ETV Bharat / state

दुष्काळाच्या झळा; पाणीटंचाईमुळे केळीच्या बागा संकटात

author img

By

Published : May 15, 2019, 11:14 AM IST

Updated : May 15, 2019, 5:15 PM IST

अकोला जिल्ह्यातील बोचरा गावातील शेतकरी पाणीटंचाईमुळे आपल्या शेतातील केळीच्या बागा काढून टाकत आहेत.

पाणीटंचाईमुळे सुकलेल्या केळीच्या बागा

अकोला - अकोट तालुक्यातील बोचरा गावातील अनेक शेतकरी पाणीटंचाईमुळे केळीचे पीक काढून टाकत आहेत. जून महिन्यात लावलेले पीक उष्णतेमुळे तग धरत नसल्याने हे पीक काढण्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. यापूर्वीही काही शेतकऱ्यांनी याच कारणाने केळीचे पीक काढून टाकले होते.

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोचरा गावासह इतर गावात बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीतील पाणी मिळणे शक्य नाही. त्यामुळे ते आपल्या केळीच्या बागा वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, त्यांचीही धडपड पाण्याअभावी व्यर्थ जात आहे. मागील वर्षी येथील केळी परदेशात गेली होती. यावर्षी मात्र, स्थानिक बाजारातदेखील जाण्यास ही केळी तयार झाली नाही. केळीच्या बागेला पाणी मिळावे, यासाठी काही शेतकऱ्यांनी ११ ठिकाणी बोर खोदली. मात्र, त्यापैकी फक्त २ ठिकाणीच पाणी लागले. त्यावरील पाण्यानेही केळी तग धरत नसल्याने शेतकरी केळीच्या बागा काढत आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

अकोला - अकोट तालुक्यातील बोचरा गावातील अनेक शेतकरी पाणीटंचाईमुळे केळीचे पीक काढून टाकत आहेत. जून महिन्यात लावलेले पीक उष्णतेमुळे तग धरत नसल्याने हे पीक काढण्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. यापूर्वीही काही शेतकऱ्यांनी याच कारणाने केळीचे पीक काढून टाकले होते.

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोचरा गावासह इतर गावात बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीतील पाणी मिळणे शक्य नाही. त्यामुळे ते आपल्या केळीच्या बागा वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, त्यांचीही धडपड पाण्याअभावी व्यर्थ जात आहे. मागील वर्षी येथील केळी परदेशात गेली होती. यावर्षी मात्र, स्थानिक बाजारातदेखील जाण्यास ही केळी तयार झाली नाही. केळीच्या बागेला पाणी मिळावे, यासाठी काही शेतकऱ्यांनी ११ ठिकाणी बोर खोदली. मात्र, त्यापैकी फक्त २ ठिकाणीच पाणी लागले. त्यावरील पाण्यानेही केळी तग धरत नसल्याने शेतकरी केळीच्या बागा काढत आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

Intro:अकोला - अकोट तालुक्यातील बोचरा गावातील अणे शेतकरी पाण्याअभावी केळी चे पीक काढण्यास बाध्य पडत आहे. जून महिन्यात लावलेले पीक उष्णतेमुळे तग धरत नसल्याने हे पीक काढण्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. याआधी शेतकऱ्यानेही याच कारणाने केळीचे पीक तोडले होते हे विशेष.Body:अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोचरा गावासह इतर गावात बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीतील पाणी मिळणे शक्य नसल्याने ते आपल्या केळीच्या बागा जोपासण्यात परिश्रम घेत आहे. त्यांचे श्रम पाण्याअभावी व्यर्थ जात आहे. मागील वर्षी येथील केळी ही परदेशात गेली होती. यावर्षी मात्र केली बाजारात ही जाण्यास तयार झाली नाही. केळी निरंतर पाणी मिळावे म्हणून येथील आदित्य बोचे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी 11 वेळा बोर केली. त्यापैकी फक्त दोन ठिकाणी पाणी लागले आहे. त्यावरील पाण्याने केळी तग धरत नसल्याने शेतकरी ही केळी काढत असून लाखो रुपयांचे नुकसान सहन करीत आहेत. परिणाम यावर्षी शेतीत लावलेले लाखो रुपये लावून त्यांना उत्पन्न होणार नाही आहे.Conclusion:पाण्याची पातळी खालावली
जिल्ह्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. त्यामुळे दीडशे फूट बोअर खोदून ही पाणी लागत नाही आहे. सर्वच जिल्ह्यातील ही परिस्थिती असल्याने अनेक ठिकाणी बोअर आटल्या असून विहिरीही कोरड्या पडल्या आहेत.
Last Updated : May 15, 2019, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.