ETV Bharat / state

अमरावती : विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

जिल्ह्यात एकाच दिवशी दोन विविध घटनांमध्ये, दोन शेतकऱ्यांचा विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. तर या घटना महावितरणच्या चुकीमुळे घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

author img

By

Published : Aug 10, 2019, 6:47 PM IST

मृत शेतकरी

अमरावती - महावितरणच्या लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चांदुर बाजार तालुक्यातील एका शेतकऱ्याचा तर दुसऱ्या घटनेत जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेता भोवताली लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तिवसा तालुक्यात घडली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू


मागील आठ दिवसापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस थांबल्यामुळे शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी विशंभर काकडे (वय 61 वर्ष, रा. वडूरा, ता.चांदुर बाजार) गेले होते. यावेळी शेतात लोंबकळलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना महावितरणाच्या चुकीमुळे घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.


तर दुसऱ्या घटनेत जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेता भोवताली लावलेल्या विद्युत तारांचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. विजय बापुरावजी कामडी (वय 50 वर्ष, रा. सातरगाव, ता. तिवसा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


विजय कामडी हे एका शेतात पिकाच्या देखरेखीचे काम करत होते. त्याच कामासाठी शुक्रवारी रात्री शेतात जात असताना, शेतातील पिकांच्या संरक्षणसाठी लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी उशीरा पर्यंत विजय कामडी घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. एकाच दिवशी अमरावती जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमरावती - महावितरणच्या लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चांदुर बाजार तालुक्यातील एका शेतकऱ्याचा तर दुसऱ्या घटनेत जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेता भोवताली लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तिवसा तालुक्यात घडली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू


मागील आठ दिवसापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस थांबल्यामुळे शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी विशंभर काकडे (वय 61 वर्ष, रा. वडूरा, ता.चांदुर बाजार) गेले होते. यावेळी शेतात लोंबकळलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना महावितरणाच्या चुकीमुळे घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.


तर दुसऱ्या घटनेत जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेता भोवताली लावलेल्या विद्युत तारांचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. विजय बापुरावजी कामडी (वय 50 वर्ष, रा. सातरगाव, ता. तिवसा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


विजय कामडी हे एका शेतात पिकाच्या देखरेखीचे काम करत होते. त्याच कामासाठी शुक्रवारी रात्री शेतात जात असताना, शेतातील पिकांच्या संरक्षणसाठी लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी उशीरा पर्यंत विजय कामडी घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. एकाच दिवशी अमरावती जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Intro:
दुर्दैवी : विजेचा करंट लागून अमरावती जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू.

महावितरणच्या गलथान कारभारामूळे चांदुर बाजार तालुक्यातील तर पिकाचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या करंट मुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू.
-------------------------------------------------------------
अमरावती अँकर

महावितरणच्या लोम्बलेल्या जिवंत तारांमुळे एका शेतकऱ्याचा नाहक मृत्यु झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील वडुरा या गावात घडली आहे.तर दुसऱ्या घटनेत जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेता भोवताली लावलेल्या विदूत करंट चा शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सातरगाव गावानजीक एका शेतशिवरात घडली.एकाच दिवशी अमरावती जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस बंद झाल्यानंतर पाहणी करण्यासाठी गेलेले
चांदुर बाजार तालुक्यातील वडूरा गावातील विशंभर काकडे वय 61 यांना शेतात वाकलेल्या विजेच्या जिवंत तारानी त्यांना खेचून घेतल्याने त्यांना शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान ही घटना महावितरणच्या चुकीमुळे घडल्याचा ग्रामस्थाचा आरोप आहे. .

तर दुसऱ्या घटनेत जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेता भोवताली लावलेल्या विदूत करंट ला शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सातरगाव गावानजीक एका शेतशिवरात घडली.
विजय बापुरावजी कामडी वय 50 असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे .विजय कामडी हे एका शेतात सोकारीचे काम करत होते.त्याच कामासाठी काल ते रात्री शेतात जात असताना।.एका शेतात पिकांच्या संरक्षण साठी लावलेल्या विदूत तारा ला स्पर्श झाला आणि त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. आज सकाळी उशीरा पर्यंत विजय कामडी हे घरी न परतल्याने कुटुंबातील काही जण शेतात बघण्यासाठी गेले असता हा प्रकार समोर आला.एकाच दिवशी अमरावती जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुटेज -अमरावती 1 ही फाइल चांदुर बाजार घटनेची आहे
अमरावती 2 ही फाइल तिवसा तालुक्यातील घटनेची आहे

फोटो हा विजय कामडी या शेतकऱ्याचा आहे
Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.