सप्टेंबरपासून मंदिरे उघडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जलील औरंगाबादच्या ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिरात पुजाऱ्यांना निवेदन देण्यासाठी येणार होते. यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्त लावत मंदिराला वेढा घातला होता. दुपारी दोनच्या सुमारास एमआयएमचे कार्यकर्ते मंदिर परिसरात दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे हे मंदिर परिसरात दाखल झाल्याने वातावरण तापलं होते. दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी त्याला प्रतिसाद देत मंदिर परिसर सोडला.

पोलिसांनी मंदिराकडे निवेदन देऊ नका, असे सांगितल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी आपण आज निवेदन देणार नसून दोन-तीन दिवसांनी हे निवेदन देऊ. मी मंदिर उघडण्याची मागणी केल्यानंतर काही जणांना ही बाब आवडली नाही. त्यामुळे ते काही वक्तव्ये करत आहेत. आज गणेश विसर्जन असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरता आपण निवेदन देण्याचे रद्द करत आहोत. मात्र, उद्या मशीद आम्ही उघडणार असल्याचे जलील यांनी सांगितले. तर दुसरीकडे सणाच्या दिवशी इम्तियाज जलील राजकारण करू पाहत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे शहरातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो. जलील मंदिर उघडायला आले, तर आम्ही येथे उभे आहोत, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी दिला.

ऐनवेळी मनसेने देखील या वादात उडी घेतली. शेवटच्या क्षणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे आपल्या कार्यकर्त्यांसह खडकेश्वर मंदिर परिसरात दाखल झाले. शिवसेना आणि एमआयएम हे दोघे मिळून शहरात वातावरण खराब करत आहेत. दोघं एकमेकांना मिळालेले आहेत. धार्मिक स्थळांच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या या दोन्ही पक्षांचा आम्ही निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.