ETV Bharat / state

Manoj Jarange Patil : 'भुजबळांच्या पाहुण्यांचं हॉटेल त्यांच्याच लोकांनी फोडलं', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 3:14 PM IST

Manoj Jarange Patil : मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे बीड जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी सुभाष राऊत यांचं सनराईज हॉटेल मराठा आंदोलकांनी पेटवून दिलं असं बोललं जातंय. मात्र हे काम मराठा आंदोलकांनी नाही तर त्यांच्याच लोकांनी केल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय.

Manoj Jarange Patil
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil : मराठा मुलांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं जातंय. याकडे मराठा नेत्यांनी लक्ष द्यावं. तसंच बीडमध्ये जे भुजबळ साहेबांच्या पाहुण्यांचं हॉटेल फोडलं ते त्यांच्याच लोकांनी फोडले अशी मला माहिती आहे, जर माहिती चुकली तर शब्द मागे घेईन. मात्र एकमेकांच्या द्वेशापोटी हे सगळं केलं गेलंय असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज (7 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, रात्री सीएम ऑफिस मधून फोन आला होता. उद्या मंत्र्यांचं शिष्टमंडळ येणार असून सगळे म्हणताय ते आम्हाला भुलवताय मात्र ते इतकं सोप नाही. उद्याच्या दिवस त्यांची वाट पाहू अन्यथा त्यांना फोनही करणार नाही, पुढची भूमिका आम्ही घेऊ असं देखील मनोज जरांगे यांनी सांगितलं.

ओबीसी नेत्यांबद्दल बोलणार नाही : ओबीसी नेत्यांबाबत मला बोलायचं नाही, मराठा समाजानं शांततेत एकत्र यावं. पुन्हा एकदा मराठा समाजाच्या नेत्यांना सांगतो, गोर गरिबांच्या नेत्यांना फसवलं जातंय. आज तुम्ही ते केलं नाही तर उद्या ते तुमच्या सोबत राहणार नाहीत. ओबीसी नेते बीडला जाऊन आपल्या समाजाचं खच्चीकरण करताय. पुरवणी याद्या तयार करून आमच्या लोकांना फसवलं जातंय. ते लोकं काल एसपीला सुद्धा भेटले. सरकारनं याकडं लक्ष द्यावं, उद्रेक करणाऱ्यांवर कारवाई करा, मात्र उगाच सामान्य लोकांना फसवू नका. त्रास देण्यासाठी ओबीसीचे काही नेते कट रचतायत. मात्र लक्षात ठेवा खोटे गुन्हे दाखल करून समाज खचणार नाही. काही ओबीसी नेते असे डाव करताय, मराठा नेत्यांनी मराठा समाजाच्या मागे उभं राहावं आणि नाही उभे राहिले तर आम्ही सक्षम आहोत. तसंच यांच्या बीडवाऱ्या सुरू असून जाणून बुजून मराठा लोकांना टार्गेट केल्या जातंय असंही ते म्हणाले.

गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं : पुढं ते म्हणाले की, मराठा-ओबीसी संघर्ष होऊ नये म्हणून मी सांगतोय, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी याकडं लक्ष द्यावं. विनायक राऊत यांनी काही आरोप केले मात्र त्या राजकारणात आम्हाला पडायचं नाही. 24 डिसेंबर पर्यंत आम्ही आरक्षण मिळवणार आहोत. तसंच रुग्णालयात रोज मोठ्या प्रमाणात समाज बांधव भेटायला येत आहेत. प्रकृती चांगली नसल्यानं दोन दिवस डॉक्टरांनी अराम करायला सांगितलंय. त्यामुळे नागरिकांनी भेटायला येऊ नये, असंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. Chhagan Bhujbal in Beed : 'जाळपोळ प्रकरणाची चौकशी...', नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? पाहा व्हिडिओ
  2. Maratha Reservation : आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही? मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं कारण
  3. Chhagan Bhujbal On Manoj Jarange : समाजासाठी जीव जाणार असेल तर... ; मनोज जरांगे पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil : मराठा मुलांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं जातंय. याकडे मराठा नेत्यांनी लक्ष द्यावं. तसंच बीडमध्ये जे भुजबळ साहेबांच्या पाहुण्यांचं हॉटेल फोडलं ते त्यांच्याच लोकांनी फोडले अशी मला माहिती आहे, जर माहिती चुकली तर शब्द मागे घेईन. मात्र एकमेकांच्या द्वेशापोटी हे सगळं केलं गेलंय असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज (7 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, रात्री सीएम ऑफिस मधून फोन आला होता. उद्या मंत्र्यांचं शिष्टमंडळ येणार असून सगळे म्हणताय ते आम्हाला भुलवताय मात्र ते इतकं सोप नाही. उद्याच्या दिवस त्यांची वाट पाहू अन्यथा त्यांना फोनही करणार नाही, पुढची भूमिका आम्ही घेऊ असं देखील मनोज जरांगे यांनी सांगितलं.

ओबीसी नेत्यांबद्दल बोलणार नाही : ओबीसी नेत्यांबाबत मला बोलायचं नाही, मराठा समाजानं शांततेत एकत्र यावं. पुन्हा एकदा मराठा समाजाच्या नेत्यांना सांगतो, गोर गरिबांच्या नेत्यांना फसवलं जातंय. आज तुम्ही ते केलं नाही तर उद्या ते तुमच्या सोबत राहणार नाहीत. ओबीसी नेते बीडला जाऊन आपल्या समाजाचं खच्चीकरण करताय. पुरवणी याद्या तयार करून आमच्या लोकांना फसवलं जातंय. ते लोकं काल एसपीला सुद्धा भेटले. सरकारनं याकडं लक्ष द्यावं, उद्रेक करणाऱ्यांवर कारवाई करा, मात्र उगाच सामान्य लोकांना फसवू नका. त्रास देण्यासाठी ओबीसीचे काही नेते कट रचतायत. मात्र लक्षात ठेवा खोटे गुन्हे दाखल करून समाज खचणार नाही. काही ओबीसी नेते असे डाव करताय, मराठा नेत्यांनी मराठा समाजाच्या मागे उभं राहावं आणि नाही उभे राहिले तर आम्ही सक्षम आहोत. तसंच यांच्या बीडवाऱ्या सुरू असून जाणून बुजून मराठा लोकांना टार्गेट केल्या जातंय असंही ते म्हणाले.

गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं : पुढं ते म्हणाले की, मराठा-ओबीसी संघर्ष होऊ नये म्हणून मी सांगतोय, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी याकडं लक्ष द्यावं. विनायक राऊत यांनी काही आरोप केले मात्र त्या राजकारणात आम्हाला पडायचं नाही. 24 डिसेंबर पर्यंत आम्ही आरक्षण मिळवणार आहोत. तसंच रुग्णालयात रोज मोठ्या प्रमाणात समाज बांधव भेटायला येत आहेत. प्रकृती चांगली नसल्यानं दोन दिवस डॉक्टरांनी अराम करायला सांगितलंय. त्यामुळे नागरिकांनी भेटायला येऊ नये, असंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. Chhagan Bhujbal in Beed : 'जाळपोळ प्रकरणाची चौकशी...', नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? पाहा व्हिडिओ
  2. Maratha Reservation : आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही? मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं कारण
  3. Chhagan Bhujbal On Manoj Jarange : समाजासाठी जीव जाणार असेल तर... ; मनोज जरांगे पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.