ETV Bharat / state

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे १७३ बळी; सरकारचे दुर्लक्ष

author img

By

Published : Aug 20, 2019, 7:33 PM IST

खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांबाबत अनेकांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे. सदरील कामाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून या अपघाताला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

खड्ड्यांमुळे नागपूर-औरंगाबाद महामार्गावर १७३ बळी

अमरावती- नागपूर-औरंगाबाद महामार्ग हा जीवघेण्या खड्ड्यांची समृद्धी असलेला महामार्ग बनला आहे. मागील ९ वर्षात या महामार्गावरील खड्ड्यांनी तब्बल १७३ बळी घेतले आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग तयार होत आहे. मात्र वाहतूक सुरू असलेल्या महामार्गावरील खड्डे भरायला सरकारकडे पैसे नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खड्ड्यांमुळे नागपूर-औरंगाबाद महामार्गावर १७३ बळी

जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुई खेडवरून नागपूर - औरंगाबाद महामार्ग जातो. येथून चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील मुळचे असलेले व सद्या नागपूरमधील गोटाळ पांजरी, कस्तूरी नगर येथे वास्तव्यास असलेले अनिल सारंगधर चेंडकापुरे हे रविवारी आपल्या आई, पत्नी, मुली, वडिल व सासऱ्यांसोबत नागपूरवरून घुईखेडकडे आल्टो कार (क्र. एमएच ४९ यु ३४०९) ने प्रवास करित होते. दरम्यान घुईखेड जवळील खारवगळ नाल्याजवळ टाटा मोटर्स कंपनीच्या ट्रक (क्र. एमएच १७ बीडी ९७४३) विरूद्ध दिशेने येत होता. दरम्यान या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात खड्डे वाचविण्याच्या नादात झाल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांबाबत अनेकांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे. सदरील कामाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून या अपघाताला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

अमरावती- नागपूर-औरंगाबाद महामार्ग हा जीवघेण्या खड्ड्यांची समृद्धी असलेला महामार्ग बनला आहे. मागील ९ वर्षात या महामार्गावरील खड्ड्यांनी तब्बल १७३ बळी घेतले आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग तयार होत आहे. मात्र वाहतूक सुरू असलेल्या महामार्गावरील खड्डे भरायला सरकारकडे पैसे नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खड्ड्यांमुळे नागपूर-औरंगाबाद महामार्गावर १७३ बळी

जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुई खेडवरून नागपूर - औरंगाबाद महामार्ग जातो. येथून चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील मुळचे असलेले व सद्या नागपूरमधील गोटाळ पांजरी, कस्तूरी नगर येथे वास्तव्यास असलेले अनिल सारंगधर चेंडकापुरे हे रविवारी आपल्या आई, पत्नी, मुली, वडिल व सासऱ्यांसोबत नागपूरवरून घुईखेडकडे आल्टो कार (क्र. एमएच ४९ यु ३४०९) ने प्रवास करित होते. दरम्यान घुईखेड जवळील खारवगळ नाल्याजवळ टाटा मोटर्स कंपनीच्या ट्रक (क्र. एमएच १७ बीडी ९७४३) विरूद्ध दिशेने येत होता. दरम्यान या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात खड्डे वाचविण्याच्या नादात झाल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांबाबत अनेकांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे. सदरील कामाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून या अपघाताला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

Intro:मुख्यमंत्री साहेब समृद्धी महामार्ग करा.पण खड्ड्यांच्या समृद्धीमूळे 173 बळी घेणाऱ्या नागपूर औरंगाबाद महामार्गावरही लक्ष द्या 

जीवघेण्या खड्ड्यांची समृद्धी असलेल्या नागपूर -औरंगाबाद महामार्गाने घेतले 173 बळी.

 रस्त्यावरील खड्ड्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात,माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर यांची मागणी
------------------------------------------------------------
अमरावती अँकर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या निर्मिती साठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात असतानाच.सध्या स्थितीत ज्या महामार्गावरून वाहतूक केली जाते तो नागपूर औरंगाबाद महामार्ग हा जीवघेण्या खड्यांची समृद्धी असलेला महामार्ग बनला आहे.मागील नऊ वर्षात या महामार्गावरील खड्ड्यांनी तबल 173 लोकांचे बळी घेतले असून अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.करोडो हजारो कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग तयार होत असताना .सध्या वाहतूक सुरू असलेल्या महामार्गावरील खड्डे भरायला सरकार कडे पैसे नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडवरून जाणाऱ्या नागपुर - औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर खारवगळ नाल्याजवळील उदयकर यांच्या शेतासमोर खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात मारोती अल्टो व ट्रक चा भयानक अपघात होऊन अल्टोमधील चौघांचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी घडली. त्यामुळे या खड्ड्यांना जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.  


     नागपुर ते औरंगाबाद एक्सप्रेस हायवे घुईखेडवरून गेला आहे. मात्र या हायवेवर मोठ्या प्रमाणात मोठ मोठे खड्डे पडले असुन दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांचे नाहक बळी गेले आहे. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील मुळचे असलेले व सद्यास नागपुरमधील गोटाळ पांजरी, कस्तुरी नगर येथे वास्तव्यास असलेले अनिल सारंगधर चेंडकापुरे हे रविवारी आई, पत्नी, मुली, वडिल व सासऱ्यांसोबत नागपुर वरून घुईखेडकडे अल्टो कार क्र. एमएच ४९ यु ३४०९ ने येत असतांना घुईखेडजवळील खारवगळ नाल्याजवळ विरूध्द दिशेने येणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीच्या ट्रक क्र. एमएच १७ बीडी ९७४३ ची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये चौघांचा मृत्यु झाला असुन दोघे गंभीर जखमी उपचार घेत आहे. सदर अपघात खड्डे वाचविण्याच्या नादात झाल्याचे काहींनी सांगितले. यासंदर्भात अनेकांनी निवेदन वा तोंडी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र ते खड्डे न बुजविल्यामुळे अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशासकीय जबाबदारीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असुन या अपघाताला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.