ETV Bharat / state

56 इंचाची छाती चीनला घाबरते! - यशवंत सिन्हा मोदी टीका

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखाली गांधी शांती यात्रा काढण्यात आली आहे. मुंबई ते दिल्ली दरम्यान होणारी ही शांती यात्रा शुक्रवारी संगमनेर येथे आली. या वेळी आयोजित केलेल्या मेळाव्यात सिन्हा यांनी मोदींच्या धोरणावर जोरदार  टीका केली.

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा
माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा
author img

By

Published : Jan 11, 2020, 8:09 AM IST

अहमदनगर - '56 इंचाची छाती चीनला घाबरते', अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखाली गांधी शांती यात्रा काढण्यात आली आहे. मुंबई ते दिल्ली दरम्यान होणारी ही शांती यात्रा शुक्रवारी संगमनेर येथे आली. या वेळी आयोजित केलेल्या मेळाव्यात सिन्हा यांनी मोदींच्या धोरणावर जोरदार टीका केली.

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा


'नागरिकत्व सुधारणा कायद्याची या देशात गरज नाही. मात्र, देशातील आर्थिक डबघाई लपवण्यासाठी केंद्र सरकारने हा कायदा आणून लोकांचे लक्ष विचलित करण्यात यश मिळवले. या शांतता यात्रेद्वारे तीन हजार किलोमीटरचा प्रवास करुन देशातील लोकांना हीच बाब समजून सांगत आहोत,' असे सिन्हा म्हणाले. '56 इंचाची छाती चीनला घाबरते. तिबेटमधून बौद्ध धर्मीय भारतात आले तर, त्यांना भारताचे नागरिकत्व देतो, असे म्हणण्याची यांची हिंमत नाही', अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा- भाजपचे सर्व भ्रष्टाचार हळूहळू बाहेर काढणार..'

मोदी-शाह अर्थमंत्री असलेल्या सीतारामन यांना बाजूला ठेवून लोकांची मते जाणून घेत आहेत. अर्थमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला डावलले जात आहे. राजीनामा देण्याचे सोडून सीतारामन त्या खुर्चीला चिकटून आहे, असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लावला.


वेगळ्या विचारधारेमुळे दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्या झाल्या. ज्या विचारसरणीचा मुकाबला करू शकत नाही, तो विचारच संपवून टाकायचा ही राष्ट्रीय स्वयंसेवी संघ आणि सनातनी संघटनांची भूमिका आहे. या संघटनांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाणांनी केली.

अहमदनगर - '56 इंचाची छाती चीनला घाबरते', अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखाली गांधी शांती यात्रा काढण्यात आली आहे. मुंबई ते दिल्ली दरम्यान होणारी ही शांती यात्रा शुक्रवारी संगमनेर येथे आली. या वेळी आयोजित केलेल्या मेळाव्यात सिन्हा यांनी मोदींच्या धोरणावर जोरदार टीका केली.

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा


'नागरिकत्व सुधारणा कायद्याची या देशात गरज नाही. मात्र, देशातील आर्थिक डबघाई लपवण्यासाठी केंद्र सरकारने हा कायदा आणून लोकांचे लक्ष विचलित करण्यात यश मिळवले. या शांतता यात्रेद्वारे तीन हजार किलोमीटरचा प्रवास करुन देशातील लोकांना हीच बाब समजून सांगत आहोत,' असे सिन्हा म्हणाले. '56 इंचाची छाती चीनला घाबरते. तिबेटमधून बौद्ध धर्मीय भारतात आले तर, त्यांना भारताचे नागरिकत्व देतो, असे म्हणण्याची यांची हिंमत नाही', अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा- भाजपचे सर्व भ्रष्टाचार हळूहळू बाहेर काढणार..'

मोदी-शाह अर्थमंत्री असलेल्या सीतारामन यांना बाजूला ठेवून लोकांची मते जाणून घेत आहेत. अर्थमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला डावलले जात आहे. राजीनामा देण्याचे सोडून सीतारामन त्या खुर्चीला चिकटून आहे, असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लावला.


वेगळ्या विचारधारेमुळे दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्या झाल्या. ज्या विचारसरणीचा मुकाबला करू शकत नाही, तो विचारच संपवून टाकायचा ही राष्ट्रीय स्वयंसेवी संघ आणि सनातनी संघटनांची भूमिका आहे. या संघटनांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाणांनी केली.

Intro:





Shirdi_Ravindra Mahale


राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि केंद्र सरकारचे विभाजनवादी धोरणाला विरोध करुन संविधान बचाओ,राष्ट्र बचाओ संदेश देण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखाली निघालेली मुंबई ते दिल्ली गांधी शांती यात्रा आज संगमनेरात पोहचली होती या वेळी आयोजीत मेळाव्यात बोलतांना यशवंत सिन्हा यांनी मोदींच्या धोरणावर टिका केली.मोदींनी केवळ चार देशातुन येणार्या लोकांना नागरीक्तव देणार असल्याच म्हटलय मात्र चायना सह इतर 58 इस्लामीक देशातुन आलेले नागरीक प्राताडीत होत नाहीत का 56 इंचाची छाती चायनाला घाबरताते अश्या शब्दात मोदींवर निशाणा साधलाय....

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार उपस्थितीत आज संगमनेरात आली असता नागरीकत्व सुधारणा कायद्याची या देशात गरज नाबीये मात्र देशातील आर्थिक डबघाई लपविण्यासाठी केंग्र सरकारने हा कायदा आणत लोकांच लक्ष विचलीत करण्यात यश मिळवलय मात्र आला आम्ही शांता यात्रे द्वारे तीन हजार किलो मिटरचा प्रवास करुन देशातील लोकांना समजुन सांगतोय अस सांगत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदींनवर टिका केलीये....

साऊंड बाईट-- यशवंत सिन्हा माजी अर्थमंत्री

1 फेब्रवारीला देशाच बजेट सादर होणार आहे. बजेटची सगळी तयारी झालेली आहे मात्र मोदी शहा अर्थमंत्री असलेल्या सितारामन यांना बाजुला ठेवुन आता लोकांची मते जाणुन घेतातय अर्थमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला डावलल जातय तरीही सितारामण बाई या त्या खुर्चीला चिकुन आहेत दुसर कोणी मंत्री असत तर राजीनामा दिला असता असा खोचक टोलाही चव्हाणांनी लगावलाय....

साऊंड बाईट पूथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री

राज्यात तीन पक्षांच सरकार राज्यात पहील्यांदा आलय कमी मंत्रीपपदे आली आहेत मात्र आता सगळ्यांच समाधान झालय विचार धारे मुळे दाभोळकर,कलबुर्गी पानसरे यांच्या हत्या झाल्यात गांधींच्या हस्ते पँटर्न यवरच या हत्या झाल्याच मी आधीच म्हटल होत अस पूथ्वीराज चव्हाण यांनी सांगत विचाराणांनी आपन मुकाबला करु शकले नाही तर तो विचारच संपवुन टाकायचा ही आर एस एस आणि सनातणी संघटनांनची भुमिका राहीली आहे या वर कडक कार्यवाही झाली पाहीजे म्हणुन अश्या संघटना वर देशभर बंदी आणली पाहीजे अशी पुर्नमागणी चव्हाणांनी केली आहे..भाजपा बरोबर मनसे गेली तरी आता त्याचा काहीही फरक पडणार नाही अस चव्हाणांनी म्हटलय....Body:mh_ahm_shirdi_gandhi shanat yatara_10_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_gandhi shanat yatara_10_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.