ETV Bharat / state

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, श्रीनिवास रेड्डींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

author img

By

Published : Apr 3, 2021, 7:02 PM IST

Updated : Apr 3, 2021, 7:41 PM IST

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. जिल्हा सरकारी वकील परिक्षित गनोरकर यांनी या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हाच दाखल नाही तर त्यांना अटकपूर्व जामीन कशासाठी? असा युक्तीवाद केला.

श्रीनिवास रेड्डींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
श्रीनिवास रेड्डींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

अमरावती - दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. जिल्हा सरकारी वकील परिक्षित गनोरकर यांनी या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हाच दाखल नाही तर त्यांना अटकपूर्व जामीन कशासाठी? असा युक्तीवाद केला. तर श्रीनिवास रेड्डी यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा असा युक्तीवाद श्रीनिवास रेड्डी यांचे वकील वाधवानी यांनी केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर श्रीनिवास रेड्डी आंचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला आहे.

श्रीनिवास रेड्डींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

काय आहे प्रकरण?

मेळघाटातील हरिसालच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी वनाधिकारी विनोद शिवकुमार याच्या त्रासाला कंटाळून 25 मार्चला आत्महत्या केली होती. या प्रकरणात तत्कालीन मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे दीपाली चव्हाण यांनी अनेकवेळा विनोद शिवकुमार याची तक्रार केली होती. मात्र तक्रार करून देखील कारवाई करण्यात न आल्याने, दीपाली चव्हाण यांनी निराश होऊन आत्महत्येचे पाऊल उचलले असा आरोप आहे. याप्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे या करत आहेत. प्रज्ञा सरवदे या १९८९ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत, त्यांनी सुरुवातीला 6 वर्ष पश्चिम बंगालमध्ये नोकरी केली. १९९६ ते २००० दरम्यान त्यांनी सीबीआयमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

हेही वाचा - आम्ही सरकारसोबत, मात्र लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा - उपाध्ये

अमरावती - दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. जिल्हा सरकारी वकील परिक्षित गनोरकर यांनी या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हाच दाखल नाही तर त्यांना अटकपूर्व जामीन कशासाठी? असा युक्तीवाद केला. तर श्रीनिवास रेड्डी यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा असा युक्तीवाद श्रीनिवास रेड्डी यांचे वकील वाधवानी यांनी केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर श्रीनिवास रेड्डी आंचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला आहे.

श्रीनिवास रेड्डींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

काय आहे प्रकरण?

मेळघाटातील हरिसालच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी वनाधिकारी विनोद शिवकुमार याच्या त्रासाला कंटाळून 25 मार्चला आत्महत्या केली होती. या प्रकरणात तत्कालीन मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे दीपाली चव्हाण यांनी अनेकवेळा विनोद शिवकुमार याची तक्रार केली होती. मात्र तक्रार करून देखील कारवाई करण्यात न आल्याने, दीपाली चव्हाण यांनी निराश होऊन आत्महत्येचे पाऊल उचलले असा आरोप आहे. याप्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे या करत आहेत. प्रज्ञा सरवदे या १९८९ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत, त्यांनी सुरुवातीला 6 वर्ष पश्चिम बंगालमध्ये नोकरी केली. १९९६ ते २००० दरम्यान त्यांनी सीबीआयमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

हेही वाचा - आम्ही सरकारसोबत, मात्र लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा - उपाध्ये

Last Updated : Apr 3, 2021, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.