ETV Bharat / state

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांनी गाव केले 'पाणीदार'

अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील शेंदुरजना बाजार या गावातील तरुणांनी व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून गाव पाणीदार केले आहे.

author img

By

Published : Aug 20, 2019, 1:09 PM IST

Updated : Aug 20, 2019, 6:14 PM IST

काही महिन्यापूर्वी श्रमदान करताना

अमरावती - मागील दोन वर्षे कमी पडलेल्या पावसामुळे जमीन कोरडी झाली होती. यावर्षी तर संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण भटकत होता. राज्यभरातून येणाऱ्या दुष्काळाच्या बातम्या पाहून धास्तावलेल्या अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात कधी दुष्काळाला शिरकावच करू नये, तसेच भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पाणीदार गाव करण्याचा लढा उभारले.

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांनी गाव केले 'पाणीदार'

गावातील काही सामाजिक कार्यकर्ते योगेश लोखंडे यांच्या पुढाकाराने काही तरुण एकत्र आले. नंतर व्हाट्सअॅपच्या ग्रुप तयार करण्यात आला. त्या ग्रुपचे नावही "गाव पाणीदार करणारच", असे ठेवले आहे. दिवसरात्र भर उन्हात मेहनत करून गावकऱ्यांनी श्रमदान करत गावाच्या भोवताली असलेल्या जागेत खड्डे खोदून पाणी जिरवण्यासाठी व पाणी अडवण्यासाठी बांध तयार केले. यात आता पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात केलेल्या श्रमदानाची फलश्रुती पडलेल्या पावसाळ्यात अनुभवता आली. सध्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची, गावातील विहिरींसह बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

संत अच्युत महाराज यांची कर्मभूमी असलेल्या ४ हजार लोकवस्तीच्या शेंदूरजना बाजार येथील नागरिकांनी एप्रिल व मे या २ महिन्यात भर उन्हात श्रमदान केले. गावाच्या भोवताली असलेल्या पडीक जागेवर श्रमदान करून पावसाचे पाणी जमिनीत जीरवण्यासाठी खड्डे खोदले. दऱ्या-खोऱ्यातील पाणी एकत्र येऊन या खड्ड्यात साठले. आता पावसाळ्यात या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे गावाशेजारील शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. सोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमचा मिटला आहे.

गाव पाणीदार करण्यासाठी अनेक गावे शासनाच्या अनुदानावर अवलंबून असतात. परंतु, या गावातील तरुणांनी स्वतः वर्गणी व गावाबाहेर नोकरीवर असणाऱ्या ग्रामस्थांनी आर्थिक हातभार लावला. आता या तरुणांना खऱ्या अर्थाने गरज आहे ती शासनाच्या अनुदानाची, मार्गदर्शनाची, तरुणांच्या पुढाकाराने तर गाव पाणीदार झालेच पण, जिल्ह्यासह राज्याला एक आदर्श उभे करून दाखवले.

अमरावती - मागील दोन वर्षे कमी पडलेल्या पावसामुळे जमीन कोरडी झाली होती. यावर्षी तर संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण भटकत होता. राज्यभरातून येणाऱ्या दुष्काळाच्या बातम्या पाहून धास्तावलेल्या अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात कधी दुष्काळाला शिरकावच करू नये, तसेच भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पाणीदार गाव करण्याचा लढा उभारले.

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांनी गाव केले 'पाणीदार'

गावातील काही सामाजिक कार्यकर्ते योगेश लोखंडे यांच्या पुढाकाराने काही तरुण एकत्र आले. नंतर व्हाट्सअॅपच्या ग्रुप तयार करण्यात आला. त्या ग्रुपचे नावही "गाव पाणीदार करणारच", असे ठेवले आहे. दिवसरात्र भर उन्हात मेहनत करून गावकऱ्यांनी श्रमदान करत गावाच्या भोवताली असलेल्या जागेत खड्डे खोदून पाणी जिरवण्यासाठी व पाणी अडवण्यासाठी बांध तयार केले. यात आता पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात केलेल्या श्रमदानाची फलश्रुती पडलेल्या पावसाळ्यात अनुभवता आली. सध्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची, गावातील विहिरींसह बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

संत अच्युत महाराज यांची कर्मभूमी असलेल्या ४ हजार लोकवस्तीच्या शेंदूरजना बाजार येथील नागरिकांनी एप्रिल व मे या २ महिन्यात भर उन्हात श्रमदान केले. गावाच्या भोवताली असलेल्या पडीक जागेवर श्रमदान करून पावसाचे पाणी जमिनीत जीरवण्यासाठी खड्डे खोदले. दऱ्या-खोऱ्यातील पाणी एकत्र येऊन या खड्ड्यात साठले. आता पावसाळ्यात या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे गावाशेजारील शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. सोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमचा मिटला आहे.

गाव पाणीदार करण्यासाठी अनेक गावे शासनाच्या अनुदानावर अवलंबून असतात. परंतु, या गावातील तरुणांनी स्वतः वर्गणी व गावाबाहेर नोकरीवर असणाऱ्या ग्रामस्थांनी आर्थिक हातभार लावला. आता या तरुणांना खऱ्या अर्थाने गरज आहे ती शासनाच्या अनुदानाची, मार्गदर्शनाची, तरुणांच्या पुढाकाराने तर गाव पाणीदार झालेच पण, जिल्ह्यासह राज्याला एक आदर्श उभे करून दाखवले.

Intro:स्पेशल रिपोर्ट

व्हाट्सएपच्या ग्रुपवरील संवादाने अमरावतीच्या शेंदूरजना बाजार गावाला केले पाणीदार.

तरुणांच्या पुढाकाराने पहिल्याच पावसात झाली श्रमदानाची फलश्रुती.
------------------------------------------------------
स्पेशल रिपोर्ट.

अँकर अमरावती
तुमच्या आमच्या हातात असलेल्या मोबाइल मध्ये शेकडो व्हाट्सएप ग्रुप असतात त्यात तुम्हीही असतात .परंतु याच व्हाट्सएपच्या ग्रुप मुळे अनेक वाद होतांना आपण पाहतो.पण त्याच व्हाट्सएप ग्रूप चा उपयोग गावासाठी केला तर गाव पाणीदार सुद्धा होऊ शकत कसं पाहूया etv भारताच्या या विशेष रिपोर्ट मधुन

Vo-1
मागील दोन वर्षे कमी पडलेला पाउस त्यामुळे धरणी माता कोरडी ठाक पडलेले होती.यावर्षी तर अख्या महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण भटकत होता.दाही दिशा भयानक दुष्काळाने कवेत घेतल्या होत्या.महाराष्ट्रातुन येणाऱ्या दुष्काळाच्या बातम्या पाहून धास्तावलेल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात कधी दुष्काळाला शिरकावच करू द्यायचा नाही व भविष्यात पाणीटंचाई चा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी एक लढा उभारला तो म्हणजे गाव पाणी दार करन्याचा.

बाईट-1-योगेश लोखंडे -सामाजिक कार्यकर्ते

Vo-2

गावातील काही सामाजिक कार्यकर्ते योगेश लोखंडे यांच्या पुढाकाराने काही तरुण एकत्र आले. नंतर whatsapp ग्रुप तयात करण्यात आला त्या ग्रुपच नावही "गाव पाणीदार करनारच" हे ठेवलं आनि रात्र दिवस भर उन्हाळभर मेहनत करून गावकऱ्यांनी श्रमदान करत गावाच्या सौभोवताल असलेल्या जागेत खड्डे खोदून पाणी जिरवन्यासाठी व पाणी अडवण्यासाठी बांध तयार केले यात आता पावसाळ्याचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे त्यामुळे उन्हाळ्यात केलेल्या श्रमदानाची फलश्रुती पडलेल्या पावसाळ्यात अनुभवता आली.आज गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरीची,गावातील विहरींची, बोरवेल ची पाण्याची पातळी ही वाढली.

बाईट-2-सरपंच-सागर बोडखे.

Vo-3-
संत अच्युत महाराज यांची कर्मभूमी असलेल्या ४०००लोकवस्तीच्या शेंदूरजना बाजार येथील एप्रिल मे या दोन महिन्यात भर उन्हात श्रमदानासाठी नागरीक एकवटले व गावाच्या सौभोवताल असलेल्या पडीक जागेवर श्रमदान करून पावसाचे वरील पाणी जमिनीत मूरवण्यासाठी खड्डे खोदले दऱ्या खोऱ्यातील पाणी एकत्र येवून या खड्डयात करण्याच्या उद्देशाने पावसाचे पाणी जिरवण्यात आले आता पावसाळ्यात या खड्डड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.त्यामुळे गावशेजारील शेतकऱ्यांच्या विहरीच्या पातळीतही वाढ झाली सोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमचा मिटला आहे.

बाईट-3-नरेंद्र आसोडे-ग्रामस्थ

Vo-4
गाव पाणीदार करण्यासाठी अनेक गावे शासनाच्या अनुदानावर अवलंबून असतात .परन्तु या गावातील तरुणांनी स्वतःहा वर्गणी व गावाबाहेर नोकरीवर असणाऱ्या ग्रामस्थांनी आर्थिक हातभार लावला आता या तरुनांना खऱ्या अर्थाने गरज आहे ती शासनाच्या अनुदानाची ,शासनाच्या मार्गदर्शनाची,तरूणांच्या पुढाकाराने तर गाव पाणीदार झालेच आणि आत्ता दुष्काळी गावाना जर पाणीदार करायचे असेल तर शेंदूरजना बाजार हे गाव आता त्यासाठी उत्तम उदाहरण ठरू शकेल.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Aug 20, 2019, 6:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.