ETV Bharat / state

Railway General Ticket Closed : रेल्वेचे जनरल तिकीट बंदच; विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून जबर दंड वसुलीही

author img

By

Published : May 27, 2022, 7:48 PM IST

Updated : May 27, 2022, 9:35 PM IST

कोरोना काळात सरकारने विविध क्षेत्रात लावलेले निर्बंध उठले असताना रेल्वेने मात्र ( Railway General Ticket Closed ) अद्यापही कोरोना नियमांचे कारण सांगत रेल्वेचे जनरल तिकीट बंदच ठेवले आहे. त्यामुळे प्रवाशांना विनातिकीटे प्रवास करावा लागतो आहे. असे केल्यास गाडीच्या तिकिटाच्या रकमेपेक्षा दुप्पट दंड सुद्धा ( Indian Railway Penalty Recovery ) प्रवाशांकडून रेल्वे प्रशासन उकळत आहे. हा संपूर्ण प्रकार प्रवाशांची लूटमार करणारा असून रेल्वेकडून सुरू असणारा हा अत्याचार त्वरित थांबवावा, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

Amravati Railway Ticket
Amravati Railway Ticket

अमरावती - कोरोना काळात सरकारने विविध क्षेत्रात लावलेले निर्बंध उठले असताना रेल्वेने मात्र ( Railway General Ticket Closed ) अद्यापही कोरोना नियमांचे कारण सांगत रेल्वेचे जनरल तिकीट बंदच ठेवले आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नाची धामधूम असल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली असताना जनरल तिकीट मिळत नसल्याने तुमच्या रिस्कवर विनातिकिट गाडीत चढा, असा सल्ला रेल्वेचे कर्मचारी देत आहे. मात्र, असे केल्यास गाडीच्या तिकिटाच्या रकमेपेक्षा दुप्पट दंड सुद्धा ( Indian Railway Penalty Recovery ) प्रवाशांकडून रेल्वे प्रशासन उकळत आहे. हा संपूर्ण प्रकार प्रवाशांची लूटमार करणारा असून रेल्वेकडून सुरू असणारा हा अत्याचार त्वरित थांबवावा, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया

दीड महिन्यात 12 कोटींची वसुली - रेल्वेच्या भुसावळ मंडळाने गत दीड महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या एक लाख 50 हजार 251 प्रवाशांकडून तब्बल 12 कोटी 43 लाख 83 हजार 434 रुपये वसूल केले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच समोर आणली आहे. सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आणि लग्नाची गडबड असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी आहे. प्रवासाचे आधीच नियोजन करून 15 दिवसांपूर्वी आरक्षण करणाऱ्यांना नो रूममुळे कन्फर्म रेल्वे तिकीट मिळत नाही. त्यात ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना सर्वसाधारण तिकीटही उपलब्ध होत नसल्याने टीसीकडे संपर्क साधून दंडाच्या रकमेसह तिकीट बनवून घ्यावे लागते. यामुळे प्रवास खर्चात या दुप्पट भुर्दंड प्रवाशांना बसतो आहे. सध्या रेल्वेने सर्वसाधारण तिकीट बंद ठेवले असले तरी सर्वसाधारण डब्यातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याऐवजी वाढली आहे. 72 प्रवासी क्षमता असलेल्या या डब्यात दीडशेपेक्षा अधिक प्रवासी चढत आहेत. वेटिंग तिकीट कन्फर्म होत नसल्यामुळे आपल्याकडे वेटिंग तिकीट असल्याचे समजून अनेक जण प्रवास करतात. मात्र, रेल्वे आता अशा प्रवाशांचा परतावा देत असल्याने प्रवासी विनातिकीट ग्राह्य धरून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो आहे.

रेल्वेने केली दुप्पट दंड वसुली - मध्य रेल्वे भुसावळ मंडळात एक एप्रिल ते 15 मे या कालावधीत 45 दिवसात 1 लाख 50 हजार 251 प्रवाशांकडून तब्बल 12 कोटी 46 लाख 83 हजार 434 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गतवर्षी एक एप्रिल ते 15 मे दरम्यान 77 हजार 923 प्रकरणात सहा कोटी 30 लाख 76 हजार 988 रुपये दंड वसूल करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी 45 दिवसात दुपटीने दंड वसूल करण्यात आला आहे.

प्रवासी म्हणतात आर्थिक लूट थांबवा - कोरना काळात रेल्वेने घातलेले निर्बंध देशातील अनेक भागात उठलेले असताना भुसावळ विभागात मात्र कोरोना नियमांच्या नावाखाली आर्थिक लूट अद्यापही कायम आहे. अमरावती, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर अशा रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडी येईपर्यंत पूर्वी सुरू असणारे तिकीट घर आता अर्ध्या तासापूर्वी बंद केले जाते. करंट तिकीट उपलब्ध नसल्यामुळे ज्यांना गावी जाणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रवासी मोठी रिस्क घेऊन विना तिकीटच गाडीत चढतात. अशावेळी अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांकडून दीड हजार रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जाते. इतके पैसे दंडाच्या स्वरूपात दिल्यावर सुद्धा जागा उपलब्ध करून दिली जात नाही. वृद्ध व्यक्तींना ऐनवेळी गावी जाण्याचे काम पडले तर त्यांचे तर हालच होत असल्याचे अनेक प्रवाशांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले.

ऑगस्ट महिन्यापर्यंत अशीच परिस्थिती - कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने घातलेले निर्बंध हळूहळू कमी करण्याचे काम रेल्वे प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. सध्या ज्या प्रवाशांना पुढच्या तीन महिन्यांपर्यंत जनरल बोगीचे आरक्षण दिले आहे, त्यांना आता आरक्षण देणे थांबविण्यात आले आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्या प्रवाशांचे आरक्षण आहे, त्यांचा संपूर्ण कोटा ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात संपुष्टात आल्यावर जनरल तिकीट सुद्धा पूर्वीसारखेच प्रवाशांना गाडी रेल्वे स्थानकावर उभी असताना सुद्धा उपलब्ध होईल, अशी माहिती बडनेरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक पी. के सिन्हा यांनी 'ईटीवी भारत' शी बोलताना दिली.

हेही वाचा - Beer From Urine : लघवीपासून तयार होत आहे बिअर; तुम्हाला घेऊन पहायची आहे का ?

अमरावती - कोरोना काळात सरकारने विविध क्षेत्रात लावलेले निर्बंध उठले असताना रेल्वेने मात्र ( Railway General Ticket Closed ) अद्यापही कोरोना नियमांचे कारण सांगत रेल्वेचे जनरल तिकीट बंदच ठेवले आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नाची धामधूम असल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली असताना जनरल तिकीट मिळत नसल्याने तुमच्या रिस्कवर विनातिकिट गाडीत चढा, असा सल्ला रेल्वेचे कर्मचारी देत आहे. मात्र, असे केल्यास गाडीच्या तिकिटाच्या रकमेपेक्षा दुप्पट दंड सुद्धा ( Indian Railway Penalty Recovery ) प्रवाशांकडून रेल्वे प्रशासन उकळत आहे. हा संपूर्ण प्रकार प्रवाशांची लूटमार करणारा असून रेल्वेकडून सुरू असणारा हा अत्याचार त्वरित थांबवावा, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया

दीड महिन्यात 12 कोटींची वसुली - रेल्वेच्या भुसावळ मंडळाने गत दीड महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या एक लाख 50 हजार 251 प्रवाशांकडून तब्बल 12 कोटी 43 लाख 83 हजार 434 रुपये वसूल केले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच समोर आणली आहे. सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आणि लग्नाची गडबड असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी आहे. प्रवासाचे आधीच नियोजन करून 15 दिवसांपूर्वी आरक्षण करणाऱ्यांना नो रूममुळे कन्फर्म रेल्वे तिकीट मिळत नाही. त्यात ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना सर्वसाधारण तिकीटही उपलब्ध होत नसल्याने टीसीकडे संपर्क साधून दंडाच्या रकमेसह तिकीट बनवून घ्यावे लागते. यामुळे प्रवास खर्चात या दुप्पट भुर्दंड प्रवाशांना बसतो आहे. सध्या रेल्वेने सर्वसाधारण तिकीट बंद ठेवले असले तरी सर्वसाधारण डब्यातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याऐवजी वाढली आहे. 72 प्रवासी क्षमता असलेल्या या डब्यात दीडशेपेक्षा अधिक प्रवासी चढत आहेत. वेटिंग तिकीट कन्फर्म होत नसल्यामुळे आपल्याकडे वेटिंग तिकीट असल्याचे समजून अनेक जण प्रवास करतात. मात्र, रेल्वे आता अशा प्रवाशांचा परतावा देत असल्याने प्रवासी विनातिकीट ग्राह्य धरून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो आहे.

रेल्वेने केली दुप्पट दंड वसुली - मध्य रेल्वे भुसावळ मंडळात एक एप्रिल ते 15 मे या कालावधीत 45 दिवसात 1 लाख 50 हजार 251 प्रवाशांकडून तब्बल 12 कोटी 46 लाख 83 हजार 434 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गतवर्षी एक एप्रिल ते 15 मे दरम्यान 77 हजार 923 प्रकरणात सहा कोटी 30 लाख 76 हजार 988 रुपये दंड वसूल करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी 45 दिवसात दुपटीने दंड वसूल करण्यात आला आहे.

प्रवासी म्हणतात आर्थिक लूट थांबवा - कोरना काळात रेल्वेने घातलेले निर्बंध देशातील अनेक भागात उठलेले असताना भुसावळ विभागात मात्र कोरोना नियमांच्या नावाखाली आर्थिक लूट अद्यापही कायम आहे. अमरावती, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर अशा रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडी येईपर्यंत पूर्वी सुरू असणारे तिकीट घर आता अर्ध्या तासापूर्वी बंद केले जाते. करंट तिकीट उपलब्ध नसल्यामुळे ज्यांना गावी जाणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रवासी मोठी रिस्क घेऊन विना तिकीटच गाडीत चढतात. अशावेळी अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांकडून दीड हजार रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जाते. इतके पैसे दंडाच्या स्वरूपात दिल्यावर सुद्धा जागा उपलब्ध करून दिली जात नाही. वृद्ध व्यक्तींना ऐनवेळी गावी जाण्याचे काम पडले तर त्यांचे तर हालच होत असल्याचे अनेक प्रवाशांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले.

ऑगस्ट महिन्यापर्यंत अशीच परिस्थिती - कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने घातलेले निर्बंध हळूहळू कमी करण्याचे काम रेल्वे प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. सध्या ज्या प्रवाशांना पुढच्या तीन महिन्यांपर्यंत जनरल बोगीचे आरक्षण दिले आहे, त्यांना आता आरक्षण देणे थांबविण्यात आले आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्या प्रवाशांचे आरक्षण आहे, त्यांचा संपूर्ण कोटा ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात संपुष्टात आल्यावर जनरल तिकीट सुद्धा पूर्वीसारखेच प्रवाशांना गाडी रेल्वे स्थानकावर उभी असताना सुद्धा उपलब्ध होईल, अशी माहिती बडनेरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक पी. के सिन्हा यांनी 'ईटीवी भारत' शी बोलताना दिली.

हेही वाचा - Beer From Urine : लघवीपासून तयार होत आहे बिअर; तुम्हाला घेऊन पहायची आहे का ?

Last Updated : May 27, 2022, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.