ETV Bharat / state

येणाऱ्या काळात महाराष्ट्र थेट परराष्ट्रांसोबत स्पर्धा करेल - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न राज्य बनेल आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राची स्पर्धा थेट परराष्ट्रांसोबत होईल. महाराष्ट्राला प्रगतीशील बनविण्यासाठी मला आपला महाजनादेश हवा आहे. मला आपला जनादेश द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे महाजनादेश यात्रेच्या शुभारंभ सोहळ्यात केले आहे.

author img

By

Published : Aug 1, 2019, 7:15 PM IST

येणाऱ्या काळात महाराष्ट्र थेट परराष्ट्रांसोबत स्पर्धा करेल - देवेंद्र फडणवीस

अमरावती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या गुरुकुंज-मोझरी येथे गुरूवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ झाला. एक लाखाहून अधिक कार्यकर्ते व भाजपचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भविष्यात महाराष्ट्राची स्पर्धा देशातील राज्यांशी नाही तर परराष्ट्रांसोबत होईल. यासाठी महाराष्ट्राला संपन्न राज्य बनविण्यासाठी मला हा महाजनादेश हवा आहे. मला जनादेश द्या, असे आवाहन जनतेला केले.

येणाऱ्या काळात महाराष्ट्र थेट परराष्ट्रांसोबत स्पर्धा करेल - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

  • आज राज्यात दुष्काळ आहे, मात्र आपल्या पुढच्या पिढीला दुष्काळ पहावा लागणार नाही.
  • येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कोणत्याही समस्या राहणार नाहीत. सर्व महिला सुरक्षित असतील, युवकांच्या हातात रोजगार असेल.
  • आमच्या सरकारने 50 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले. मागच्या सरकारने 15 वर्षात केवळ 20 हजार कोटी रुपये दिले होते. आज शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी अनेक योजना आमच्या सरकार राबवत आहे.
  • 2014 पर्यंत केवळ 50 लाख कुटुंबाकडे शौचालये होती, 60 लाख घरांत शौचालये नव्हती. आम्ही आज 5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त केला आहे.
  • 2014 मध्ये शिक्षणात 18 व्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आज तिसऱ्या क्रमांकावर आला. येत्या काळात महाराष्ट्र शिक्षणात पहिल्या क्रमांकावर येईल. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज पहिल्या क्रमांकवर आहे. देशात सर्वाधिक रोजगार देणारे राज्य म्हणून महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा केंद्राचा अहवाल आहे.
  • महाराष्ट्र्रात आमचे सरकार आले, तेव्हा केवळ 3 लाख कुटुंबे बचत गटांशी जोडली होती. आम्ही 40 लाखाहून अधिक कुटुंबांना बचत गटांशी जोडून त्यांना रोजगार मिळवून दिला.
  • ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 30 हजार किलोमीटरचे रस्ते ग्रामीण भागात तयार केले. इतके मोठ्या प्रमाणात रस्ते देशात कुठेही झाले नाहीत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी भरभरून देतात

पूर्वीचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले की, हात हलवीत परत यायचे. मी दिल्लीला गेलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी भरभरून देतात. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक आजारावर उपचारासाठी आम्ही मदतीच्या मोठ्या योजना आणल्या. आज अनेकांना या योजनेमुळे जीवनदान मिळाले आहे. आज राष्ट्रसंतांच्या भूमीत उसळलेला जनसागर हा महाजनादेश असून आपण विकासाच्या दिशेने पुढे जाऊ, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अमरावती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या गुरुकुंज-मोझरी येथे गुरूवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ झाला. एक लाखाहून अधिक कार्यकर्ते व भाजपचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भविष्यात महाराष्ट्राची स्पर्धा देशातील राज्यांशी नाही तर परराष्ट्रांसोबत होईल. यासाठी महाराष्ट्राला संपन्न राज्य बनविण्यासाठी मला हा महाजनादेश हवा आहे. मला जनादेश द्या, असे आवाहन जनतेला केले.

येणाऱ्या काळात महाराष्ट्र थेट परराष्ट्रांसोबत स्पर्धा करेल - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

  • आज राज्यात दुष्काळ आहे, मात्र आपल्या पुढच्या पिढीला दुष्काळ पहावा लागणार नाही.
  • येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कोणत्याही समस्या राहणार नाहीत. सर्व महिला सुरक्षित असतील, युवकांच्या हातात रोजगार असेल.
  • आमच्या सरकारने 50 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले. मागच्या सरकारने 15 वर्षात केवळ 20 हजार कोटी रुपये दिले होते. आज शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी अनेक योजना आमच्या सरकार राबवत आहे.
  • 2014 पर्यंत केवळ 50 लाख कुटुंबाकडे शौचालये होती, 60 लाख घरांत शौचालये नव्हती. आम्ही आज 5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त केला आहे.
  • 2014 मध्ये शिक्षणात 18 व्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आज तिसऱ्या क्रमांकावर आला. येत्या काळात महाराष्ट्र शिक्षणात पहिल्या क्रमांकावर येईल. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज पहिल्या क्रमांकवर आहे. देशात सर्वाधिक रोजगार देणारे राज्य म्हणून महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा केंद्राचा अहवाल आहे.
  • महाराष्ट्र्रात आमचे सरकार आले, तेव्हा केवळ 3 लाख कुटुंबे बचत गटांशी जोडली होती. आम्ही 40 लाखाहून अधिक कुटुंबांना बचत गटांशी जोडून त्यांना रोजगार मिळवून दिला.
  • ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 30 हजार किलोमीटरचे रस्ते ग्रामीण भागात तयार केले. इतके मोठ्या प्रमाणात रस्ते देशात कुठेही झाले नाहीत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी भरभरून देतात

पूर्वीचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले की, हात हलवीत परत यायचे. मी दिल्लीला गेलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी भरभरून देतात. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक आजारावर उपचारासाठी आम्ही मदतीच्या मोठ्या योजना आणल्या. आज अनेकांना या योजनेमुळे जीवनदान मिळाले आहे. आज राष्ट्रसंतांच्या भूमीत उसळलेला जनसागर हा महाजनादेश असून आपण विकासाच्या दिशेने पुढे जाऊ, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Intro:आज राज्यात दुष्काक आहे मात्र आपल्या पुढच्या पिढीला दुष्काळ पहाययला मिळणार नाही असे मी वचन देतो. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात किंत्याही समस्या नसतील.माझा आई- बहिणी सुरक्षित असतील, युवकांच्या हातात रोजगार असेल. महाराष्ट्र देशात सर्वात संपन्न राज्य बनेल आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राची स्पर्धा थेट परराष्ट्रांसोबत होईल.महाराष्ट्राला आता प्रगतशील बनविण्यासाठी मला महाजनादेश हवा, मला जनादेश द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या शुभारंभ सोहळ्यात केल


Body:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथे भाजपच्या या महजादेश यात्रेच्या शुभारंभ सोहळ्याला अमरावती जिल्ह्यातून एक लाखाच्यावर गर्दी उसळली. भव्य सभामंचावर भाजपचर प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ना. डॉ. अनिल बोंडे, ना.पंकजा मुंडे, ना. विनोद तावडे, ना.आशिष शेलार, ना. संजय कुटे, ना. विनोद तावडे आदी अनेक मंत्री आमदार या सोहळ्याला उपस्थित होते.
महाजनादेश यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या आयुष्यत चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे साक्षीदार नेमीच सारक्षन मंत्री हे साक्षीदार होते. आज सुद्धा महाजनादेश यात्रा राजनाथ सिंह यांच्या उपस्थितच काढतो आहे.
पंधरा वर्षात ज्यांनी महाराष्ट्र्रात विकास केला त्यापेक्षा दुप्पट विकास आम्ही केला. मागच्या सरकारने विद्राभच्या नावावर स्वतःचे भले करून घेतली. 2014 ते 2018 या काळात विदर्भातील सिंचन अनुशेष पूर्ण केला. अमरावती, अकिल्यात सिंचनाची कामे पूर्ण केली. विदर्भात उद्योग क्रांती आणली. आज विदर्भात उद्योगासाठी वीज दर 3 रुपयांनी कमी केले आणि आज अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मध्ये नव्या उद्योगांना जागा उरली नाही इतका विकास झाला.15 वर्षात नांदगाव पेठला त्यांनी पोरकं ठेवलं त्या नांदगाव पेठ मध्ये आज भरभरून उद्योग सुरू झाले. देशातील सर्वात मोठा महामार्ग नागपूर ते मुंबई आम्ही करतो आहे.पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल. यामुळे विदर्भात विकासाची भरभराट झालेली दिसेल.
शेतकऱ्यांना आमच्या सरकारने 50 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले. मागच्या सरकारने 15 वर्षात केवळ 20 हजार कोटी रुपये दिले होते.आज शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी अनेक योजना आमच्या सरकारने राबविल्या.
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 30 हजार की.मी चे रस्ते ग्रामीण भागात तयार केले. माझा दावा आहे इतके मोठे रस्ते देशात कुठेही झाले नाही.
2014 पर्यंत कवक 50 लाख कुटुंबकडे शौचालय होते आणि 60 लाख घरात शौचालय नव्हते. आम्ही आज 5 वर्षात महाराष्ट्र हागणदारीमुक्त केला.
2014 मध्ये शिक्षणात 18 व्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आज तिसऱ्या क्रमांकावर आला आणि येत्या काळात महाराष्ट्र शिक्षणात पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. परकीय गुंतवणूकिट महाराष्ट्र आज पहिल्या क्रमांकवर आहे. देशात सर्वाधिक रोजगार देणार राज्य म्हणून महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा केंद्राचा आहवाल आहे.
महाराष्ट्र्र आमचं सरकार आलं तेव्हा कवक 3 लाख कुटुंब बचत गटांशी जोडले होते आम्ही 40 लाखावर कुटुंबांना बचत गटांशी जोडून त्यांना रोजगार ही मिळवून दिला.
पुरबीचे मुख्यमंत्री दिल्ली ला जाऊन हात हलवीत परत यायचे. मी दिल्लीला गेलो की पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रक भरभरून देतात. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक आजारावर उपचारासाठी आम्ही मदतीसाठी मोठ्या योजना आणल्या. आज अनेकांना या योजनेमुळे जीवनदान मिळाले आहे. आज राष्ट्रसंत्यांच्या भूमीत उसळलेला जनसागर हा महाजनादेश असून आपण विकासाच्या दिशेने पुढे जाऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.