ETV Bharat / state

'निर्णयाचे स्वागत; मात्र, सरकारने 'ते' आश्वासन पाळावे'

2014 च्या निवडणुकीत भाजप सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिले होते. मात्र, तसे झाले नाही. 2019 च्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या नावाने प्रचार केला. मात्र, आता भ्रमाचा भोपळा फुटला आहे, असा आरोपही सूर्यवंशी यांनी केला.

author img

By

Published : Dec 22, 2019, 5:07 PM IST

farmer leader jayaji suryawanshi
जयाजी सूर्यवंशी (शेतकरी नेते)

औरंगाबाद - शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांची कर्जमाफी देण्याचा निर्णय काल (शनिवारी) राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. मात्र, सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केली आहे.

जयाजी सूर्यवंशी (शेतकरी नेते)

2014 च्या निवडणुकीत भाजप सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिले होते. मात्र, तसे झाले नाही. 2019 च्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या नावाने प्रचार केला. मात्र, आता भ्रमाचा भोपळा फुटला आहे, असा आरोपही सूर्यवंशी यांनी केला. 2 लाखांच्या कर्जमाफीने शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. राज्यकर्त्यांनी हेक्टरी 25 हजार देण्याच केलेले आश्वासन पूर्ण करावे. या कर्जमाफीच स्वागत करू. मात्र, ही कर्जमाफी शेतकऱ्यांची परिस्थितीत सुधार आणू शकणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - धक्कादायक खुलासा: शेतकरी आत्महत्येस खते, बी-बियाणे कंपनी जबाबदार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे त्यांनी केले नाही. त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासानाचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर याचे काही निकष असतील ते देखील तत्काळ स्पष्ट करावेत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

औरंगाबाद - शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांची कर्जमाफी देण्याचा निर्णय काल (शनिवारी) राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. मात्र, सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केली आहे.

जयाजी सूर्यवंशी (शेतकरी नेते)

2014 च्या निवडणुकीत भाजप सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिले होते. मात्र, तसे झाले नाही. 2019 च्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या नावाने प्रचार केला. मात्र, आता भ्रमाचा भोपळा फुटला आहे, असा आरोपही सूर्यवंशी यांनी केला. 2 लाखांच्या कर्जमाफीने शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. राज्यकर्त्यांनी हेक्टरी 25 हजार देण्याच केलेले आश्वासन पूर्ण करावे. या कर्जमाफीच स्वागत करू. मात्र, ही कर्जमाफी शेतकऱ्यांची परिस्थितीत सुधार आणू शकणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - धक्कादायक खुलासा: शेतकरी आत्महत्येस खते, बी-बियाणे कंपनी जबाबदार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे त्यांनी केले नाही. त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासानाचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर याचे काही निकष असतील ते देखील तत्काळ स्पष्ट करावेत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असून सत्ताधार्यांनी निवडणूक प्रचारात दिलेलं आश्वासन पाळावे अशी मागणी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केली आहे. Body:राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात तस त्यांनी केले नाही त्यामुळे सरकारने दिलेल्या अश्वासानांच काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर याचे काही निकष असतील ते देखील तात्काळ स्पष्ट करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
Conclusion:2014 च्या निवडणुकीत भाजप सरकारने कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं. मात्र तस झालं नाही 2019 च्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या नावाने प्रचार केला मात्र आता भ्रमाचा भोपळा फुटल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केलाय. दोन लाखांच्या कर्जमाफीने शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत, राज्यकर्त्यांनी हेक्टरी 25 हजार देण्याच केलेलं आश्वासन पूर्ण करावं. या कर्जमाफीच स्वागत करू मात्र ही कर्जमाफी शेतकऱ्यांची परिस्थितीत सुधार आणू शकणार नाही असं मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं.
Byte - जयाजी सूर्यवंशी - शेतकरी नेते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.