अकोला : राज्य सरकार हे स्वतःचा कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहे. बाळासाहेब ठाकरे हे अनेक वर्षांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा ( Dussehra Mela at Shivaji Park for Many Years ) घेत होते. त्यावेळी ते काँग्रेसवरही टीका ( Nana Patole Criticised on CM Eknath Shinde ) करीत होते. परंतु, काँग्रेसने त्यांना कधीही दसरा मेळावा घेण्यास विरोध केला नाही. परंतु, आता जे नवीन हिंदू हृदयसम्राट झालेले आहेत; तेच हिंदूंच्या परंपरेला विरोध करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शिंदेगट तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला ( Congress Never Opposed to Shivsena For Dussehra ) आहे.
नाना पटोले यांची शिंदे गटावर टीका : काॅँग्रेस नेते नाना पटोले अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे आले असता बोलत होते. पुढे ते म्हणाले, राज्यातील सरकारमधील एका आमदाराने मुंबईमध्ये शस्त्र बाळगण्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यावरून हे दिसून येते की, कायदा व सुव्यवस्था हेच सरकार बिघडत असेल, तर राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे. हे यावरून दिसून येते.
न्यायालयाच्या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत : त्यामुळे प्रशासनावरच त्याचा ताण पडत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम हे सरकार करीत असले तरी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सरकारचा कायदा व सुव्यवस्था बिघाडविण्याचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे या निर्णयाचे काँग्रेसतर्फे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
राहुल गांधींनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे : राहुल गांधींनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, ही सर्वसामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. ते आम्ही पक्षाध्यक्षांकडे वारंवार याबाबत बोलत आहोत. राहुल गांधी अध्यक्ष होत नसेल, तर अशोक गहलोत यांनीच त्यांच्याशी विचार विमर्श करून अर्ज भरणार असल्याचा निर्णय घेतला असेल. तरीही आमची अजूनही इच्छा आहे की, राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.