अमरावती - जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे मेळघाटच्या पायथ्याशी असणारे सापन प्रकल्प धरण ८२ टक्के भरले आहे. लवकरच आता हे धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. सापन प्रकल्पामध्ये मागील वर्षी केवळ पन्नास टक्के पाणी साठा होता.
धरणक्षेत्रात असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबतची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे .