ETV Bharat / state

सदाभाऊ म्हणजे गळकं मडकं; राजू शेट्टींचा घणाघात - marathwada

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा, शेतकऱ्यांशी संवाद साधून आल्यानंतर औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाविषयी बोलताना एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर हे आरोप केले.

राजू शेट्टींचा घणाघात
author img

By

Published : Jun 12, 2019, 8:16 PM IST

Updated : Jun 12, 2019, 9:25 PM IST

औरंगाबाद - सदाभाऊ खोत हे गळक मडकं आहे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाव न घेता लगावला. कुंभार जेव्हा माठ, मडकं तयार करण्यासाठी माती घेतो, त्याला आकार देतो आणि भट्टीत टाकतो, तेव्हा त्यातील काही मडकी, माठ कच्ची निघतात, गळकी निघतात. अगदी तसेच सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत झाले आहे. मात्र, आम्ही आता मडकी तपासून बघू, असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी औरंगाबादमध्ये केले.

सदाभाऊ म्हणजे गळक मडकं

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा, शेतकऱ्यांशी संवाद साधून आल्यानंतर औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाविषयी बोलताना एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर हे आरोप केले.

राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली तेव्हा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता निवडून, पारखून घेतला होता. पण जसे मडके घडवताना कुंभार एकच माती, साचा वापरतो तरी एखादे मडके कच्चे राहते किंवा गळते, तसाच काहीसा प्रकार सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत घडला. त्यांचे मडके कच्चेच राहिले. पण भविष्यात असा प्रकार पुन्हा कुणाच्या बाबतीत घडू नये, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या तरुण, युवा नेतृत्वाला यापुढे संघटनेत प्रोत्साहन देण्याचा आपला विचार आहे.

औरंगाबाद - सदाभाऊ खोत हे गळक मडकं आहे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाव न घेता लगावला. कुंभार जेव्हा माठ, मडकं तयार करण्यासाठी माती घेतो, त्याला आकार देतो आणि भट्टीत टाकतो, तेव्हा त्यातील काही मडकी, माठ कच्ची निघतात, गळकी निघतात. अगदी तसेच सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत झाले आहे. मात्र, आम्ही आता मडकी तपासून बघू, असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी औरंगाबादमध्ये केले.

सदाभाऊ म्हणजे गळक मडकं

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा, शेतकऱ्यांशी संवाद साधून आल्यानंतर औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाविषयी बोलताना एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर हे आरोप केले.

राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली तेव्हा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता निवडून, पारखून घेतला होता. पण जसे मडके घडवताना कुंभार एकच माती, साचा वापरतो तरी एखादे मडके कच्चे राहते किंवा गळते, तसाच काहीसा प्रकार सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत घडला. त्यांचे मडके कच्चेच राहिले. पण भविष्यात असा प्रकार पुन्हा कुणाच्या बाबतीत घडू नये, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या तरुण, युवा नेतृत्वाला यापुढे संघटनेत प्रोत्साहन देण्याचा आपला विचार आहे.

Intro:सदाभाऊ खोत हे गळक मडकं असल्याचा टोला नाव न घेताना राजू शेट्टी यांनी लगावला. कुंभार जेव्हा माठ, मडकं तयार करण्यासाठी माती घेतो, त्याला आकार देतो आणि भट्टीत टाकतो, तेव्हा त्यातील काही मडकी, माठ कच्ची निघतात, गळकी निघतात. सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत असेच काहीसे झाले. मात्र आम्ही आता मडकी तपासून बघू अस वक्तव्य राजू शेट्टी यांनी औरंगाबादेत केलं. Body:स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा, शेतकऱ्यांशी संवाद साधून आल्यानंतर औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विषयी आपले मत मांडले. Conclusion:राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली तेव्हा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता निवडूण, पारखून घेतला होता. पण जस मडकं घडवतांना कुंभार एकच माती, साचा वापरतो आणि तरी एखाद मडकं कच्चं राहत, आणि गळत. तसाच काहीसा प्रकार सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत घडला. त्यांच मडकं कच्चंच राहिलं. पण भविष्यात असा प्रकार पुन्हा कुणाच्या बाबतीत घडू नये याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या तरूण, युवा नेतृत्वाला यापुढे संघटनेत प्रोत्साहन देण्याचा आपला विचार आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांनी मत मलाच दिली होती मात्र ती माझ्यापर्यंत आली नाही अस म्हणत आपला पराभव ईव्हीएममुळे झाला असून दिलेलं मत दुसऱ्या ठिकाणी जातयं असे सांगत ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. भाजपची साथ सोडल्याचा आपल्याला अजिबात पश्‍चाताप नाही, आजघडीला सगळ्यात जास्त बुडवेखोर साखर कारखानदार भाजपमध्ये असल्याचा आरोप देेखिल त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सगळ्या छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात असे आवाहन देखील राजू शेट्टी यांनी केले. त्यासाठी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली असून लवकरच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना देखील भेटणार असल्याचे राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Last Updated : Jun 12, 2019, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.