ETV Bharat / state

भाजपला काहीही विचारा, उत्तर एकच 370; शरद पवारांचा भाजपला टोला

author img

By

Published : Oct 14, 2019, 4:46 PM IST

Updated : Oct 14, 2019, 9:18 PM IST

कापसाचा भाव काय म्हणलं की सांगतात 370, मक्याचा भाव विचारला की म्हणतात 370; आता हे झोपेत देखील म्हणत असतील 370, त्यामुळे बायकोलाही आश्चर्य वाटत असेल, अशी खिल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  उडवली आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

औरंगाबाद - कापसाचा भाव काय म्हणलं की सांगतात 370, मक्याचा भाव विचारला की म्हणतात 370; आता हे झोपेत देखील म्हणत असतील 370, त्यामुळे बायकोलाही आश्चर्य वाटत असेल, अशी खिल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडवली आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बंदोबस्त करण्यासाठी महत्त्वाच्या सर्वपक्षीय नेत्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. यानंतर दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी ठराव करून लष्कराला अधिकार देण्यात आले. सैन्याने अभिमानास्पद कारवाई केली. मात्र, त्यानंतर सर्व ठिकाणी हल्ला केल्याचे सांगत फिरत आहेत, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली. तसेच परवानगी आम्ही दिली, आणि हे सर्व ठिकाणी छप्पन इंचाची छाती असल्याचे सांगत आहेत, असे पवार म्हणाले. याआधी इंदिरा गांधींनी भूगोल बदलला होता. मात्र, असे कधीही केले नसल्याचे पवारांना सांगितले.

हेही वाचा आम्ही पैलवानांसोबत कुस्त्या खेळतो; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

विधानसभा निवडणुकीतील प्रत्येक प्रचारसभेत भाजपचे नेते 370 वर बोलत आसल्याने पवार यांनी त्यांच्या खास शैलीत टीका केली.

पुढे बोलताना, स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या संरक्षणासाठी कलम 370 लावण्यात आले. त्यामुळे कोणालाही तिथे शेती करता येणार नव्हती. कुठलीही जागा घेता येणार नव्हती परंतु, आता कलम काढल्याने गणित बदलेले असल्याचे पवार म्हणाले. आजही नागालँड व सिक्कीममध्ये देखील तुम्हाला शेती करता येत नाही, त्याचे काय? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री विरोधीपक्षात असताना कापसाला सात हजारांचा भाव देण्याची मागणी करत होते. आज पाच वर्षात दिला का सात हजारांचा भाव? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला. तसेच आज काहीही विचारले तरी 370हेच उत्तर येत असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा करून गेलं गाव अन् भलत्याचं नाव, अशी सध्याची भाजपची अवस्था - पवार

अमित शहा यांनी शरद पवार यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना, त्यांनी स्वत: मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा पाढा वाचला. यामध्ये रोजगार हमी कायदा, महिला आरक्षण, मंडल आयोग यांसारख्या कायद्यांची अंमलबजावणी करताना आपण मुख्यमंत्री असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच सत्ताधारी सुडाचे राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान पदाचा आम्ही कधीच अवमान केला नसून, सत्ताधारी मात्र सतत पंडीत नेहरू व गांधी घराण्यावर टीका करून त्याच्या पदाचा अवमान करत आहेत. 150 वर्षांच्या ब्रिटीश राज्याला बाहेर काढण्याचे काम नेहरू-गांधींच्या काँग्रेसने केल्याची आठवण पवार यांनी भाजपला करून दिली.

कन्नडच्या जाहीर सभेत शरद पवार यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली. त्यांचे आई - वडील आमच्या सोबत काम करत होते. मात्र आज परिस्थिती वेगळी असल्याचे पवार म्हणाले.

औरंगाबाद - कापसाचा भाव काय म्हणलं की सांगतात 370, मक्याचा भाव विचारला की म्हणतात 370; आता हे झोपेत देखील म्हणत असतील 370, त्यामुळे बायकोलाही आश्चर्य वाटत असेल, अशी खिल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडवली आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बंदोबस्त करण्यासाठी महत्त्वाच्या सर्वपक्षीय नेत्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. यानंतर दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी ठराव करून लष्कराला अधिकार देण्यात आले. सैन्याने अभिमानास्पद कारवाई केली. मात्र, त्यानंतर सर्व ठिकाणी हल्ला केल्याचे सांगत फिरत आहेत, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली. तसेच परवानगी आम्ही दिली, आणि हे सर्व ठिकाणी छप्पन इंचाची छाती असल्याचे सांगत आहेत, असे पवार म्हणाले. याआधी इंदिरा गांधींनी भूगोल बदलला होता. मात्र, असे कधीही केले नसल्याचे पवारांना सांगितले.

हेही वाचा आम्ही पैलवानांसोबत कुस्त्या खेळतो; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

विधानसभा निवडणुकीतील प्रत्येक प्रचारसभेत भाजपचे नेते 370 वर बोलत आसल्याने पवार यांनी त्यांच्या खास शैलीत टीका केली.

पुढे बोलताना, स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या संरक्षणासाठी कलम 370 लावण्यात आले. त्यामुळे कोणालाही तिथे शेती करता येणार नव्हती. कुठलीही जागा घेता येणार नव्हती परंतु, आता कलम काढल्याने गणित बदलेले असल्याचे पवार म्हणाले. आजही नागालँड व सिक्कीममध्ये देखील तुम्हाला शेती करता येत नाही, त्याचे काय? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री विरोधीपक्षात असताना कापसाला सात हजारांचा भाव देण्याची मागणी करत होते. आज पाच वर्षात दिला का सात हजारांचा भाव? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला. तसेच आज काहीही विचारले तरी 370हेच उत्तर येत असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा करून गेलं गाव अन् भलत्याचं नाव, अशी सध्याची भाजपची अवस्था - पवार

अमित शहा यांनी शरद पवार यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना, त्यांनी स्वत: मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा पाढा वाचला. यामध्ये रोजगार हमी कायदा, महिला आरक्षण, मंडल आयोग यांसारख्या कायद्यांची अंमलबजावणी करताना आपण मुख्यमंत्री असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच सत्ताधारी सुडाचे राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान पदाचा आम्ही कधीच अवमान केला नसून, सत्ताधारी मात्र सतत पंडीत नेहरू व गांधी घराण्यावर टीका करून त्याच्या पदाचा अवमान करत आहेत. 150 वर्षांच्या ब्रिटीश राज्याला बाहेर काढण्याचे काम नेहरू-गांधींच्या काँग्रेसने केल्याची आठवण पवार यांनी भाजपला करून दिली.

कन्नडच्या जाहीर सभेत शरद पवार यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली. त्यांचे आई - वडील आमच्या सोबत काम करत होते. मात्र आज परिस्थिती वेगळी असल्याचे पवार म्हणाले.

Intro:कपाशीच्या भाव काय झालं म्हणलं की सांगतात 370, मकाचा भाव विचारला की म्हणतात 370, झोपेत देखील म्हणत असतील 370 त्यामुळे बायकोला आश्चर्य वाटत असेल. अशी खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडवली. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक प्रचार सभेत भाजपचे नेते 370 वर बोलताना दिसत असल्याने शरद पवार यांनी आपल्या शैलीत टीका केली. कन्नड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी ते कन्नड येथे जाहीर सभेत बोलत होते.Body:पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी महत्वाच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्यात आल. त्यामध्ये भारताचा नकाशा समोर ठेवून दाहशवादी कुठे आहेत हे दाखवण्यात आले. त्यांच्यावर हल्ला करण्याची वेळ असल्याचा ठराव करून लष्कराला अधिकार देण्यात आले. आणि पुलावमा हल्ल्यांनातर धडा शिकवला. कधी ना कधी धडा शिकवायचा होता. सैन्याने अभिमानास्पद कारवाई केली. मात्र त्या नंतर सर्व ठिकाणी हल्ला केल्याचं सांगत फिरत आहेत. परवानगी आम्ही दिली, आणि हे सर्व ठिकाणी छप्पन इंचाचा सीना असल्याचं सांगत आहेत.Conclusion:लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला भरभरून मतदान केलं, आता विधानसभा निवडणूक आहे.
या आधी इंदिरा गांधींनी भूगोल बदलला मात्र कधी अस केलं नाही. पंडित जवाहरलाल नेहरू आणि वल्लभ भाई पटेल यांनी आवाहन करून अनेक संस्थान देशात समाविष्ट केल्या मात्र हैद्राबाद आणि जम्मू काश्मीर हे भाग समाविष्ट झाले नाही. त्यावेळी जम्मू काश्मीरच्या लोकांच्या संरक्षणासाठी कलम 370 लावण्यात आले. त्यामुळे कोणालाही तिथे शेती करता येणार नव्हती, कुठलेही जागा घेता येणार नव्हती, आता कलम काढला, मात्र आज पण नागलेंड, सिक्कीम मध्ये देखील तुम्हाला शेती करता येत नाही त्याच काय? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री आधी विरोधी पक्षात काम करत होते त्यावेळी कपाशीला सात हजारांचा भाव द्या म्हणून मागणी करत होते आज पाच वर्षात दिला का सात हजारांचा भाव? आज काहीही विचारलं तर 370 उत्तर येत. पंतप्रधान यांनी माझं उत्तर विचारलं मी म्हणतो अभिनंदन 370 काढला 371 पण काढा. 370 काढण्यास आमचा विरोध नाही फक्त तिथल्या लोकांना विश्वासात घ्या. फक्त काश्मीर मधल्या तीन खासदारांनाचा विरोध होता. मात्र कुठं गेले की आम्ही विरोध केला म्हणतात. कुठेही सभा असू द्या एक नाव घेतात ते म्हणजे शरद पवार. अमित शहा यांनी शरद पवार यांनी काय केलं असा प्रश्न उपस्थित केला होता. अमित शहा ऐका मी काय केलं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा पाढा शरद पवार यांनी वाचला. पाहिल्यांचा रोजगार हमीचा कायदा 1978 ला मंजूर केला, तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. महिलांना आरक्षण दिल मी मुख्यमंत्री होतो, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या त्यावेळी मी मुख्यमंत्री होती. हे आम्ही केलं तुम्ही काय केलं असा प्रश्न शरद पवार यांनी जाहीर सभेत उपस्थित केला. सत्ताधारी सुडाच राजकारण करत आहेत. माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी चितमबरम यांना काहीतरी खुसपट काढून तुरुंगात टाकले आहे. गेल्या महिना भरापासून ते तुरुंगात आहेत.सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली. तुम्ही सत्तेवर आल्यावर त्याचा लाभ सर्व सामान्यांना द्यायला हवा होता मात्र आज वेगळंच होत आहे, काँग्रेसच्या आणि आमच्या लोकांवर खटला भरला जातोय. काँग्रेस सत्तेत होता त्यावेळी भाजपच्या कार्यालयावर कधी पोलीस पाठवले का? पंतप्रधान पद इज्जतीच पद, आम्ही कधी अवमान केला नाही, मात्र इथे त्या पदाचा अवमान केला जातोय, ब्रिटिशांच राज्य 150 वर्षे होती, त्यांना बाहेर काढण्याचा काम नेहरू गांधींच्या कॉंग्रेने केल. अशी आठवण शरद पवार यांनी भाजपला करून दिली.

कन्नडच्या जाहीर सभेत शरद पवार यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका, आज कोणत्या पक्षात आहेत. त्यांचे आई - वडील आमच्या सोबत काम करत होते, मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे संतोष कोल्हेला निवडणून द्या अस आवाहन त्यांनी कन्नडच्या मतदारांना केलं.
Byte - शरद पवार - अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
Last Updated : Oct 14, 2019, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.