अकोला - मरोडा येथे झालेल्या मुलीवरील अत्याचार आणि मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मातंग समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर स्वराज्य भवन येथे शोक व निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचलेल्या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी निवेदन दिले.
हेही वाचा - 'भारताच्या इतिहासात इंग्रजांना मोठं करण्याचा सैफ अली खानचा प्रयत्न'
मुलीवर झालेल्या अत्याचार आणि मृत्यूप्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी मातंग समाजातील महिला-पुरुष, युवक-युवती स्वराज्य भवन येथे दाखल झाले होते. काही जणांनी परवानगी नसतानाही पोलिसांच्या संरक्षणात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. याठिकाणी मोर्चेकरी न्याय देण्याच्या मागणीसाठी नारेबाजी करत होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर एका समितीने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. तर, स्वराज्य भवन येथे समाजातर्फे शोकसभा घेण्यात आली.