ETV Bharat / state

जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला; ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या

मागील आठवड्यात जिल्ह्यातील तापमान १७ ते १४.४ अंशापर्यंत घसरले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम नागरिकांना जाणवला नाही. मात्र, अचानक तापमान ३.५ अंशांनी घटल्यामुळे नागरिकांना थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे.

author img

By

Published : Dec 8, 2019, 1:03 PM IST

amravati
शेकोटी पेटवून ऊब घेताना नागरिक

अमरावती- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात अचानक थंडीचा जोर वाढला आहे. तापमान अचानक घटल्याने नागरिकांना कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. ग्रामिण भागातील लोक शेकोट्या पेटवून थंडीपासून स्वत:चे रक्षण करीत आहे. पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

शेकोटी पेटवून ऊब घेताना नागरिक

मागील आठवड्यात जिल्ह्यातील तापमान १७ ते १४.४ अंशापर्यंत घसरले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम नागरिकांना जाणवला नाही. मात्र, अचानक तापमान ३.५ अंशांनी घटल्यामुळे थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे. सकाळच्या वेळी धुके पडले असून थंडीचा जोर कायम आहे. तर थंडीमुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांकडून गप्पांचा फंड रंगवतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर, थंडीमुळे रब्बी पिकालासुद्धा चांगला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

कन्याकुमारी मालदीव पट्ट्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून येमेन किनारपट्टीवर पवन नामक वादळ सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवेच्या दिशेत सकारात्मक बदल झाले आहे. त्यामुळे शहरात पूर्वेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलली असून यामुळे वारे उत्तरेकडून वाहायला सुरुवात झाली आहे. पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हेही वाचा- ..तरीही वरूड तालुक्यात 0 टक्के नुकसान; कृषी विभागाचा धक्कादायक अहवाल

अमरावती- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात अचानक थंडीचा जोर वाढला आहे. तापमान अचानक घटल्याने नागरिकांना कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. ग्रामिण भागातील लोक शेकोट्या पेटवून थंडीपासून स्वत:चे रक्षण करीत आहे. पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

शेकोटी पेटवून ऊब घेताना नागरिक

मागील आठवड्यात जिल्ह्यातील तापमान १७ ते १४.४ अंशापर्यंत घसरले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम नागरिकांना जाणवला नाही. मात्र, अचानक तापमान ३.५ अंशांनी घटल्यामुळे थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे. सकाळच्या वेळी धुके पडले असून थंडीचा जोर कायम आहे. तर थंडीमुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांकडून गप्पांचा फंड रंगवतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर, थंडीमुळे रब्बी पिकालासुद्धा चांगला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

कन्याकुमारी मालदीव पट्ट्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून येमेन किनारपट्टीवर पवन नामक वादळ सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवेच्या दिशेत सकारात्मक बदल झाले आहे. त्यामुळे शहरात पूर्वेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलली असून यामुळे वारे उत्तरेकडून वाहायला सुरुवात झाली आहे. पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हेही वाचा- ..तरीही वरूड तालुक्यात 0 टक्के नुकसान; कृषी विभागाचा धक्कादायक अहवाल

Intro:थंडीचा जोर वाढला ,ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या
------------------------------------------------------
अमरावती अँकर.

यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला तर दरवर्षी च्या तुलनेत हिवाळा ही उशिरा सुरू झाला.परंत आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात अचानक थंडीचा जोर वाढला असून पारा 11 अंशापर्यंत खाली घसरल्याने यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली मागील एक आठवडा पारा 17 ते 14.4 अंशापर्यंत घसरल्याने सायंकाळी व रात्री थंडी जाण्याची त्यामुळे शहरवासीयांना फारशी हुडहुडी भरली नव्हती. मात्र आता अचानक तापमान 3.5 अंशांनी घट झाल्यामुळे थंडीचा कडाका जाणवायला लागला. त्यामुळे सकाळच्या वेळी धुके पडले असून थंडीचा जोर कायम आहे. तर थंडीमुळे ग्रामीण भागात सुद्धा ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून गप्पांचा फंड नागरिक रंगवताना चित्र सध्या पाहायला मिळत आहे.तर या थंडी मुळे रब्बी पिकाला सुद्धा चांगला फायदा होणार असल्याचे बोलल्या जाते.

यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला होता त्यामुळे हिवाळा सुद्धा वेळाने सुरू झाला होता परंतु आता थंड वार्‍याने जोर धरला असून नागरिकांन मध्ये हुडहुडी जाणवत आहे.कन्याकुमारी मालदीव पट्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून येमेन किनारपट्टीवर पवन नामक वादळ सक्रिय असल्याने हवेच्या दिशेत सकारात्मक बदल झाला आहे.त्यामुळेच शहरात पूर्वेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलली असून त्यामुळे वारे उत्तरे कडून वाहायला सुरवात झाली आहे.आणखी पुढील चार पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.