ETV Bharat / state

एका ध्येय वेड्या शेतकऱ्याची कहाणी, अमरावतीत साकारले लोकबीज विद्यापीठ

author img

By

Published : Jul 4, 2019, 12:14 PM IST

Updated : Jul 4, 2019, 3:41 PM IST

या अवलियाने जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर भिल्ली या गावातील दहा बाय दहाच्या खोलीत लोकबीज विद्यापीठाची स्थापना केली आहे.

आपल्या लोकबीज विद्यापाठामध्ये रमेश साखरकर

अमरावती - गेल्या सतरा वर्षांपूर्वी रमेश साखरकर या ध्येय वेड्या शेतकऱ्याने या विद्यापीठाची स्थापना केली आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळावे, हा या विद्यापीठाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांनी रसायन मुक्त शेती करून शरीरही विषमुक्त करावे यासाठी ते काम करत आहेत. याठिकाणी त्यांनी एकूण 270 प्रकारच्या देशी बियाणांचा संग्रह केला आहे. ते लोकांना घरीच परसबाग तयार करून विषमुक्त शेती करण्याचा संदेश देतात.

एका ध्येय वेड्या शेतकऱ्याची कहाणी, अमरावतीत साकारले लोकबीज विद्यापीठ

भिल्ली गावाची लोकसंख्या जेमतेम दीड हजार आहेत. या ठिकाणी गेल्या १७ वर्षांपासून साखरकर कृषिसंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी गावात आदर्श बीजग्राम तयार केले आहे. यामध्ये डाळ, गहू, ज्वारी, आदी कडधान्य, वेल, भाजीपाला, मसाला, फळे, चारा अशा विविध बियाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. नवधान्य म्हणून मूग, तूर, उडीद, तीळ, मटकी, चवळी, भेंडी, ज्वारी, कापूस इ. अशा देशी बियाणांची साठवण रमेश साखरकर यांनी केली आहे.

रासायनिक खते, बियाणे टाकून शेतीची सुपीकता नष्ट होत आहे. म्हणून या शेतकऱ्याने देशी बियाणांवर भर दिला आहे. त्यांनी स्वत:ची 270 प्रकारच्या बियाणांची बीज बँक तयार केली आहे. अमरावती जिल्हासह नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ व वाशिमसह मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या ठिकाणांहून या बियाणांना मागणी आहे. साखरकर हे तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी हे देशी बियाणे व भाजीपाला देतात.

या लोकबीज विद्यापीठाची प्रेरणा त्यांना त्यांच्या आई-वडिलांपासून लाभली आहे, असे ते सांगतात. त्यांच्या एका पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून ते लोकांना या देशी बियाणांचे महत्त्व पटवून देतात. रासायनिक शेती करताना शेतीची सुपीकता व निरनिराळ्या आजारांना सामोरे जाण्यापेक्षा विषमुक्त शेती करूनदेखील चांगले उत्पन्न होऊ शकते हे रमेश साखरकर यांनी केलेल्या कामातून दिसत आहे. त्यांचा आदर्श घेऊन शेती केल्यास नक्की शेती ही फायदेशीर राहील यात दुमत नाही.

अमरावती - गेल्या सतरा वर्षांपूर्वी रमेश साखरकर या ध्येय वेड्या शेतकऱ्याने या विद्यापीठाची स्थापना केली आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळावे, हा या विद्यापीठाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांनी रसायन मुक्त शेती करून शरीरही विषमुक्त करावे यासाठी ते काम करत आहेत. याठिकाणी त्यांनी एकूण 270 प्रकारच्या देशी बियाणांचा संग्रह केला आहे. ते लोकांना घरीच परसबाग तयार करून विषमुक्त शेती करण्याचा संदेश देतात.

एका ध्येय वेड्या शेतकऱ्याची कहाणी, अमरावतीत साकारले लोकबीज विद्यापीठ

भिल्ली गावाची लोकसंख्या जेमतेम दीड हजार आहेत. या ठिकाणी गेल्या १७ वर्षांपासून साखरकर कृषिसंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी गावात आदर्श बीजग्राम तयार केले आहे. यामध्ये डाळ, गहू, ज्वारी, आदी कडधान्य, वेल, भाजीपाला, मसाला, फळे, चारा अशा विविध बियाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. नवधान्य म्हणून मूग, तूर, उडीद, तीळ, मटकी, चवळी, भेंडी, ज्वारी, कापूस इ. अशा देशी बियाणांची साठवण रमेश साखरकर यांनी केली आहे.

रासायनिक खते, बियाणे टाकून शेतीची सुपीकता नष्ट होत आहे. म्हणून या शेतकऱ्याने देशी बियाणांवर भर दिला आहे. त्यांनी स्वत:ची 270 प्रकारच्या बियाणांची बीज बँक तयार केली आहे. अमरावती जिल्हासह नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ व वाशिमसह मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या ठिकाणांहून या बियाणांना मागणी आहे. साखरकर हे तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी हे देशी बियाणे व भाजीपाला देतात.

या लोकबीज विद्यापीठाची प्रेरणा त्यांना त्यांच्या आई-वडिलांपासून लाभली आहे, असे ते सांगतात. त्यांच्या एका पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून ते लोकांना या देशी बियाणांचे महत्त्व पटवून देतात. रासायनिक शेती करताना शेतीची सुपीकता व निरनिराळ्या आजारांना सामोरे जाण्यापेक्षा विषमुक्त शेती करूनदेखील चांगले उत्पन्न होऊ शकते हे रमेश साखरकर यांनी केलेल्या कामातून दिसत आहे. त्यांचा आदर्श घेऊन शेती केल्यास नक्की शेती ही फायदेशीर राहील यात दुमत नाही.

Intro:अमरावती जिल्ह्यातील ध्येय वेड्या शेतकऱ्याने साकारले दहा बाय दहाच्या कवेलूच्या छताखाली 270 देशी बियाण्यांचे लोकबीज विद्यापीठ.

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील देशी बियाणे जतन करणाऱ्या आवलीयाची कहाणी
-----------------------------------------------
अमरावती -पॅकेज स्टोरी
-----------------------------------------------
अँकर अमरावती
आपल्याला जर एखाद्य कृषी विद्यापीठ पाहून प्रशिक्षण किंवा मग पिकांची माहिती घ्यायची इच्छा झाली तर नजरे पुढे राहते त्या विद्यापीठाची प्रशस्त अशी भली मोठी इमारत,तिला मोठे गेट ,अनेक ठिकाणी तर पैसेही मोजावे लागतात,अनेक बऱ्याच अशी मोठी रचना ही कृषी विद्यापीठाची आपण पाहतो. पण आज आम्ही तुम्हाला ज्या विद्यापीठात घेऊन जानार आहोत ते काही प्रशस्त इमारतीच विद्यापीठ नाही तर ते विद्यापीठ आहे.दहा बाय दहाच्या व वरून कवेलूचे छत असलेल्या एका खोलतील विद्यापीठ नेमकं हे कसं आणि कुठे आहे हे विद्यापीठ तर पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.
----------------------------------------------
Vo-1
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर भिल्ली या गावातील दहा बाय दहाच्या खोलीतील लोकबीज विद्यापीठाची मागील सतरा वर्षांपासून स्थापना रमेश साखरकर या ध्येय वेड्या शेतकऱ्यांने केली आहे.या शेतकऱ्याचा उद्देश एकच की लोकांना विषमुक्त अन्न मिळावं.सोबत रासायनिक मुक्त शेती करून शरीरही विषमुक्त करावं यासाठी ते गेल्या सतरा वर्षा पासून धडपडत आहे.त्यांनी एकूण 270 प्रकारच्या देशी बियानाचा संग्रह जतन केला असून ते लोकांना घरीच परसबाग तयार करून विषमुक्त शेती करायचा संदेश देतात.

बाईट-1-रमेश साखरकर

VO-2

 जेमतेम दीड हजार लोकसंख्येच्या भिल्ली या गावात मागील १७ वर्षांपासून कृषिसंत म्हणून तेओळखले जातात.त्यांनी गावात आदर्श बीजग्राम तयार केले आहे़ डाळ, गहू,ज्वारी,
आदी कडधान्य, वेल, भाजीपाला, मसाला, कंद, फळ, चारा अशा वर्गीय बियाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे़ नवधान्य म्हणून मूग, तूर, उडीद, तीळ, मटकी, वाळूक, चवळी, भेंडी, ज्वारी, कापूस अशा देशी बियाण्यांची जपणूक रमेश साखरकर यांनी केली आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देशी बियाणे देऊन या शेतकरी अभियानात सहभागी होऊन खरीप व रबी हंगामात सेंद्रिय शेतीत देशी बियाण्यांची लागवड करतात़ 

बाईट-2- रमेश साखरकर

VO-3

रासायनिक खते बियाणे टाकून शेतीची सुपीकता नष्ट होत आहे या शेतकऱ्याने देशी बियाण्यावर भर दिला आहे,या रमेश सारखकर नामक शेतकऱ्याने 270 प्रकारचे बी उपलब्ध आहे, स्वतः बिज बँक तयार केली,हे विष मुक्त बियाणे असून अमरावती जिल्हासह नागपूर, वर्धा,अकोला,यवतमाळ व वाशिम सह मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश येथील शेतकरी या शेतकऱ्याकडे बियाणे घ्यायला येतात,आपल्या 10 बाय10 च्या छोट्याश्या  खोलीत त्यांनी बीज बँक तयार केली आहे.तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेत ते देशी बियाने देऊन विध्यार्थीच्या पोषण आहारात देशी भाजीपाला  देण्याचे काम ते करतात.

बाईट-3-रमेश साखरकर

VO-4

लोकबीज विद्यापीठाचा लाभ इतर शेतकऱ्यांना झाला आहे, शेतकऱ्यांना हे देशी बियाणे मोठ्या प्रमाणात तयार करून देतात ही संकल्पना त्यांना आई वडिलांनपासून मिळाली असून त्यांचा एक पंचसूत्री कार्यक्रम असून त्याच्या माध्यमातून ते लोकांना देशी बियाण्याचे महत्त्व पटवून देतात.

बाईट -4 -रमेश साखरकर

Vo-5

रासायनिक शेती करतांना शेतीची सुपीकता व निरनिराळ्या आजारांना सामोरे जाण्यापेक्षा विषमुक्त शेती करून देखील चांगले उत्पन्न होऊ शकते हे रमेश साखरकर यांनी  दाखवून दिले आहे त्यांचा आदर्श घेऊन शेती केल्यास नक्की शेती ही फायदेशीर राहील यात दुमत नाही.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jul 4, 2019, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.