ETV Bharat / state

तिवसा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार; जलशुद्धीकरण यंत्रावर आढळला सहा इंच शेवाळाचा थर

तिवसा नगरपंचायत होण्याअगोदर ग्रामपंचायत होती. त्यावेळी येथे शिवसेना सत्तेत होती. आठ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना तयार झाली मात्र, ही पाणी पुरवठा योजना अर्धवटच राहिली.

author img

By

Published : Dec 1, 2019, 8:48 PM IST

जलशुद्धीकरण यंत्रावर आढळला सहा इंच शेवाळाचा थर
जलशुद्धीकरण यंत्रावर आढळला सहा इंच शेवाळाचा थर

अमरावती - तिवसा नगर पंचायत नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहते. काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या या नगर पंचायतीत स्वच्छतेसाठी दिलेल्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरोग्य सभापतींनी केला होता. हा वाद ताजा असतानाच आरोग्य सभापती नरेंद्र विघ्ने यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्राची पाहणी केली. पिण्याच्या पाण्यात जलशुद्धीकरण यंत्रावर सहा इंच शेवाळाचा थर आढळला.

जलशुद्धीकरण यंत्रावर आढळला सहा इंच शेवाळाचा थर


नरेंद्र विघ्ने यांनी जलशुद्धीकरण केंद्राचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. नगरपंचायतीचा भोंगळ कारभार समोर येताच नगरपंचायतीने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढून टाकी स्वच्छ केली. या टाकीत ट्रॅकरभर गाळ निघाला.

हेही वाचा - '...आता विधानसभाध्यक्षांनी 5 वर्षे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बजावावी'
तिवसा नगरपंचायत होण्याअगोदर ग्रामपंचायत होती. त्यावेळी येथे शिवसेना सत्तेत होती. आठ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना तयार झाली मात्र, ही पाणी पुरवठा योजना अर्धवटच राहिली. जलशुद्धीकरण यंत्रणाही पाहिजे तशी झाली नाही. परिणामी वर्धा नदीतून येणाऱ्या पाण्याचे चांगल्या प्रकारे शुद्धीकरण होत नाही, असा आरोप वारंवार होतो.


आनंदवाडी परिसरात असलेल्या या पाणी पुरवठा योजनेकडे नगरपंचायत, प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नरेंद्र विघ्ने यांनी केला. शहरातील नागरिकांना पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा करून प्रशासन त्यांच्या आरोग्याशी खेळत आहे.

अमरावती - तिवसा नगर पंचायत नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहते. काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या या नगर पंचायतीत स्वच्छतेसाठी दिलेल्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरोग्य सभापतींनी केला होता. हा वाद ताजा असतानाच आरोग्य सभापती नरेंद्र विघ्ने यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्राची पाहणी केली. पिण्याच्या पाण्यात जलशुद्धीकरण यंत्रावर सहा इंच शेवाळाचा थर आढळला.

जलशुद्धीकरण यंत्रावर आढळला सहा इंच शेवाळाचा थर


नरेंद्र विघ्ने यांनी जलशुद्धीकरण केंद्राचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. नगरपंचायतीचा भोंगळ कारभार समोर येताच नगरपंचायतीने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढून टाकी स्वच्छ केली. या टाकीत ट्रॅकरभर गाळ निघाला.

हेही वाचा - '...आता विधानसभाध्यक्षांनी 5 वर्षे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बजावावी'
तिवसा नगरपंचायत होण्याअगोदर ग्रामपंचायत होती. त्यावेळी येथे शिवसेना सत्तेत होती. आठ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना तयार झाली मात्र, ही पाणी पुरवठा योजना अर्धवटच राहिली. जलशुद्धीकरण यंत्रणाही पाहिजे तशी झाली नाही. परिणामी वर्धा नदीतून येणाऱ्या पाण्याचे चांगल्या प्रकारे शुद्धीकरण होत नाही, असा आरोप वारंवार होतो.


आनंदवाडी परिसरात असलेल्या या पाणी पुरवठा योजनेकडे नगरपंचायत, प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नरेंद्र विघ्ने यांनी केला. शहरातील नागरिकांना पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा करून प्रशासन त्यांच्या आरोग्याशी खेळत आहे.

Intro:आरोग्य सभापतीने केली तिवसा नगरपंचायतची पोल खोल

अखेर पाणी पुरवठा बंद ठेवून गाळ सफाई
--------------------–--------------------------------
अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगर पंचायत ही नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहते.काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या
.नगर पंचायत मध्ये स्वच्छते साठी दिलेल्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरोग्य सभापती ने केला होता.हा वाद ताजा असतानाच आता या आरोग्य सभापती नरेंद्र विघ्ने यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्रावर पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला होता या जलशुद्धीकरण यंत्रावर चक्क 6 इंचाचा पिण्याच्या पाण्यात चिला दिसून आल्याने आरोग्यासाठी हा घातक असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता नरेंद्र विघ्ने यांनी जलशुद्धीकरण यंत्रावर सर्व परिस्थिती असलेला व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता त्यामुळे नगरपंचायतची पोल खोल होताच नगरपंचायतने या टाकीतील गाळ काढून टाकी स्वच्छ केली यात चक्क ट्रॅकरभर गाळ निघाला.

तत्कालीन ग्रामपंचायत असतांना शिवसेनेच्या काळात लोकवर्गणीतून ८ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना तयार झाली मात्र ही पाणी पुरवठा योजना अर्धवटच राहली व जलशुद्धीकरण यंत्र पाहिजे तसे झाले नाही, त्यामुळे 12 किलोमीटर अंतरावरून वर्धा नदीच्या तीरावरील पाणी हे अशुद्ध असल्याचा आरोप आहे कारण येथे चांगल्या प्रकारे शुद्ध पाणी केल्या जात आहे,आनंदवाडी परिसरात असलेल्या पाणी पुरवठा योजनेकडे नगरपंचायत व प्रशासकीय यंत्रणा सहित लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जात आहे, आरोग्य सभापती नरेंद्र विघ्ने यांच्या पाहणी दौऱ्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे,सहा-सहा इंचाचा चिल्याचा थर पाण्यावर दिसून येत असल्याने शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप विघ्ने यांनी केला
Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.