ETV Bharat / state

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी युती-आघाडीचे अर्ज दाखल; औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुक

author img

By

Published : Aug 2, 2019, 12:03 PM IST

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी अर्ज भरला आहे. गुरुवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करीत पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला.

औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुक

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी अर्ज भरला आहे. गुरुवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करीत पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. गेल्या 20 वर्षापासून शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर असलेले अंबादास दानवे यांनीदेखील शिवसेनेकडून अर्ज भरला. तर बाबुराव कुलकर्णी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी युती-आघाडीचे अर्ज दाखल

युतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि अर्जुन खोतकर यांनी उपस्थिती लावली. तर काँग्रेसतर्फे अर्ज करताना बड्या नेत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे स्थानिक नेत्यांनाच घेऊन बाबुराव कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केला. युतीतर्फे अंबादास दानवे यांचा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. क्रांतीचौक भागातून अंबादास दानवे यांनी वाहनातून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बाबुराव कुलकर्णी यांनी शहागंज येथून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पक्षीय आकडेमोड पाहता आघाडीने निवडणुकीत रस घेतला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी युती आणि आघाडीच्या उमेदवारांना आपलाच विजय सहज आणि सोपा वाटत आहे.

दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा
जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गेलेले अंबादास दानवे आणि बाबुराव कुलकर्णी हे प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले. अंबादास दानवे यांनी बाबुराव कुलकर्णी यांच्या आशीर्वाद घेतला. शिवाय एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी अर्ज भरला आहे. गुरुवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करीत पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. गेल्या 20 वर्षापासून शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर असलेले अंबादास दानवे यांनीदेखील शिवसेनेकडून अर्ज भरला. तर बाबुराव कुलकर्णी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी युती-आघाडीचे अर्ज दाखल

युतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि अर्जुन खोतकर यांनी उपस्थिती लावली. तर काँग्रेसतर्फे अर्ज करताना बड्या नेत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे स्थानिक नेत्यांनाच घेऊन बाबुराव कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केला. युतीतर्फे अंबादास दानवे यांचा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. क्रांतीचौक भागातून अंबादास दानवे यांनी वाहनातून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बाबुराव कुलकर्णी यांनी शहागंज येथून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पक्षीय आकडेमोड पाहता आघाडीने निवडणुकीत रस घेतला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी युती आणि आघाडीच्या उमेदवारांना आपलाच विजय सहज आणि सोपा वाटत आहे.

दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा
जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गेलेले अंबादास दानवे आणि बाबुराव कुलकर्णी हे प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले. अंबादास दानवे यांनी बाबुराव कुलकर्णी यांच्या आशीर्वाद घेतला. शिवाय एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

Intro:औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी आज शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी अर्ज भरला, अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस होता , शिवसेनेनं शक्तिप्रदर्शन करीत मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला, गेली 20 वर्ष शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून असलेले अंबादास दानवे यांनी शिवसेनेकडून अर्ज भरलाय, तर बाबुराव कुलकर्णी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.Body:युतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर यांनी उपस्थिती लावली. तर काँग्रेस तर्फे अर्ज करताना बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने स्थानिक नेत्यांना घेऊन बाबुराव कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केला. युती तर्फे अंबादास दानवे यांचा एकतर्फी विजय होईल असा विश्वास औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. Conclusion:औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना भाजप युतीचे ते उमेदवार अंबादास दानवे आहेत, तर काँग्रेस कडून विद्यमान आमदार सुभाष जांबड यांचा पत्ता कट करून बाबुराव कुलकर्णी याना उमेदवारी देण्यात आली आहे, अर्ज भरताना युतीच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. क्रांतिचौक भागातून अंबादास दानवे यांनी चारचाकी वाहन रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेसचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांनी शहागंज येथून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एकीकडे युतीचा अर्ज भरण्यासाठी नेत्यांची फौज आली असताना आघाडीच्या बड्या नेत्यांनी मात्र पाठ फिरवलेली दिसली. पक्षीय आकडेमोड पाहता आघाडीने निवडणुकीत रस घेतला नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अस असलं तरी युती आणि आघाडीच्या उमेदवारांना आपला विजय सहज आणि सोपा वाटतोय.

दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा.
जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गेलेले अंबादास दानवे आणि बाबुराव कुलकर्णी हे दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर आले. अंबादास दानवे यांनी बाबुराव कुलकर्णी यांच्या आशीर्वाद घेत एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या,


Byte अंबादास दानवे, शिवसेना उमेदवार
Byte एकनाथ शिंदे, पालकमंत्री औरंगाबाद
Byte बाबुराव कुलकर्णी, काँग्रेस उमेदवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.