ETV Bharat / state

अमरावतीत रानभाज्या महोत्सवाचा पालकमंत्री यशोमती ठाकुरांच्या हस्ते शुभारंभ

author img

By

Published : Aug 14, 2020, 3:25 PM IST

Updated : Aug 14, 2020, 3:35 PM IST

रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘रानभाजी महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. मानवी आरोग्यासाठी सकस आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्यासाठी उपयुक्त असतात.

अमरावती रानभाज्या महोत्सव
अमरावती रानभाज्या महोत्सव

अमरावती - लोकांना रानभाज्यांचे महत्त्व कळावे, यासाठी दरवर्षी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही हा रानभाजी महोत्सव अमरावतीमध्ये भरवण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात करण्यात आला आहे.

अमरावतीत रानभाज्या महोत्सवाचा पालकमंत्री यशोमती ठाकुरांच्या हस्ते शुभारंभ
रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘रानभाजी महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. मानवी आरोग्यासाठी सकस आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्यासाठी उपयुक्त असतात. रानावनात, शेतशिवारात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांची नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहरात भरलेल्या या रानभाज्या महोत्सवात आंबट चुका, गुळवेल, घोळभाजी, अंबाडी, भुईआवळा, हेटी, शेवगा, गोखरु, कुद्याचे फूल आधी रानभाज्या यांचा समावेश होता.विविध रानभाज्या विक्रीस उपलब्ध झाल्या होत्या. रानभाज्या महोत्सवात या भाज्यांना ओळख मिळवून त्याची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण करणे शक्य होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल व सर्वसामान्य नागरिकांना रानभाज्यांचे, रानफळांचे महत्त्व व आरोग्यविषयक माहिती होन्यास या महोत्सवाचा फायदा होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी अधिकारी डॉ. विजय चव्हाळे उपस्थित होते.

अमरावती - लोकांना रानभाज्यांचे महत्त्व कळावे, यासाठी दरवर्षी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही हा रानभाजी महोत्सव अमरावतीमध्ये भरवण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात करण्यात आला आहे.

अमरावतीत रानभाज्या महोत्सवाचा पालकमंत्री यशोमती ठाकुरांच्या हस्ते शुभारंभ
रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘रानभाजी महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. मानवी आरोग्यासाठी सकस आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्यासाठी उपयुक्त असतात. रानावनात, शेतशिवारात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांची नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहरात भरलेल्या या रानभाज्या महोत्सवात आंबट चुका, गुळवेल, घोळभाजी, अंबाडी, भुईआवळा, हेटी, शेवगा, गोखरु, कुद्याचे फूल आधी रानभाज्या यांचा समावेश होता.विविध रानभाज्या विक्रीस उपलब्ध झाल्या होत्या. रानभाज्या महोत्सवात या भाज्यांना ओळख मिळवून त्याची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण करणे शक्य होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल व सर्वसामान्य नागरिकांना रानभाज्यांचे, रानफळांचे महत्त्व व आरोग्यविषयक माहिती होन्यास या महोत्सवाचा फायदा होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी अधिकारी डॉ. विजय चव्हाळे उपस्थित होते.
Last Updated : Aug 14, 2020, 3:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.