ETV Bharat / state

अमरावतीमध्ये संत्रा पिकाचे नुकसान, विविध रोगांचा प्रादुर्भाव - amravati returning rain orange crisis

सध्या संत्रा पिकावर परतीच्या पावसामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. येथील उमेश झिबळ नावाच्या शेतकऱ्याने याबाबत त्याची व्यथा सांगितली. ४ एकर शेती असताना ४५० संत्राची लागवडीत मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कवडीमोल भावात संत्रा विकावा लागतो आहे. लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अमरावतीमध्ये संत्रा पिकाला गळती
author img

By

Published : Oct 26, 2019, 12:35 PM IST

Updated : Oct 26, 2019, 7:56 PM IST

अमरावती - विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेला अमरावतीतील संत्रा उत्पादक शेतकरी हा पुन्हा एकदा घोर संकटात सापडला आहे. उन्हाळ्यामध्ये विदर्भात पाण्याचा दुष्काळाने पोटच्या लेकराप्रमाणे जगवलेल्या संत्रा झाडाचे नुकसान झाले. त्यात आता परतीच्या पावसाने कहर केला आहे. मागील 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने संत्रा पिकाला ग्रासले आहे.

अमरावतीमध्ये संत्रा पिकाचे नुकसान, विविध रोगांचा मारा

या संत्र्याची आंबट गोड चवीसाठी ओळख आहे. संत्राला विदर्भासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी मागणी आहे. मात्र, संत्रा उत्पादकावर मोठे संकट आले आहे. अमरावतीतील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे येथील संत्राच्या बागांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

हेही वाचा - दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची दुकानात गर्दी; धनत्रयोदशीला मात्र सराफा बाजाराकडे पाठ

सध्या संत्रा पिकावर परतीच्या पावसामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. येथील उमेश झिबळ नावाच्या शेतकऱ्याने याबाबत त्याची व्यथा सांगितली. ४ एकर शेती असताना ४५० संत्राची लागवडीत मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कवलीमोल भावात संत्रा विकावा लागतो आहे. तसेच लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, झाडावर होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रात्री शेतात सोलर ट्रॅप लावायचा सल्ला कृषी अधिकारी अजय तळेगावकरी यांनी दिला आहे. तसेच याबाबतीत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कार्यकर्त्यांसह उमेदवारांची गोची

या परिस्थितीत त्वरित सर्वेक्षण करून सरकारी मदतीची शेतकऱ्यांना गरज असताना सरकार सत्तेची गणिते जुळवण्यातच व्यस्त आहे. तर, सरकार या परिस्थितीबाबत काय निर्णय घेते याकडे शेतकरी लक्ष लावून बसला आहे.

अमरावती - विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेला अमरावतीतील संत्रा उत्पादक शेतकरी हा पुन्हा एकदा घोर संकटात सापडला आहे. उन्हाळ्यामध्ये विदर्भात पाण्याचा दुष्काळाने पोटच्या लेकराप्रमाणे जगवलेल्या संत्रा झाडाचे नुकसान झाले. त्यात आता परतीच्या पावसाने कहर केला आहे. मागील 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने संत्रा पिकाला ग्रासले आहे.

अमरावतीमध्ये संत्रा पिकाचे नुकसान, विविध रोगांचा मारा

या संत्र्याची आंबट गोड चवीसाठी ओळख आहे. संत्राला विदर्भासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी मागणी आहे. मात्र, संत्रा उत्पादकावर मोठे संकट आले आहे. अमरावतीतील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे येथील संत्राच्या बागांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

हेही वाचा - दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची दुकानात गर्दी; धनत्रयोदशीला मात्र सराफा बाजाराकडे पाठ

सध्या संत्रा पिकावर परतीच्या पावसामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. येथील उमेश झिबळ नावाच्या शेतकऱ्याने याबाबत त्याची व्यथा सांगितली. ४ एकर शेती असताना ४५० संत्राची लागवडीत मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कवलीमोल भावात संत्रा विकावा लागतो आहे. तसेच लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, झाडावर होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रात्री शेतात सोलर ट्रॅप लावायचा सल्ला कृषी अधिकारी अजय तळेगावकरी यांनी दिला आहे. तसेच याबाबतीत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कार्यकर्त्यांसह उमेदवारांची गोची

या परिस्थितीत त्वरित सर्वेक्षण करून सरकारी मदतीची शेतकऱ्यांना गरज असताना सरकार सत्तेची गणिते जुळवण्यातच व्यस्त आहे. तर, सरकार या परिस्थितीबाबत काय निर्णय घेते याकडे शेतकरी लक्ष लावून बसला आहे.

Intro:स्पेशल रिपोर्ट अमरावती

संत्रा पिकाला गळती, विविध रोगांचा संत्रावर मारा,

अमरावती अँकर
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेला अमरावतीतील संत्रा उत्पादक शेतकरी हा पुन्हा एकदा घोर संकटात सापडलाय.उन्हाळयामध्ये विदर्भात पाण्याचा दुष्काळानं पोटच्या लेकरा प्रमाणे जगवलेल्या संत्रा झाडाचं इंधन झालं.आता परतीच्या पावसाने कहर केला. मागील 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने संत्रा पिकाला ग्रासलं आहे.

व्हीवो १:- आंबट गोड चवीसाठी ओळख आहे ती म्हणजे संत्राची. संत्राला विदर्भातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी मागणी आहे. मात्र संत्रा उत्पादकावर मोठं संकट आलंय. अमरावतीतील मोर्शी, वरुड,चांदुर बाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे येथील संत्राच्या बागांना गळती सुरू असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

बाईट १:- सादिक शहा -पांढरे शर्ट घातलेला संत्रा उत्पादक शेतकरी

व्हीवो २:- सध्या संत्रा पिकावर परतीच्या पावसामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. उमेश यांच्याकडे ४ एककर शेती आहे यात ४५० संत्राची लागवड असतांना मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कवलीमोल भावात संत्रा विकावा लागतो आहे.

बाईट २:- उमेश झिबळ, संत्रा उत्पादक


दरम्यान झाडावर होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रात्री शेतात सोलर ट्रॅप लावायचा सल्ला कृषी अधिकारी यांनी दिला आहे.

बाईट ३:- अजय तळेगावकर, कृषी अधिकारी


अमरावतीतील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला.त्यांना गरज आहे ती म्हणजे त्वरित सर्वेक्षण करून सरकारी मदतीची.त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेत.की सत्तेची गणित जुळवण्यातच व्यस्त राहते. याकडे इथला शेतकरी लक्ष लावून बसलाय. लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही अस हे शेतकरी म्हणताहेत. डोळ्यासमोर आलेला संत्रा वाया जाताना दिसताहेत.त्यामुळे त्याला भरोसा आहे तो केवळ सरकारवर. मात्र सरकार काय करत हे पाहणं गरजेचं ठरेल.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Oct 26, 2019, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.