ETV Bharat / state

संततधार पावसामुळे वडाळी तलावाची पातळी वाढली - water level

काही महिन्यांपासून कोरडा पडलेला अमरावती शहरातील वडाळी तलाव संततधार पावसामुळे भरु लागला आहे.

वडाळी तलाव
author img

By

Published : Jul 31, 2019, 10:01 AM IST

अमरावती- संततधार पावसामुळे अमरावती शहरातील वडाळी तलावाच्या पाणी पातळीत काहीशी वाढ झाली आहे. अमरावतीकरांसाठी पर्यटनाचे प्रमुख स्थळ असणारा वडाळी तलाव उन्हाळ्यात कोरडा पडला होता.

वडाळी तलाव

मार्च अखेरपासून वडाळी तलाव कोरडा पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे वडाळी परिसरातील विहिरीही आटल्या होत्या. तलावात प्रचंड प्रमाणात गाळ आणि कचरा साचला असल्याने महापालिका प्रशासनाने 2 दिवस श्रमदान आयोजित करून तलावातील गाळ काढण्याचा नावापुरता उपक्रम राबविला. मात्र, चार- आठ दिवस तलाव उपसण्याचे काम झाल्यानंतर हे काम बंद करण्यात आले. त्यामुळे तलावाची दुरावस्था कायम राहिली.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तलावात अर्ध दफन आंदोलन करून तलाव स्वच्छ करण्याची मागणी केली होती. या आंदोलनाची दाखल घेऊन आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तलावतील गाळ काढण्यासाठी 2 कोटी रुपय देण्याची घोषणा केली हाती. मात्र ही घोषणा केवळ कागदावरच उमटली असून प्रत्यक्षात तलावाच्या दुरावस्थेकडे कोणीही लक्ष दिले नाही.

अमरावती- संततधार पावसामुळे अमरावती शहरातील वडाळी तलावाच्या पाणी पातळीत काहीशी वाढ झाली आहे. अमरावतीकरांसाठी पर्यटनाचे प्रमुख स्थळ असणारा वडाळी तलाव उन्हाळ्यात कोरडा पडला होता.

वडाळी तलाव

मार्च अखेरपासून वडाळी तलाव कोरडा पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे वडाळी परिसरातील विहिरीही आटल्या होत्या. तलावात प्रचंड प्रमाणात गाळ आणि कचरा साचला असल्याने महापालिका प्रशासनाने 2 दिवस श्रमदान आयोजित करून तलावातील गाळ काढण्याचा नावापुरता उपक्रम राबविला. मात्र, चार- आठ दिवस तलाव उपसण्याचे काम झाल्यानंतर हे काम बंद करण्यात आले. त्यामुळे तलावाची दुरावस्था कायम राहिली.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तलावात अर्ध दफन आंदोलन करून तलाव स्वच्छ करण्याची मागणी केली होती. या आंदोलनाची दाखल घेऊन आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तलावतील गाळ काढण्यासाठी 2 कोटी रुपय देण्याची घोषणा केली हाती. मात्र ही घोषणा केवळ कागदावरच उमटली असून प्रत्यक्षात तलावाच्या दुरावस्थेकडे कोणीही लक्ष दिले नाही.

Intro: सततधार पावसामुळे अमरावती शहरातील वडाळी तलावाची पातळी आता काहीशी वाढली आहे. अमरावतीकरांसाठी पर्यटनाचे प्रमुख स्थळ असणारा वडाळी तलाव उन्हाळयात कोरडा पडला होता.


Body: यावर्षी मार्च अखेरपासून वडाळी तलाव सुकायला लागला. मे महिन्यात टाळवस्थळी केवळ पाण्याचे डबके होते. तलाव सुकल्यामुळे वडाळी परिसरातील विहिरीची आटल्या होत्या. तलावात प्रचंड प्रमाणात गाळ आणि कचरा साचला नसल्याने महापालिका प्रशासनाने 2 दिवस श्रमदान आयोजित करून तलावातील गाळ काढण्याचा नावापुरता उपक्रम राबविला होता. चार- आठ दिवस तलाव उपसण्याचे काम झाले मात्र ते काम बंद झाल्याने तलावाची दुरावस्थाही कायम राहिली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तलावात अर्ध दफन आंदोलन करून तलाव स्वच्छ करण्याची मागणी केली होती. या आंदोलनाची दाखल घेऊन आणि आमदार याशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तलावतील गाळ कडणतासाठी 2 कोटी रुवयांची घोषणा केली हाती. मात्र ही घोषणा केवळ कागदावरच उमटली प्रत्यक्षात तलावाच्या दुरावस्थेकडे कोणीही लक्ष दिले नाही.
आता गत 48 तासापेक्षा अधिक वेळपासून कोसळणाऱ्या पावसमुळे तलावाची पातळी आता काहीशी वाढली आहे. या तलावाच्या 7 पायऱ्या भरल्यावर हा तलाव ओव्हरफ्लो होतो. पाऊस आला की वडाळी तलाव कधी भरतो याची वाट अमरावतीकर आतुरतेने पाहतात. तलाव भरण्यासाठी अजूनही बऱ्याच पावसाची गरज असली तरी आता पाऊस असाच कायम राहिला तर वडाळी तलाव पातळी गाठेल अशी चिन्हे आहेत.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.